म. टा. प्रतिनिधी, पुणे
दिवाळीनिमित्त कपडे, दागिने, गोडधोड पदार्थ, वाहने, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू अशा खरेदीमुळे बाजारपेठेत चैतन्य पसरलेले असताना पुस्तकांची बाजारपेठही वाचकांच्या प्रतिसादाने बहरली आहे. दिवाळीनिमित्त पुस्तके, दिवाळी अंक या रूचकर साहित्याचा वाचनानंद घेण्यासाठी तसेच दिवाळीनिमित्त भेट देण्यासाठी पुस्तकांची खरेदी होत आहे. वाचन जागर महोत्सवाला वाचकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
सण आणि उत्सवानिमित्त बाजारपेठ पूर्ववत होत असताना साहित्य व्यवहारही वाढू लागला आहे. दिवाळीच्या उत्सवी आणि उत्साही वातावरणात साहित्य फराळासाठी वाचकांकडून आवर्जून केली जाणारी पुस्तक आणि दिवाळी अंकांची खरेदी होऊ लागल्याने साहित्य व्यवहारावर आठ महिन्यांपासून आलेली मरगळ दूर झाली आहे. उत्सवांच्या काळात वाचकांनी पुस्तक खरेदी करावी यासाठी मनोविकास, डायमंड, मॅजेस्टिक, राजहंस, मेहता, साकेत, साधना, पद्मगंधा, ज्योत्स्ना आणि रोहन या प्रकाशन संस्था एकत्र आल्या आहेत. २५ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणाऱ्या वाचन जागर महोत्सवात दहा प्रकाशकांच्या प्रत्येकी पंचवीस अशा अडीचशे पुस्तकांवर पंचवीस टक्के सवलत दिली जात आहे. ही योजना राज्यभर लागू आहे. प्रकाशकांच्या म्हणण्यानुसार साहित्य व्यवहार सावरण्यासाठी अशा एकत्रित प्रयत्नांची गरज आहे.
'दिवाळीनिमित्त विविध योजना आहेत. गेल्या दोन-तीन महिन्यांच्या तुलनेत सणांच्या दिवसात पुस्तकांच्या विक्रीत वाढ झाली आहे. दिवाळीनिमित्त दर्जेदार पुस्तकांची खरेदी तसेच पुस्तके भेट देण्याचे प्रमाण वाढले आहे. पुस्तक खरेदीसाठी गिफ्ट व्हाउचर देण्याचा कलही वाढला आहे. ऑनलाइनमुळे पुस्तके भेट देणे सोपे झाले. दिवाळी अंकांना अभूतपूर्व प्रतिसाद आहे. काही अंकांच्या प्रती संपल्याने पुन्हा प्रसिद्ध होत आहेत. साहित्य क्षेत्रात विश्वास निर्माण झाला आहे,' असे अक्षरधारा बुक गॅलरीचे संचालक रमेश राठिवडेकर यांनी सांगितले. वाचन जागर महोत्सवाला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे रोहन प्रकाशनचे संचालक रोहन चंपानेरकर यांनी सांगितले.
करोना काळात वाचकांचा पहिल्यांदाच प्रतिसाद मिळत असल्याने सकारात्मक बदल झाले आहेत. वाचकांचा प्रतिसाद लेखक, प्रकाशक आणि विक्रेते यांचा उत्साह वाढवणारा आहे. दिवाळीनिमित्त पुस्तकविक्री वाढली आहे. राजहंसच्या योजनांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे. याशिवाय वाचन जागर योजना उत्तमप्रकारे सुरू आहे.
- दिलीप माजगावकर, संचालक, राजहंस प्रकाशन
वाचन जागर महोत्सवात मेहता, मॅजेस्टिक, साधना, ज्योत्स्ना, मनोविकास, डायमंड, पद्मगंधा, साकेत, राजहंस आणि रोहन या प्रकाशन संस्थांची प्रत्येकी २५ म्हणजे एकूण २५० पुस्तके वाचकांना घसघशीत २५ टक्के सवलतीत उपलब्ध आहेत. ही योजना महाराष्ट्रातील ३५ प्रमुख पुस्तकविक्रेत्यांकडे उपलब्ध आहे.
