म. टा. प्रतिनिधी, पुणे
छत्रपती शिवाजी महाराजांनी समर्थ रामदास स्वामींना दिलेल्या चाफळ देवस्थानाच्या व्यवस्थेसंबंधीच्या मूळ सनदेचा शोध लागला आहे. गेल्या अनेक दशकांपासून भारत इतिहास संशोधक या मूळ सनदेच्या शोधात होते. इतिहास अभ्यासक कौस्तुभ कस्तुरे आणि शिवराम कार्लेकर यांनी या सनदेचे वाचन आणि नव्याने सापडलेल्या मूळ पत्रांचे चित्र इतिहास संशोधक मंडळाच्या पाक्षिक सभेत नुकतेच प्रकाशित केले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी १५ सप्टेंबर १६७८ या दिवशी समर्थ रामदास स्वामींना एक विस्तृत सनद लिहून काही गावे इनाम दिल्याचे एक पत्र इ. स. १९०६मध्ये धुळ्याच्या शंकरराव देव यांनी ‘समर्थांची दोन जुनी चरित्रे’ या ग्रंथात प्रकाशित केले होते. त्या वेळी देव यांना या पत्राच्या मूळ प्रतींऐवजी नक्कल प्रत सापडली होती. यानंतर इतिहासाचार्य विश्वनाथ राजवाडे यांनाही या पत्राच्या काही नक्कल प्रती सापडल्या. अनेक नक्कल प्रती पुणे पुराभिलेखागारात इनाम कमिशनच्या दप्तरातही आहेत. पण, या सगळ्यांची मूळ प्रत प्रकाशात आली नव्हती, असे कस्तुरे यांनी सांगितले.
इतिहास अभ्यासक संकेत कुलकर्णी यांना मे महिन्यात लंडनमधील ब्रिटिश लायब्ररीमध्ये या पत्राची फोटोझिंकोग्राफ तंत्रज्ञानाने बनविलेली एक प्रत सापडली. यामध्ये महाराष्ट्रात आजवर सापडलेल्या नक्कल प्रतींवर जे शेरे दिले आहेत, त्यांची तपासणी केल्यास ही मूळ प्रत असल्याचे सिद्ध होते आहे. सदर सनदेवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘मर्यादेयं विराजते’ अशी अक्षरे असलेल्या एकूण अकरा मोर्तबा आहेत. एक मोर्तब पत्राच्या मुख्य बाजूवर, तर दहा मोर्तबा पत्राच्या मागील बाजूस आहेत. या पत्रातील अक्षर हे शिवकालीन प्रसिद्ध बाळाजी आवजी चिटणीसांच्या हस्ताक्षराशी मिळते जुळते आहे, असे कार्लेकर यांनी सांगितले.
‘श्रीसद् गुरूवर्य श्रीसकळतीर्थरूप श्रीकैवल्यधाम श्रीमहाराज श्रीस्वामी स्वामींचे सेवेसी चरणरज सिवाजीराजे चरणावरी मस्तक ठेऊन विज्ञापना जे’ अशा मायन्याने हे पत्र सुरू होते. पुढे शिवाजी महाराजांनी स्वतःच्या शब्दात पूर्वी समर्थांनी काय उपदेश केला त्याबद्दल थोडक्यात लिहिले आहे. लवकरच या पत्राचे छायाचित्र लोकांसाठी www.kaustubhkasture.in तसेच www.sanketkulkarni.in या वेबसाइटवर उपलब्ध होणार आहेत, असे कस्तुरे यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी समर्थ रामदास स्वामींना दिलेल्या चाफळ देवस्थानाच्या व्यवस्थेसंबंधीच्या मूळ सनदेचा शोध लागला आहे. गेल्या अनेक दशकांपासून भारत इतिहास संशोधक या मूळ सनदेच्या शोधात होते. इतिहास अभ्यासक कौस्तुभ कस्तुरे आणि शिवराम कार्लेकर यांनी या सनदेचे वाचन आणि नव्याने सापडलेल्या मूळ पत्रांचे चित्र इतिहास संशोधक मंडळाच्या पाक्षिक सभेत नुकतेच प्रकाशित केले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी १५ सप्टेंबर १६७८ या दिवशी समर्थ रामदास स्वामींना एक विस्तृत सनद लिहून काही गावे इनाम दिल्याचे एक पत्र इ. स. १९०६मध्ये धुळ्याच्या शंकरराव देव यांनी ‘समर्थांची दोन जुनी चरित्रे’ या ग्रंथात प्रकाशित केले होते. त्या वेळी देव यांना या पत्राच्या मूळ प्रतींऐवजी नक्कल प्रत सापडली होती. यानंतर इतिहासाचार्य विश्वनाथ राजवाडे यांनाही या पत्राच्या काही नक्कल प्रती सापडल्या. अनेक नक्कल प्रती पुणे पुराभिलेखागारात इनाम कमिशनच्या दप्तरातही आहेत. पण, या सगळ्यांची मूळ प्रत प्रकाशात आली नव्हती, असे कस्तुरे यांनी सांगितले.
इतिहास अभ्यासक संकेत कुलकर्णी यांना मे महिन्यात लंडनमधील ब्रिटिश लायब्ररीमध्ये या पत्राची फोटोझिंकोग्राफ तंत्रज्ञानाने बनविलेली एक प्रत सापडली. यामध्ये महाराष्ट्रात आजवर सापडलेल्या नक्कल प्रतींवर जे शेरे दिले आहेत, त्यांची तपासणी केल्यास ही मूळ प्रत असल्याचे सिद्ध होते आहे. सदर सनदेवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘मर्यादेयं विराजते’ अशी अक्षरे असलेल्या एकूण अकरा मोर्तबा आहेत. एक मोर्तब पत्राच्या मुख्य बाजूवर, तर दहा मोर्तबा पत्राच्या मागील बाजूस आहेत. या पत्रातील अक्षर हे शिवकालीन प्रसिद्ध बाळाजी आवजी चिटणीसांच्या हस्ताक्षराशी मिळते जुळते आहे, असे कार्लेकर यांनी सांगितले.
‘श्रीसद् गुरूवर्य श्रीसकळतीर्थरूप श्रीकैवल्यधाम श्रीमहाराज श्रीस्वामी स्वामींचे सेवेसी चरणरज सिवाजीराजे चरणावरी मस्तक ठेऊन विज्ञापना जे’ अशा मायन्याने हे पत्र सुरू होते. पुढे शिवाजी महाराजांनी स्वतःच्या शब्दात पूर्वी समर्थांनी काय उपदेश केला त्याबद्दल थोडक्यात लिहिले आहे. लवकरच या पत्राचे छायाचित्र लोकांसाठी www.kaustubhkasture.in तसेच www.sanketkulkarni.in या वेबसाइटवर उपलब्ध होणार आहेत, असे कस्तुरे यांनी सांगितले.