साउंड रि-रेकॉर्डिस्ट मंगेश देसाई यांच्या आठवणींत रमल्या सई परांजपे
म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘... माझा दुसरा चित्रपट ‘चष्मेबद्दूर’च्या वेळी मी मंगेशरावांसोबत पहिल्यांदा काम केले. चित्रपटाचे डबिंग करण्याच्या वेळी त्यांनी मला विचारले, ‘डबिंग कोण करणार आहे?...’ मी उत्तरले, ‘मीच’. त्या वेळी त्यांना ते फारसे रुचले नव्हते. मी दिग्दर्शक आहे म्हणजे वाटेल ते करू शकेन असे नाही, हे त्यांचे ठाम मत होते. त्यांनी काहीसे नाखुशीनेच मला डबिंग करायला ‘हो’ म्हटले. काही वेळात मी डबिंग संपवले आणि आश्चर्य म्हणजे मंगेशरावांना ते फार आवडले. मी त्यांच्या समोर आल्यावर ते म्हणाले, ‘वाह सईबाई, कमाल केली तुम्ही!’...’
भारतीय चित्रपटांचा सुवर्णकाळ गाजवणारे मंगेश देसाई या महान साउंड रि-रेकॉर्डिस्टच्या आठवणी जागवणाऱ्या ‘स्मरणांजली’ या कार्यक्रमात दिग्दर्शक सई परांजपे यांनी सांगितलेली ही हृद्य आठवण. राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेने (एफटीआयआय) आयोजिलेल्या या कार्यक्रमात परांजपे यांनी अशा अनेक आठवणी ताज्या केल्या. या वेळी इंद्रजित नियोगी, अनुज माथूर यांसह चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार-तंत्रज्ञ उपस्थित होते. संस्थेचे संचालक भूपेंद्र कँथोला हेही उपस्थित होते.
परांजपे म्हणाल्या, ‘गेल्या शतकातील जवळपास निम्मा काळ भारतातील चित्रपटसृष्टीचा शब्दशः ‘आवाज’ बनून ध्वनिमुद्रणाच्या क्षेत्रात आपला आदरयुक्त दरारा निर्माण करणारा स्वतंत्र प्रज्ञेचा माणूस म्हणून मी मंगेशरावांचे नाव घेईन. त्या काळात प्रत्येकालाच देसाई आपल्या सिनेमात हवेच असायचे; पण देसाई पैशांच्या मागे कधीही धावले नाहीत. त्यांना त्यांचे काम अधिक मोलाचे वाटे. साउंड मिक्सिंग आणि रि-रेकॉर्डिंगच्या क्षेत्रातील हा महान माणूस कामात सतत आनंद शोधण्यात धन्यता मानायचा. सर्जनाचा आनंद महत्त्वाचा मानायचा.’
...आणि ‘साउंड’ने सीन जिवंत झाला
‘नेहमीच्या सवयीनुसार देसाई यांनी ‘चष्मेबद्दूर’ची पटकथा ऐकल्यावर त्याचा अतिशय बारकाईने अभ्यास सुरू केला होता. राकेश बेदी जेव्हा दीप्ती नवलला भेटतो, तेव्हा या पहिल्याच भेटीत त्याचा अनुनयाचा प्रयत्न साफ अपयशी ठरतो. मात्र, आपल्या मित्रांकडे परतताना तो आपले हे अपयश लपवत जणू आपण दीप्तीला खूपच आवडलो आहोत, अशा थाटात थापा मारू लागतो. हा संपूर्ण सीन साउंड मिक्सिंगच्या माध्यमातून उभा करताना मंगेशरावांनी आधी कावळ्याचे रुक्ष आवाज आणि नंतर कोकिळेचे मंजूळ स्वर पार्श्वभूमीवर वापरले आहेत. हा सीन यामुळे किती वेगळ्या उंचीवर जाऊ शकला, हे वेगळे सांगायला नको,’ असा एक खुसखुशीत किस्साही सई परांजपे यांनी रंगवून सांगितला.