- विकास परांजपे, संचालक, ज्योत्स्ना प्रकाशन
दिवाळीनिमित्त कपडे, दागिने, गोडधोड पदार्थ, वाहने, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू अशा खरेदीमुळे बाजारपेठेत चैतन्य पसरलेले असताना पुस्तकांची बाजारपेठही वाचकांच्या प्रतिसादाने बहरली आहे. दिवाळीनिमित्त पुस्तके, दिवाळी अंक या रूचकर साहित्याचा वाचनानंद घेण्यासाठी तसेच दिवाळीनिमित्त भेट देण्यासाठी पुस्तकांची खरेदी होत आहे. वाचन जागर महोत्सवाला वाचकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
सण आणि उत्सवानिमित्त बाजारपेठ पूर्ववत होत असताना साहित्य व्यवहारही वाढू लागला आहे. दिवाळीच्या उत्सवी आणि उत्साही वातावरणात साहित्य फराळासाठी वाचकांकडून आवर्जून केली जाणारी पुस्तक आणि दिवाळी अंकांची खरेदी होऊ लागल्याने साहित्य व्यवहारावर आठ महिन्यांपासून आलेली मरगळ दूर झाली आहे. उत्सवांच्या काळात वाचकांनी पुस्तक खरेदी करावी यासाठी मनोविकास, डायमंड, मॅजेस्टिक, राजहंस, मेहता, साकेत, साधना, पद्मगंधा, ज्योत्स्ना आणि रोहन या प्रकाशन संस्था एकत्र आल्या आहेत. २५ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणाऱ्या वाचन जागर महोत्सवात दहा प्रकाशकांच्या प्रत्येकी पंचवीस अशा अडीचशे पुस्तकांवर पंचवीस टक्के सवलत दिली जात आहे. ही योजना राज्यभर लागू आहे. प्रकाशकांच्या म्हणण्यानुसार साहित्य व्यवहार सावरण्यासाठी अशा एकत्रित प्रयत्नांची गरज आहे.
'दिवाळीनिमित्त विविध योजना आहेत. गेल्या दोन-तीन महिन्यांच्या तुलनेत सणांच्या दिवसात पुस्तकांच्या विक्रीत वाढ झाली आहे. दिवाळीनिमित्त दर्जेदार पुस्तकांची खरेदी तसेच पुस्तके भेट देण्याचे प्रमाण वाढले आहे. पुस्तक खरेदीसाठी गिफ्ट व्हाउचर देण्याचा कलही वाढला आहे. ऑनलाइनमुळे पुस्तके भेट देणे सोपे झाले. दिवाळी अंकांना अभूतपूर्व प्रतिसाद आहे. काही अंकांच्या प्रती संपल्याने पुन्हा प्रसिद्ध होत आहेत. साहित्य क्षेत्रात विश्वास निर्माण झाला आहे,' असे अक्षरधारा बुक गॅलरीचे संचालक रमेश राठिवडेकर यांनी सांगितले. वाचन जागर महोत्सवाला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे रोहन प्रकाशनचे संचालक रोहन चंपानेरकर यांनी सांगितले.
करोना काळात वाचकांचा पहिल्यांदाच प्रतिसाद मिळत असल्याने सकारात्मक बदल झाले आहेत. वाचकांचा प्रतिसाद लेखक, प्रकाशक आणि विक्रेते यांचा उत्साह वाढवणारा आहे. दिवाळीनिमित्त पुस्तकविक्री वाढली आहे. राजहंसच्या योजनांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे. याशिवाय वाचन जागर योजना उत्तमप्रकारे सुरू आहे.
- दिलीप माजगावकर, संचालक, राजहंस प्रकाशन
वाचन जागर महोत्सवात मेहता, मॅजेस्टिक, साधना, ज्योत्स्ना, मनोविकास, डायमंड, पद्मगंधा, साकेत, राजहंस आणि रोहन या प्रकाशन संस्थांची प्रत्येकी २५ म्हणजे एकूण २५० पुस्तके वाचकांना घसघशीत २५ टक्के सवलतीत उपलब्ध आहेत. ही योजना महाराष्ट्रातील ३५ प्रमुख पुस्तकविक्रेत्यांकडे उपलब्ध आहे.
- विकास परांजपे, संचालक, ज्योत्स्ना प्रकाशन