‘आरटीई’ प्रवेशाचे मागचे पाढे पंचावन्न
Harsh.Dudhe@timesgroup.com
Tweet : @@HarshDudhe_MT
पुणे : पुणे जिल्ह्यातील खासगी शाळांमध्ये प्रवेशाच्या सहा फेऱ्या झाल्यानंतरही पाच हजारांपेक्षा अधिक जागा शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) शिल्लक आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत शिल्लक जागांची आकडेवारी कमी असली, तरी प्रवेश प्रक्रियेची अंमलबजावणी व्यवस्थित होत नसल्याचे चित्र आहे. राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने शिक्षणाधिकाऱ्यांना संपूर्ण प्रकिया ३१ एप्रिलपर्यत संपविण्याचे आदेश दिले असताना ती अद्यापही सुरू आहे. ‘आरटीई’च्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होऊन पाच वर्षे झाली, तरी ही प्रवेश प्रक्रिया आर्थिक दुर्बल घटकांपर्यत पोहोचविण्यात शिक्षण विभाग अपयशी ठरला आहे.
गेल्या वर्षापर्यंत आरटीई प्रवेश प्रक्रियेला एप्रिल-मे महिन्यात सुरुवात होऊन ती सप्टेंबर महिन्यापर्यंत राबविण्यात येत होती. मात्र, शाळा जून महिन्यात सुरू होऊन सप्टेंबर महिन्यापर्यंत बराच अभ्यासक्रम शिकविला जातो. त्यामुळे आरटीई प्रवेश प्रक्रियेतून या शाळांमध्ये प्रवेश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी शिक्षण विभागाने राज्याच्या प्राथमिक विभागाच्या संचालकांना आणि जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांना आरटीईटी प्रवेश प्रक्रिया ३१ एप्रिलपर्यंतच पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. मात्र, अद्यापही पुणे जिल्ह्यात प्रवेश प्रक्रियेच्या सहा फेऱ्यांनंतरही आणखी काही फेऱ्या होण्याची शक्यता आहे.
आरटीई प्रवेश प्रक्रियेत ८४९ शाळांमध्ये १५ हजार ६९३ जागा आहेत. या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी तब्बल ३६ हजार ९३३ अर्ज आले होते. मात्र, सध्या प्रवेश प्रक्रियेतून जवळपास १० हजार ४०७ विद्यार्थ्यांना शाळांमध्ये प्रवेश मिळाला आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील शाळांमध्ये तब्बल पाच हजार २८६ जागा रिक्त आहेत. गेल्यावर्षी हा आकडा आठ हजार ९६७ होता. आरटीई प्रवेश प्रक्रिया ही समाजातील आर्थिक दुर्बल घटकांमधील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये असणाऱ्या एंट्री पॉइंटच्या वर्गात प्रवेश मिळविण्यासाठी राबविण्यात येते. त्यामुळे या प्रवेश प्रक्रियेची माहिती या घटकांपर्यत पोहोचण्याची आवश्यकता असते. प्रत्यक्षात ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचत नसल्याने ते प्रवेश प्रक्रियेत सहभागी होऊ शकत नाहीत.
शिक्षण विभागाने प्रवेश प्रक्रियेची माहिती गरजू आणि आर्थिक दुर्बल घटकांमधील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रामीण भागात जनजागृती अभियान राबविण्याची आवश्यकता होती. मात्र, शिक्षण विभागाने कोणतेच अभियान न राबविल्याने प्रवेश प्रक्रियेची माहिती वेळेवर गरजूंपर्यत पोहोचत नाही. प्राथमिक विभागाचे माजी संचालक गोविंद नांदेडे यांनी अभियान राबविण्यासाठी प्रयत्न करू, असे प्रसारमाध्यमांना सांगितले होते. प्रत्यक्षात तसे काही घडले नाही. प्रवेश प्रक्रियेत पालकांना वेबसाइटहून ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी शिक्षण मंडळ आणि जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शाळांमध्ये सुविधा निर्माण केली. मात्र, तेथेही भरपूर अडचणी आल्या. फेऱ्यांमध्ये पालकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या जात नाहीत. त्यामुळेच प्रवेश प्रक्रियेत अडचणी येतात आणि जागा शिल्लक राहतात. सामाजिक संघटनांतर्फे आरटीईबाबत जनजागृती केली जाते, असे आप पालक युनियनचे मुकुंद किर्दत यांनी सांगितले.
Harsh.Dudhe@timesgroup.com
Tweet : @@HarshDudhe_MT
पुणे : पुणे जिल्ह्यातील खासगी शाळांमध्ये प्रवेशाच्या सहा फेऱ्या झाल्यानंतरही पाच हजारांपेक्षा अधिक जागा शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) शिल्लक आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत शिल्लक जागांची आकडेवारी कमी असली, तरी प्रवेश प्रक्रियेची अंमलबजावणी व्यवस्थित होत नसल्याचे चित्र आहे. राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने शिक्षणाधिकाऱ्यांना संपूर्ण प्रकिया ३१ एप्रिलपर्यत संपविण्याचे आदेश दिले असताना ती अद्यापही सुरू आहे. ‘आरटीई’च्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होऊन पाच वर्षे झाली, तरी ही प्रवेश प्रक्रिया आर्थिक दुर्बल घटकांपर्यत पोहोचविण्यात शिक्षण विभाग अपयशी ठरला आहे.
गेल्या वर्षापर्यंत आरटीई प्रवेश प्रक्रियेला एप्रिल-मे महिन्यात सुरुवात होऊन ती सप्टेंबर महिन्यापर्यंत राबविण्यात येत होती. मात्र, शाळा जून महिन्यात सुरू होऊन सप्टेंबर महिन्यापर्यंत बराच अभ्यासक्रम शिकविला जातो. त्यामुळे आरटीई प्रवेश प्रक्रियेतून या शाळांमध्ये प्रवेश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी शिक्षण विभागाने राज्याच्या प्राथमिक विभागाच्या संचालकांना आणि जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांना आरटीईटी प्रवेश प्रक्रिया ३१ एप्रिलपर्यंतच पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. मात्र, अद्यापही पुणे जिल्ह्यात प्रवेश प्रक्रियेच्या सहा फेऱ्यांनंतरही आणखी काही फेऱ्या होण्याची शक्यता आहे.
आरटीई प्रवेश प्रक्रियेत ८४९ शाळांमध्ये १५ हजार ६९३ जागा आहेत. या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी तब्बल ३६ हजार ९३३ अर्ज आले होते. मात्र, सध्या प्रवेश प्रक्रियेतून जवळपास १० हजार ४०७ विद्यार्थ्यांना शाळांमध्ये प्रवेश मिळाला आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील शाळांमध्ये तब्बल पाच हजार २८६ जागा रिक्त आहेत. गेल्यावर्षी हा आकडा आठ हजार ९६७ होता. आरटीई प्रवेश प्रक्रिया ही समाजातील आर्थिक दुर्बल घटकांमधील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये असणाऱ्या एंट्री पॉइंटच्या वर्गात प्रवेश मिळविण्यासाठी राबविण्यात येते. त्यामुळे या प्रवेश प्रक्रियेची माहिती या घटकांपर्यत पोहोचण्याची आवश्यकता असते. प्रत्यक्षात ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचत नसल्याने ते प्रवेश प्रक्रियेत सहभागी होऊ शकत नाहीत.
शिक्षण विभागाने प्रवेश प्रक्रियेची माहिती गरजू आणि आर्थिक दुर्बल घटकांमधील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रामीण भागात जनजागृती अभियान राबविण्याची आवश्यकता होती. मात्र, शिक्षण विभागाने कोणतेच अभियान न राबविल्याने प्रवेश प्रक्रियेची माहिती वेळेवर गरजूंपर्यत पोहोचत नाही. प्राथमिक विभागाचे माजी संचालक गोविंद नांदेडे यांनी अभियान राबविण्यासाठी प्रयत्न करू, असे प्रसारमाध्यमांना सांगितले होते. प्रत्यक्षात तसे काही घडले नाही. प्रवेश प्रक्रियेत पालकांना वेबसाइटहून ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी शिक्षण मंडळ आणि जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शाळांमध्ये सुविधा निर्माण केली. मात्र, तेथेही भरपूर अडचणी आल्या. फेऱ्यांमध्ये पालकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या जात नाहीत. त्यामुळेच प्रवेश प्रक्रियेत अडचणी येतात आणि जागा शिल्लक राहतात. सामाजिक संघटनांतर्फे आरटीईबाबत जनजागृती केली जाते, असे आप पालक युनियनचे मुकुंद किर्दत यांनी सांगितले.