मटा ऑनलाइन वृत्त । पिंपरी
भाजप ही राष्ट्रवादीची बी टीम असून शरद पवार आणि नरेंद्र मोदी या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असं टीकास्त्र सोडतानाच गुरु-शिष्याच्या या जोडीला आता जनताच संपवेल, असा थेट हल्ला आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चढवला.
पिंपरी-चिंचवड पालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी आकुर्डी येथे झालेल्या सभेत उद्धव ठाकरे बोलत होते. पिंपरीत आल्यावर मला भाजपसोबतची युती तोडल्याचा आनंद स्पष्टपणे दिसत आहे, असे सांगतच उद्धव यांनी भाजप आणि राष्ट्रवादीचा समाचार घेतला.
लोकसभा, विधानसभा निवडणुकीआधी नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस हे शरद पवार आणि अजित पवारांविरोधात बोलत होते. मात्र सत्तेत विराजमान झाल्यानंतर तेच मोदी शरद पवार आपले राजकीय गुरू असल्याचे सांगत आहेत. अशा गुरु-शिष्याची जोडी आता संपवा, असं आवाहनच उद्धव यांनी केलं.
काय म्हणाले उद्धव ठाकरे...
- मुख्यमंत्री खोटेपणाचा मुखवटा घालून फिरत आहेत. मुख्यमंत्र्यांनी टपोरीपणा सोडावा.
- कल्याण डोंबिवलीमध्ये ६५०० कोटी देतो म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी एक दमडीही दिली नाही, म्हणूनच साहित्य संमेलनात त्यांना काळे झेंडे दाखवले गेले.
- मोदी यांनी सर्वसामान्य लोकांच्या खिशात हात घालून मोठमोठ्या उद्योगपतींचे कर्ज माफ केले.
- 'भाईयो और मित्रों' म्हटले की लोक सध्या पळून जात आहेत.
- नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर देश आत्ताच जन्माला आल्यासारखा भाजपवाल्यांचा आवेश आहे.
- मोहन भागवत यांनी देशप्रेम मोजता येत नाही हे वक्तव्य मोदींनाच उद्देशून केले.
- भाजपने राम मंदिर बाधलं आहे, पण पारदर्शक असल्यामुळे ते दिसत नाहीय.
- भ्रष्टाचाराविरोधात लढणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना पद्मभूषण आणि ज्या शरद पवारांविरुद्ध त्यांनी लढा दिला त्या पवारांना पद्मविभूषण पुरस्कार दिला जातो, हे यांचे काम.
- मध्य प्रदेशमधील 'आयएसआय'चा एजंट भाजपमध्ये कसा?
- निवडणुका जिंकण्यासाठी भाजप अत्यंत खालच्या थराला गेलं आहे.
- कधी ना कधी संयम संपतो, भावनाशून्य लोकांशी किती दिवस युती करायची, म्हणून युती तोडली.
- शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली तर या सरकारला कायमचा पाठिंबा देऊ.
- मुंबईमध्ये शिवरायांचे आशीर्वाद आणि उल्हासनगरमध्ये पप्पू कलानीचे आशीर्वाद...गुंडांना सोबत घेऊन भय मुक्त सरकार कसे करणार?
- युती तोडल्याचे समाधान वाटत आहे,कारण मला गुंडांच्या रांगेत बसायचे नव्हते. गावगुंड जमवून मंत्रालयात गुंडालय सुरू करून ते खातेही फडणवीस स्वत:कडे ठेवतील.
- शिव छत्रपतींच्या स्मारक पूजनाला जायची इच्छा नव्हती, पण महाराजांमुळे गेलो आणि आता कळतंय की, स्मारकासाठी जागा ताब्यात नाही, टेंडरही निघाले नाही, हे थापाडे आहेत.
- तुम्ही आमची कुंडली काढणार असाल तर तुमची कुंडली अधिक काळी आहे, ती आम्ही काढू.
- मुंबईच्या सत्तेसाठी किती खोटे बोलणार. मुंबईतील खड्ड्यांविषयी बोलता मग नागपुरात रस्त्यांची चाळण झाली आहे त्याचे काय?
पुणे विमानतळावर फडणवीस-उद्धव 'सामना'
देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे जाहीर सभांमधून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत असताना हे दोन्ही नेत्यांचा आज पुणे विमानतळावर समोरासमोर आले. मैत्रीत आलेल्या कटुतेमुळे या दोन्ही नेत्यांनी यावेळी एकमेकांना भेटणं टाळलं मात्र दोघांनीही एकमेकांवर कटाक्ष टाकून स्मितहास्य केलं. अवघ्या काही क्षणांतच हे दोन्ही नेते विमानतळावरून सभांस्थळी रवाना झाले.
