म. टा. प्रतिनिधी, पुणे
'संमेलनाध्यक्षपदासाठी अर्ज भरताना साहित्य महामंडळ, मसाप आणि इतर घटक संस्था नाराज होऊ नये याची काळजी घ्यावी लागते. मतपत्रिका गोळा करणारा तोच संमेलनाध्यक्ष असा शिक्का बसला आहे. मतपत्रिका गोळा करणे हीच क्षमता असेल तर बुक बायंडरही संमेलनाध्यक्ष होईल. पाकिट आणि आयोजक पाहून बोलणाऱ्यांचे प्रमाण मराठी साहित्य वर्तुळात वाढले आहे. ८० टक्के लोकांचा संमेलन, परिवर्तनवादी विचार याच्याशी संबंध नसतो. साहित्य संमेलनात वीस टक्क्यातील पाच टक्के बोलतात आणि इतर ऐकत राहतात,' असे शाब्दिक फटकारे मारत ज्येष्ठ वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी गुरुवारी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक आणि साहित्य वर्तुळावर ताशेरे ओढले.
आडकर फाउंडेशनतर्फे १९ व्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानिमित्त कवी उद्धव कानडे यांचा माजी साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी फुटाणे बोलत होते. सचिन ईटकर, संस्थेचे अॅड. प्रमोद आडकर उपस्थित होते.
'संमेलनाध्यक्ष पद सन्मानाने दिले पाहिजे. साहित्य महामंडळात बंधुता नाही. लोकांचा अनुनय करण्यासाठी बोलू नये. शंभर वर्षांनंतर आपले साहित्य कोणी वाचत असेल तर तो लेखक किंवा कवी असतो. आपले अस्तित्त्व क्षणभंगुर आहे,' असा टोला फुटाणे यांनी साहित्यिकांना लगावला.
'मी टिळक रस्त्यावरून जायचो तेव्हा साहित्य परिषदेतील मांदियाळींची नावे वाचायचो. आज मी पदाधिकारी आहे. फुटाणेंमुळे कवी झालो. मोरेंमुळे वैचारिक वारसा मिळाला. आईने कष्ट करून शिकवले. बाबा आढावांमुळे शिकलो,' अशी भावना कानडे यांनी व्यक्त केली. 'कळप करणारी संमेलने वाढली आहेत,' अशी टिप्पणी त्यांनी केली.
'संमेलनाध्यक्षपदासाठी अर्ज भरताना साहित्य महामंडळ, मसाप आणि इतर घटक संस्था नाराज होऊ नये याची काळजी घ्यावी लागते. मतपत्रिका गोळा करणारा तोच संमेलनाध्यक्ष असा शिक्का बसला आहे. मतपत्रिका गोळा करणे हीच क्षमता असेल तर बुक बायंडरही संमेलनाध्यक्ष होईल. पाकिट आणि आयोजक पाहून बोलणाऱ्यांचे प्रमाण मराठी साहित्य वर्तुळात वाढले आहे. ८० टक्के लोकांचा संमेलन, परिवर्तनवादी विचार याच्याशी संबंध नसतो. साहित्य संमेलनात वीस टक्क्यातील पाच टक्के बोलतात आणि इतर ऐकत राहतात,' असे शाब्दिक फटकारे मारत ज्येष्ठ वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी गुरुवारी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक आणि साहित्य वर्तुळावर ताशेरे ओढले.
आडकर फाउंडेशनतर्फे १९ व्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानिमित्त कवी उद्धव कानडे यांचा माजी साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी फुटाणे बोलत होते. सचिन ईटकर, संस्थेचे अॅड. प्रमोद आडकर उपस्थित होते.
'संमेलनाध्यक्ष पद सन्मानाने दिले पाहिजे. साहित्य महामंडळात बंधुता नाही. लोकांचा अनुनय करण्यासाठी बोलू नये. शंभर वर्षांनंतर आपले साहित्य कोणी वाचत असेल तर तो लेखक किंवा कवी असतो. आपले अस्तित्त्व क्षणभंगुर आहे,' असा टोला फुटाणे यांनी साहित्यिकांना लगावला.
'मी टिळक रस्त्यावरून जायचो तेव्हा साहित्य परिषदेतील मांदियाळींची नावे वाचायचो. आज मी पदाधिकारी आहे. फुटाणेंमुळे कवी झालो. मोरेंमुळे वैचारिक वारसा मिळाला. आईने कष्ट करून शिकवले. बाबा आढावांमुळे शिकलो,' अशी भावना कानडे यांनी व्यक्त केली. 'कळप करणारी संमेलने वाढली आहेत,' अशी टिप्पणी त्यांनी केली.