म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘... माझा दुसरा चित्रपट ‘चष्मेबद्दूर’च्या वेळी मी मंगेशरावांसोबत पहिल्यांदा काम केले. चित्रपटाचे डबिंग करण्याच्या वेळी त्यांनी मला विचारले, ‘डबिंग कोण करणार आहे?...’ मी उत्तरले, ‘मीच’. त्या वेळी त्यांना ते फारसे रुचले नव्हते. मी दिग्दर्शक आहे म्हणजे वाटेल ते करू शकेन असे नाही, हे त्यांचे ठाम मत होते. त्यांनी काहीसे नाखुशीनेच मला डबिंग करायला ‘हो’ म्हटले. काही वेळात मी डबिंग संपवले आणि आश्चर्य म्हणजे मंगेशरावांना ते फार आवडले. मी त्यांच्या समोर आल्यावर ते म्हणाले, ‘वाह सईबाई, कमाल केली तुम्ही!’...’
भारतीय चित्रपटांचा सुवर्णकाळ गाजवणारे मंगेश देसाई या महान साउंड रि-रेकॉर्डिस्टच्या आठवणी जागवणाऱ्या ‘स्मरणांजली’ या कार्यक्रमात दिग्दर्शक सई परांजपे यांनी सांगितलेली ही हृद्य आठवण. राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेने (एफटीआयआय) आयोजिलेल्या या कार्यक्रमात परांजपे यांनी अशा अनेक आठवणी ताज्या केल्या. या वेळी इंद्रजित नियोगी, अनुज माथूर यांसह चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार-तंत्रज्ञ उपस्थित होते. संस्थेचे संचालक भूपेंद्र कँथोला हेही उपस्थित होते.
परांजपे म्हणाल्या, ‘गेल्या शतकातील जवळपास निम्मा काळ भारतातील चित्रपटसृष्टीचा शब्दशः ‘आवाज’ बनून ध्वनिमुद्रणाच्या क्षेत्रात आपला आदरयुक्त दरारा निर्माण करणारा स्वतंत्र प्रज्ञेचा माणूस म्हणून मी मंगेशरावांचे नाव घेईन. त्या काळात प्रत्येकालाच देसाई आपल्या सिनेमात हवेच असायचे; पण देसाई पैशांच्या मागे कधीही धावले नाहीत. त्यांना त्यांचे काम अधिक मोलाचे वाटे. साउंड मिक्सिंग आणि रि-रेकॉर्डिंगच्या क्षेत्रातील हा महान माणूस कामात सतत आनंद शोधण्यात धन्यता मानायचा. सर्जनाचा आनंद महत्त्वाचा मानायचा.’
...आणि ‘साउंड’ने सीन जिवंत झाला
‘नेहमीच्या सवयीनुसार देसाई यांनी ‘चष्मेबद्दूर’ची पटकथा ऐकल्यावर त्याचा अतिशय बारकाईने अभ्यास सुरू केला होता. राकेश बेदी जेव्हा दीप्ती नवलला भेटतो, तेव्हा या पहिल्याच भेटीत त्याचा अनुनयाचा प्रयत्न साफ अपयशी ठरतो. मात्र, आपल्या मित्रांकडे परतताना तो आपले हे अपयश लपवत जणू आपण दीप्तीला खूपच आवडलो आहोत, अशा थाटात थापा मारू लागतो. हा संपूर्ण सीन साउंड मिक्सिंगच्या माध्यमातून उभा करताना मंगेशरावांनी आधी कावळ्याचे रुक्ष आवाज आणि नंतर कोकिळेचे मंजूळ स्वर पार्श्वभूमीवर वापरले आहेत. हा सीन यामुळे किती वेगळ्या उंचीवर जाऊ शकला, हे वेगळे सांगायला नको,’ असा एक खुसखुशीत किस्साही सई परांजपे यांनी रंगवून सांगितला.