भाजप ही राष्ट्रवादीची बी टीम असून शरद पवार आणि नरेंद्र मोदी या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असं टीकास्त्र सोडतानाच गुरु-शिष्याच्या या जोडीला आता जनताच संपवेल, असा थेट हल्ला आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चढवला.
पिंपरी-चिंचवड पालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी आकुर्डी येथे झालेल्या सभेत उद्धव ठाकरे बोलत होते. पिंपरीत आल्यावर मला भाजपसोबतची युती तोडल्याचा आनंद स्पष्टपणे दिसत आहे, असे सांगतच उद्धव यांनी भाजप आणि राष्ट्रवादीचा समाचार घेतला.
लोकसभा, विधानसभा निवडणुकीआधी नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस हे शरद पवार आणि अजित पवारांविरोधात बोलत होते. मात्र सत्तेत विराजमान झाल्यानंतर तेच मोदी शरद पवार आपले राजकीय गुरू असल्याचे सांगत आहेत. अशा गुरु-शिष्याची जोडी आता संपवा, असं आवाहनच उद्धव यांनी केलं.
काय म्हणाले उद्धव ठाकरे...
- मुख्यमंत्री खोटेपणाचा मुखवटा घालून फिरत आहेत. मुख्यमंत्र्यांनी टपोरीपणा सोडावा.
- कल्याण डोंबिवलीमध्ये ६५०० कोटी देतो म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी एक दमडीही दिली नाही, म्हणूनच साहित्य संमेलनात त्यांना काळे झेंडे दाखवले गेले.
- मोदी यांनी सर्वसामान्य लोकांच्या खिशात हात घालून मोठमोठ्या उद्योगपतींचे कर्ज माफ केले.
- 'भाईयो और मित्रों' म्हटले की लोक सध्या पळून जात आहेत.
- नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर देश आत्ताच जन्माला आल्यासारखा भाजपवाल्यांचा आवेश आहे.
- मोहन भागवत यांनी देशप्रेम मोजता येत नाही हे वक्तव्य मोदींनाच उद्देशून केले.
- भाजपने राम मंदिर बाधलं आहे, पण पारदर्शक असल्यामुळे ते दिसत नाहीय.
- भ्रष्टाचाराविरोधात लढणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना पद्मभूषण आणि ज्या शरद पवारांविरुद्ध त्यांनी लढा दिला त्या पवारांना पद्मविभूषण पुरस्कार दिला जातो, हे यांचे काम.
- मध्य प्रदेशमधील 'आयएसआय'चा एजंट भाजपमध्ये कसा?
- निवडणुका जिंकण्यासाठी भाजप अत्यंत खालच्या थराला गेलं आहे.
- कधी ना कधी संयम संपतो, भावनाशून्य लोकांशी किती दिवस युती करायची, म्हणून युती तोडली.
- शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली तर या सरकारला कायमचा पाठिंबा देऊ.
- मुंबईमध्ये शिवरायांचे आशीर्वाद आणि उल्हासनगरमध्ये पप्पू कलानीचे आशीर्वाद...गुंडांना सोबत घेऊन भय मुक्त सरकार कसे करणार?
- युती तोडल्याचे समाधान वाटत आहे,कारण मला गुंडांच्या रांगेत बसायचे नव्हते. गावगुंड जमवून मंत्रालयात गुंडालय सुरू करून ते खातेही फडणवीस स्वत:कडे ठेवतील.
- शिव छत्रपतींच्या स्मारक पूजनाला जायची इच्छा नव्हती, पण महाराजांमुळे गेलो आणि आता कळतंय की, स्मारकासाठी जागा ताब्यात नाही, टेंडरही निघाले नाही, हे थापाडे आहेत.
- तुम्ही आमची कुंडली काढणार असाल तर तुमची कुंडली अधिक काळी आहे, ती आम्ही काढू.
- मुंबईच्या सत्तेसाठी किती खोटे बोलणार. मुंबईतील खड्ड्यांविषयी बोलता मग नागपुरात रस्त्यांची चाळण झाली आहे त्याचे काय?
पुणे विमानतळावर फडणवीस-उद्धव 'सामना'
देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे जाहीर सभांमधून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत असताना हे दोन्ही नेत्यांचा आज पुणे विमानतळावर समोरासमोर आले. मैत्रीत आलेल्या कटुतेमुळे या दोन्ही नेत्यांनी यावेळी एकमेकांना भेटणं टाळलं मात्र दोघांनीही एकमेकांवर कटाक्ष टाकून स्मितहास्य केलं. अवघ्या काही क्षणांतच हे दोन्ही नेते विमानतळावरून सभांस्थळी रवाना झाले.