अ‍ॅपशहर

शिक्षणाच्या माहेरघरात पालकांना बाऊन्सर्सकडून पुन्हा मारहाण, पुण्यातील धक्कादायक प्रकार

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळेत बाऊन्सर न ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. पण तरीदेखील पुण्यात खाजगी शाळेत बाऊन्सर्सकडून सातत्याने पालकांना मारहाण होण्याच्या घटनेत वाढ होत आहे.

Authored byरेणुका धायबर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Apr 2022, 3:35 pm
पुणे : बिबवेवाडी येथील क्लाइन मेमोरियल शाळेनंतर पुण्यातील उंड्री येथील युरो शाळेत पुन्हा बाऊन्सरकडून पालकांना धक्काबुक्की करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. शालेय शुल्काबाबत ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी शिक्षण उपसंचालकांकडे तक्रारी केल्या होत्या त्या विद्यार्थ्यांना शाळेने मेलद्वारे टीसी देखील पाठवण्यात आले आहेत. शाळेत विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला गेला आहे. तर प्रवेशावेळी पालकांना बाऊन्सरकडून धक्काबुक्की करण्यात आली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pune news
pune news


बिबवेवाडी येथील शाळेतील बाऊन्सरकडून पालकांना झालेल्या धक्काबुक्कीचा मुद्दा विधानसभेतही चर्चिला गेला होता. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळेत बाऊन्सर न ठेवण्याच्या त्यावेळी सूचना दिल्या होत्या. या प्रकारामुळे शिक्षणमंत्र्यांच्या आदेशाला शाळेकडून केराची टोपली दाखवली गेल्याचे स्पष्ट झाले आहे. आता शिक्षणमंत्री अशा मुजोर शाळांवर काय कारवाई करतात, ते पाहावे लागेल. या प्रकारानंतर पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

वीज दुरुस्ती करताना अचानक आली लाईट, कर्मचाऱ्याचा क्षणात मृत्यू; बराच वेळ मृतदेह लोंबकळतच
ज्या महिला पालक पुष्पा चौधरी यांच्यासोबत या शाळेतील बाऊन्सर्सने धक्काबुक्की केली त्यांनी आपली आपबिती सांगताना संताप व्यक्त केला आहे. "मी माझ्या मुलाला शाळेत सोडायला आणि फी भारयला गेले होते. मात्र, शाळा प्रशासन फी घेण्यास तयार नव्हते आणि मुलालाही शाळेत घेण्यास तयार नव्हते. उलट मला शाळेच्या बाहेर काढण्यास बाऊन्सर्सच्या माध्यमातून धक्काबुक्की करण्यात करण्यात आली."

दरम्यान, पुण्यात खाजगी शाळेत बाऊन्सर्सकडून सातत्याने पालकांना मारहाण होण्याच्या घटनेत वाढ होत आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळेत बाऊन्सर न ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, शिक्षणमंत्र्यांच्या आदेशाला शाळेकडून केराच्या टोपल्या दाखवण्यात येत असल्याचे पालक म्हणत आहेत. मुळात शिक्षण संस्थांना खासगी बाऊन्सर्स ठेवण्याची गरजच काय आहे ?, यांचं काय सावकारकीचं धोरण आहे का ?, आता आमचा ना सरकारवर विश्वास आहे ना पोलिसांवर त्यामुळे आम्हाला देखील आता आमच्या संरक्षणासाठी खासगी बाऊन्सर्स ठेवावे लागतील." अशी प्रतिक्रिया पालक विजय धुमाळ यांनी दिली आहे.

खळबळजनक! ऑफिसमधून सगळे जाताच कॅशियरचं टोकाचं पाऊल, १० दिवसांवर होतं लग्न...
दरम्यान, शिक्षणाच्या माहेरघरातच अशा लाजिरवाण्या आणि संतापजनक घटना घडत असतील तर याकडे गंभीरतेने पाहणे तितकेच गरजेचे आहे. शिक्षण मंत्री बाउन्सर न ठेवण्याचे आदेश देतात पण शाळा प्रशासन मंत्र्यांच्या आदेशाला कात्रजचा घाट दाखवतात. अशात खासगी शाळांचा मुजोरपणा ठोकून काढण्यात शासन आणि प्रशासन कमी पडत हे तितकंच खरं.
लेखकाबद्दल
रेणुका धायबर
रेणुका धायबर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. डिजिटल पत्रकारितेचा आठ वर्षांचा अनुभव आहे. २०१४ पासून पत्रकारीतेत आहेत. झी २४ तास , न्यूज १८ लोकमत, टीव्ही ९ अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्र, राजकारण, गुन्हेगारी, देश, विदेश, स्पेशल बातम्या यासोबत व्यवसाय विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज