अ‍ॅपशहर

विशेष मुलांचा निकालही ‘विशेष’

राज्यभरातून यंदा बारावीची परीक्षा दिलेल्या विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांचा निकालही विशेषच ठरला आहे. राज्यभरातील ५ हजार ६११ विशेष विद्यार्थ्यांपैकी ५ हजार २८ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा उत्तीर्ण होण्यात यश मिळविले आहे. विशेष विद्यार्थ्यांची बारावी उत्तीर्णतेची टक्केवारी ८९.६१ टक्के इतकी असून, या विद्यार्थ्यांचा गटही विशेष प्राविण्यासह बारावी उत्तीर्ण झाल्याचे दिसत आहे.

Maharashtra Times 26 May 2016, 3:03 am

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्यभरातून यंदा बारावीची परीक्षा दिलेल्या विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांचा निकालही विशेषच ठरला आहे. राज्यभरातील ५ हजार ६११ विशेष विद्यार्थ्यांपैकी ५ हजार २८ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा उत्तीर्ण होण्यात यश मिळविले आहे. विशेष विद्यार्थ्यांची बारावी उत्तीर्णतेची टक्केवारी ८९.६१ टक्के इतकी असून, या विद्यार्थ्यांचा गटही विशेष प्राविण्यासह बारावी उत्तीर्ण झाल्याचे दिसत आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम result of special students
विशेष मुलांचा निकालही ‘विशेष’

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (राज्य बोर्ड) बारावीच्या परीक्षेसाठी यंदा विशेष गरजा असलेल्या एकूण ५ हजार ६२१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ५ हजार ६११ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. अंध विद्यार्थ्यांच्या गटातून परीक्षा दिलेल्या १ हजार १७५ विद्यार्थ्यांपैकी १ हजार ९६ विद्यार्थी बारावी उत्तीर्ण झाले आहेत. अंध विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९३.२८ टक्के इतकी आहे. डिस्लेक्सिया गटातून परीक्षा दिलेल्या १ हजार ७३ विद्यार्थ्यांपैकी १ हजार २३ विद्यार्थी बारावी उत्तीर्ण झाल्याची माहिती बोर्डाने दिली.

४५७ शाळांचा निकाल १०० टक्के

राज्यभरातील एकूण ४५७ ज्युनिअर कॉलेजांचा बारावीचा निकाल १०० टक्के लागला आहे. त्याच वेळी एकूण ३६ ज्युनिअर कॉलेजांचा निकाल शून्य टक्के लागला आहे. पुण्यातील १०१, नागपूरमधील ५७, औरंगाबादमधील ३४, मुंबईमधील ६६, कोल्हापूरमधील ५६, अमरावती आणि नाशिकमधील ४३, लातूरमधील ४०, तर कोकण विभागीय मंडळाच्या कार्यक्षेत्रातील ४३ ज्युनिअर कॉलेजांचा निकाल १०० टक्के लागला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज