म. टा. प्रतिनिधी, पुणे
लॉकडाउन शिथिल झाल्यानंतरच्या काळात चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याचे धक्कादायक मत ६५ टक्के पोलिसांनी एका अहवालात नोंदविले आहे. किरकोळ चोऱ्या, वाहनांच्या चोऱ्या आणि दुकाने फोडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पोलिसांचे निरीक्षण असून, करोना साथरोगाच्या काळात वाढलेली बेरोजगारी त्यामागचे एक प्रमुख कारण असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
'इनकॉग्निटो इनसाइट्स' या संस्थेने 'हर घर सुरक्षित अहवाल २०२० : भारताच्या पोलिस दलाची सुरक्षेविषयीची मते' हा अहवाल तयार केला आहे. १५ नोव्हेंबर हा दिवस 'गृह सुरक्षा दिन' म्हणून पाळण्यात येतो. त्या पार्श्वभूमीवर 'गोदरेज लॉक्स'तर्फे राबविण्यात येणाऱ्या 'हर घर सुरक्षित' उपक्रमांतर्गत हा अहवाल नुकताच सादर करण्यात आला. यामध्ये देशभरातील पोलिस अधिकाऱ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले असून, नागरिक आपली घरे कशी सुरक्षित ठेवतात, तसेच करोना साथरोगामुळे गुन्हेगारीचे प्रमाण बदलले आहे का, या विषयी त्यांची निरीक्षणे व मते जाणून घेण्यात आली. बहुसंख्य लोक त्यांच्या घराची 'लॉकिंग सिस्टीम' बदलत नाहीत किंवा अद्ययावत करत नाहीत, असे निरीक्षणही निष्कर्षही या अहवालात नोंदविण्यात आला आहे.
अहवालात पोलिसांनी नोंदविलेली निरीक्षणे
७१ टक्के
पोलिसांना वाटते : सहसा घरफोडी झाल्यानंतरच बहुतांश नागरिक घराच्या सुरक्षेचा गंभीरपणे विचार करतात.
६४ टक्के
पोलिसांचे मत : घरासाठी योग्य सुरक्षा पद्धतीचा अवलंब न केल्याने घरफोडीच्या शक्यता वाढतात.
६८ टक्के
पोलिसांचे निरीक्षण : लोक आपल्या सुरक्षेसाठी शेजारी किंवा घरकामगार किंवा सुरक्षारक्षकांवर अवलंबून असतात.
६४ टक्के
पोलिस मानतात : घरांच्या सुरक्षेसाठी कुलूप हा सर्वांत महत्त्वाचा घटक.
८५ टक्के
पोलिसांना वाटते : घरांच्या सुरक्षेबाबत तंत्रज्ञानाचे उपाय योजण्यासाठी जनजागृतीची गरज.
६५ टक्के
पोलिसांना वाटते : लॉकडाउनच्या काळात पोलिसांविषयी जनतेच्या मनातली प्रतिमा सुधारली.
स्वतंत्र घरे, अपार्टमेंट्स 'लक्ष्य'
स्वतंत्र घरे आणि खासगी अपार्टमेंट्सवर दरोडे टाकण्याचे प्रमाण सर्वाधिक असून, घरफोड्यांचे प्रमाण रात्री, विशेषत: मध्यरात्रीच्या सुमारास जास्त असल्याचे निरीक्षणही अहवालात नोंदविण्यात आले आहे.
करोनाची साथ आणि त्यात चोऱ्यांचे, घरफोड्यांचे प्रमाण वाढल्याचे निरीक्षण ६५ टक्के पोलिसांनी नोंदवले आहे. ८५ टक्के पोलिस घरांच्या सुरक्षा उपायांबद्दल जनजागृती करण्याची शिफारस करत आहेत. 'गृह सुरक्षा दिना'च्या पार्श्वभूमीवर घरांची सुरक्षितता वाढविण्यासाठी अधिकारी व नागरिकांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज आहे.
- श्याम मोटवानी, कार्यकारी उपाध्यक्ष आणि व्यवसाय प्रमुख, गोदरेज लॉक्स
लॉकडाउन शिथिल झाल्यानंतरच्या काळात चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याचे धक्कादायक मत ६५ टक्के पोलिसांनी एका अहवालात नोंदविले आहे. किरकोळ चोऱ्या, वाहनांच्या चोऱ्या आणि दुकाने फोडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पोलिसांचे निरीक्षण असून, करोना साथरोगाच्या काळात वाढलेली बेरोजगारी त्यामागचे एक प्रमुख कारण असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
'इनकॉग्निटो इनसाइट्स' या संस्थेने 'हर घर सुरक्षित अहवाल २०२० : भारताच्या पोलिस दलाची सुरक्षेविषयीची मते' हा अहवाल तयार केला आहे. १५ नोव्हेंबर हा दिवस 'गृह सुरक्षा दिन' म्हणून पाळण्यात येतो. त्या पार्श्वभूमीवर 'गोदरेज लॉक्स'तर्फे राबविण्यात येणाऱ्या 'हर घर सुरक्षित' उपक्रमांतर्गत हा अहवाल नुकताच सादर करण्यात आला. यामध्ये देशभरातील पोलिस अधिकाऱ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले असून, नागरिक आपली घरे कशी सुरक्षित ठेवतात, तसेच करोना साथरोगामुळे गुन्हेगारीचे प्रमाण बदलले आहे का, या विषयी त्यांची निरीक्षणे व मते जाणून घेण्यात आली. बहुसंख्य लोक त्यांच्या घराची 'लॉकिंग सिस्टीम' बदलत नाहीत किंवा अद्ययावत करत नाहीत, असे निरीक्षणही निष्कर्षही या अहवालात नोंदविण्यात आला आहे.
अहवालात पोलिसांनी नोंदविलेली निरीक्षणे
७१ टक्के
पोलिसांना वाटते : सहसा घरफोडी झाल्यानंतरच बहुतांश नागरिक घराच्या सुरक्षेचा गंभीरपणे विचार करतात.
६४ टक्के
पोलिसांचे मत : घरासाठी योग्य सुरक्षा पद्धतीचा अवलंब न केल्याने घरफोडीच्या शक्यता वाढतात.
६८ टक्के
पोलिसांचे निरीक्षण : लोक आपल्या सुरक्षेसाठी शेजारी किंवा घरकामगार किंवा सुरक्षारक्षकांवर अवलंबून असतात.
६४ टक्के
पोलिस मानतात : घरांच्या सुरक्षेसाठी कुलूप हा सर्वांत महत्त्वाचा घटक.
८५ टक्के
पोलिसांना वाटते : घरांच्या सुरक्षेबाबत तंत्रज्ञानाचे उपाय योजण्यासाठी जनजागृतीची गरज.
६५ टक्के
पोलिसांना वाटते : लॉकडाउनच्या काळात पोलिसांविषयी जनतेच्या मनातली प्रतिमा सुधारली.
स्वतंत्र घरे, अपार्टमेंट्स 'लक्ष्य'
स्वतंत्र घरे आणि खासगी अपार्टमेंट्सवर दरोडे टाकण्याचे प्रमाण सर्वाधिक असून, घरफोड्यांचे प्रमाण रात्री, विशेषत: मध्यरात्रीच्या सुमारास जास्त असल्याचे निरीक्षणही अहवालात नोंदविण्यात आले आहे.
करोनाची साथ आणि त्यात चोऱ्यांचे, घरफोड्यांचे प्रमाण वाढल्याचे निरीक्षण ६५ टक्के पोलिसांनी नोंदवले आहे. ८५ टक्के पोलिस घरांच्या सुरक्षा उपायांबद्दल जनजागृती करण्याची शिफारस करत आहेत. 'गृह सुरक्षा दिना'च्या पार्श्वभूमीवर घरांची सुरक्षितता वाढविण्यासाठी अधिकारी व नागरिकांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज आहे.
- श्याम मोटवानी, कार्यकारी उपाध्यक्ष आणि व्यवसाय प्रमुख, गोदरेज लॉक्स