अ‍ॅपशहर

रिक्षावाल्याने परत केले ३.५ लाखांचे दागिने

पैशासाठी माणसं काहीही करायला मागे-पुढे पाहत नाहीत, असं चित्र आज अनेक घटनांमधून दिसतं. पण समाजात अजूनही माणुसकी, प्रामाणिकपणा टिकून असल्याचं एका रिक्षाचालकानं दाखवून दिलं आहे.

Maharashtra Times 19 May 2017, 12:53 pm
मटा ऑनलाइन वृत्त । पिंपरी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rickshaw driver returns gold jewellery worth rs 3 50 lakh woman passenger
रिक्षावाल्याने परत केले ३.५ लाखांचे दागिने


पैशासाठी माणसं काहीही करायला मागे-पुढे पाहत नाहीत, असं चित्र आज अनेक घटनांमधून दिसतं. पण समाजात अजूनही माणुसकी, प्रामाणिकपणा टिकून असल्याचं एका रिक्षाचालकानं दाखवून दिलं आहे. वसिम शेख या रिक्षावाल्यानं एका महिलेचे साडेतीन लाख रुपयांचे दागिने परत करून आपल्यातील खरेपणाची प्रचिती दिली आहे.

मावळ तालुक्यातील शेलारवाडी येथे राहणाऱ्या वैशाली भेगडे या त्यांच्या वडिलांसोबत वसिमच्या रिक्षात बसल्या होत्या. त्यांच्याकडे एकूण चार बॅग होत्या. त्यापैकी एकात मुलीच्या लग्नासाठी खरेदी केलेले सुमारे साडेतीन लाख रुपयांचे दागिने होते. त्या देहू रोड स्टेशनला उतरल्या. त्यावेळी घाई-गडबडीत त्यांनी तीनच बॅग रिक्षातून काढल्या. नेमकी दागिन्यांची बॅग रिक्षातच राहिली.

काही मिनिटांतच ही गोष्ट भेगडे यांच्या लक्षात आली. त्या पार हादरल्या. काय करावं हेच त्यांना सुचेनासं झालं. स्टेशनजवळच्या रिक्षावाल्यांकडे त्यांनी चौकशी केली, पण वसिम निघून गेला होता. स्थानिकांच्या मदतीने त्या वसिमला शोधायला निघणार इतक्यात वसिमच दुसऱ्या एका प्रवाशाला घेऊन आला. पण, त्याच्या रिक्षात ती बॅग नव्हती. त्यानं चुकून ती दुसऱ्याच महिलेला दिली होती. पण, त्याला तिचा पत्ता ठाऊक होता. भेगडे यांना घेऊनच त्यानं त्या महिलेचं घर गाठलं. तिथे ती दागिन्यांची बॅग पाहून भेगडे यांच्या जिवात जीव आला आणि डोळ्यात अश्रू तरळले. त्यांनी वसिमचे मनापासून आभार मानले. इतर सर्वांनीही वसिमच्या प्रामाणिकपणाला दाद दिली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज