म. टा. प्रतिनिधी, पुणे
प्रादेशिक परिवहन कार्यालयाने मंगळवारी शहरात केलेल्या कारवाईत साठ स्कूल बस ताब्यात घेतल्याने विद्यार्थ्यांच्या परतीच्या प्रवासासाठी पालकांना धावपळ करावी लागली. ऐनवेळी या गोष्टीची माहिती मिळाल्याने पालकांना मनस्तापही सहन करावा लागला.
शालेय वाहतूक धोरणाची अंमलबजावणी न करणाऱ्या स्कूल बस विरोधात आरटीओ प्रशासनाने मंगळवारपासून कारवाई सुरू केली. आरटीओने दिवसभरात वेगवेगळ्या वेळेला कारवाई केली. त्यामुळे काही सकाळच्या सत्रातील स्कूल बस या शाळांच्या दिशेने चालल्या होत्या. तर, दुपारच्या सत्रांतील काही बस विद्यार्थ्यांना घेऊन घरी आणि काही बस शाळेत चालल्या होत्या. पहिल्या दिवशी ७७ स्कूल बस दोषी आढळल्या. त्यापैकी ६० बस आरटीओने ताब्यात घेतल्या. या वेळी काही बसमध्ये विद्यार्थी असल्यामुळे त्यांना शाळेत सोडल्यानंतर त्या बस ताब्यात घेण्यात आल्या. मात्र, या प्रकारामुळे विद्यार्थ्यांना शाळेत सोडल्यानंतर ताब्यात घेतलेल्या बसने ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना घरी जाण्यासाठी बस नसल्याने त्यांची गैरसोय झाली. काही ठिकाणी स्कूल बस चालकांनी पर्यायी व्यवस्था केली होती. तर, काही ठिकाणी स्कूल बस चालकांनी पालकांना या कारवाईची कल्पना देऊन परस्पर त्यांना व्यवस्था करण्या सांगितल्याचे निदर्शनास आले.
दरम्यान, विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांना शाळेत किंवा शाळेतून घरी सोडल्यानंतर संबंधित बस आरटीओत जमा करण्यास सांगण्यात आले. त्यासाठी आरटीओच्या अधिकाऱ्यांनी बसची कागदपत्रे ताब्यात घेऊन ठेवली होती. काही ठिकाणी स्कूल बस चालकांनी पर्यायी व्यवस्था केली होती. त्यामुळे विद्यार्थी व पालकांची गैरसोय होणार नाही, याची पुरेशी काळजी घेण्यात आली होती, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल पाटील यांनी स्पष्ट केले.
शाळा व्यवस्थापनही जबाबदार
शालेय वाहतूक धोरणाची अंमलबजावणी होत नाही, हा मुद्दा ‘मटा’ने वारंवार मांडला आहे. या धोरणाची अंमलबजावणी नेमकी कोणी करून घ्यायची हा प्रश्नही अनुत्तरीत आहे. या धोरणानुसार प्रत्येक शाळेत परिवहन समित्यांची स्थापना करणे बंधनकारक आहे. त्यानुसार शहरी भागातील बहुतांश शाळांमध्ये या समित्या निर्माण केल्या गेल्या आहेत. या समित्यांनीदेखील स्कूल बस व चालकाकडे आवश्यक कागदपत्रांची मागणी करणे, वेळोवेळी त्यांची तपासणी करणे अभिप्रेत आहे. मात्र, शाळांच्या समित्यांकडूनही या गोष्टींकडे काणाडोळा केला जात असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. आरटीओने विनापरवाना वाहतूक करणाऱ्या स्कूल बसवर कारवाई करणे अपेक्षित आहेत. मात्र, स्कूल बस ताब्यात घेतल्याने विद्यार्थ्यांची झालेली गैरसोय व पालकांची धावपळ यास शाळा व्यवस्थापन जबाबदार असल्याचे यातून दिसून येते.
प्रादेशिक परिवहन कार्यालयाने मंगळवारी शहरात केलेल्या कारवाईत साठ स्कूल बस ताब्यात घेतल्याने विद्यार्थ्यांच्या परतीच्या प्रवासासाठी पालकांना धावपळ करावी लागली. ऐनवेळी या गोष्टीची माहिती मिळाल्याने पालकांना मनस्तापही सहन करावा लागला.
शालेय वाहतूक धोरणाची अंमलबजावणी न करणाऱ्या स्कूल बस विरोधात आरटीओ प्रशासनाने मंगळवारपासून कारवाई सुरू केली. आरटीओने दिवसभरात वेगवेगळ्या वेळेला कारवाई केली. त्यामुळे काही सकाळच्या सत्रातील स्कूल बस या शाळांच्या दिशेने चालल्या होत्या. तर, दुपारच्या सत्रांतील काही बस विद्यार्थ्यांना घेऊन घरी आणि काही बस शाळेत चालल्या होत्या. पहिल्या दिवशी ७७ स्कूल बस दोषी आढळल्या. त्यापैकी ६० बस आरटीओने ताब्यात घेतल्या. या वेळी काही बसमध्ये विद्यार्थी असल्यामुळे त्यांना शाळेत सोडल्यानंतर त्या बस ताब्यात घेण्यात आल्या. मात्र, या प्रकारामुळे विद्यार्थ्यांना शाळेत सोडल्यानंतर ताब्यात घेतलेल्या बसने ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना घरी जाण्यासाठी बस नसल्याने त्यांची गैरसोय झाली. काही ठिकाणी स्कूल बस चालकांनी पर्यायी व्यवस्था केली होती. तर, काही ठिकाणी स्कूल बस चालकांनी पालकांना या कारवाईची कल्पना देऊन परस्पर त्यांना व्यवस्था करण्या सांगितल्याचे निदर्शनास आले.
दरम्यान, विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांना शाळेत किंवा शाळेतून घरी सोडल्यानंतर संबंधित बस आरटीओत जमा करण्यास सांगण्यात आले. त्यासाठी आरटीओच्या अधिकाऱ्यांनी बसची कागदपत्रे ताब्यात घेऊन ठेवली होती. काही ठिकाणी स्कूल बस चालकांनी पर्यायी व्यवस्था केली होती. त्यामुळे विद्यार्थी व पालकांची गैरसोय होणार नाही, याची पुरेशी काळजी घेण्यात आली होती, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल पाटील यांनी स्पष्ट केले.
शाळा व्यवस्थापनही जबाबदार
शालेय वाहतूक धोरणाची अंमलबजावणी होत नाही, हा मुद्दा ‘मटा’ने वारंवार मांडला आहे. या धोरणाची अंमलबजावणी नेमकी कोणी करून घ्यायची हा प्रश्नही अनुत्तरीत आहे. या धोरणानुसार प्रत्येक शाळेत परिवहन समित्यांची स्थापना करणे बंधनकारक आहे. त्यानुसार शहरी भागातील बहुतांश शाळांमध्ये या समित्या निर्माण केल्या गेल्या आहेत. या समित्यांनीदेखील स्कूल बस व चालकाकडे आवश्यक कागदपत्रांची मागणी करणे, वेळोवेळी त्यांची तपासणी करणे अभिप्रेत आहे. मात्र, शाळांच्या समित्यांकडूनही या गोष्टींकडे काणाडोळा केला जात असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. आरटीओने विनापरवाना वाहतूक करणाऱ्या स्कूल बसवर कारवाई करणे अपेक्षित आहेत. मात्र, स्कूल बस ताब्यात घेतल्याने विद्यार्थ्यांची झालेली गैरसोय व पालकांची धावपळ यास शाळा व्यवस्थापन जबाबदार असल्याचे यातून दिसून येते.