पुणे : पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. ही परीक्षा नव्या अभ्यासक्रमानुसार न घेता ती जुन्या अभ्यासक्रमानुसार घेण्यात यावी, अशी या विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी आहे. या आंदोनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार रात्री ११ वाजण्याच्या सुमारास दाखल दाखल झाले. त्यावेळी त्यांनी थेट मुख्यमंत्री शिंदे यांना फोन केला. विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करण्यात येणार असून दोन दिवसांत आपण बैठक घेऊ असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्याचे पवार यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन दिले असले तरी अधिकृत भूमिका येत नाही तो पर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील असे आंदोलक विद्यार्थ्यांनी सांगितले.
यावेळी संवाद साधताना शरद पवार यांनी राहुरी विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या पत्राचा उल्लेख केला. ते म्हणाले की, 'एका विद्यापीठाचे कुलगुरू मला काल भेटायला आले होते. एमपीएससीच्या अभ्यासक्रमामध्ये बदल केला गेल्याची माहिती त्यांनी मला दिली. तसेच विद्यार्थ्यांच्या मागण्या रास्त असल्याचे त्यांनी मला सांगितले. महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठातील विद्यार्थी हे याच्याविरोधात गेल्या २६ दिवसांपासून आंदोलन करत असून याचा परिणाम विद्यापीठाच्या कामावर होत असल्याचे ते म्हणाले. या विद्यार्थ्यांच्या मागण्या योग्य असल्याकारणाने आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची या प्रकरणी भेट घेऊन एक बैठक घ्या, असी विनंती करणारे एक लेखी निवेदनही त्यांनी मला दिलं.'
मुख्यमंत्र्यांनी बैठक घेण्याचं कबूल केलं आहे- पवार
पवार पुढे म्हणाले की, 'या प्रकरणी मी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांची मागणी मान्य करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी मला दिलं असून येत्या दोन दिवसात यासंबंधी एक बैठक घेण्याचंही त्यांनी कबूल केलं आहे.'
दरम्यान, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी आंदोलकर्त्या ५ विद्यार्थ्यांचं एक शिष्टमंडळ पवार यांच्या नेतृत्त्वात जाणार आहे. या आंदोलनात या शिष्टमंडळात कोण असेल याची नावेही जाहीर करण्यात आली आहेत.
अशा आहेत विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या
> एमपीएससीच्या मुख्य परीक्षेसाठी लागू करण्यात आलेला नवा अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू करावा.
> नवा पॅटर्न लागू करण्याची घाई करु नये.
> परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मुलांना किमान ५ ते ६ महिने वेळ मिळावा.
> नवा अभ्यासक्रम यूपीएससीच्या (UPSC) अभ्यासक्रमाप्रमाणे आहे. या अभ्यासक्रमाची पुस्तके मराठीतून उपलब्ध नाहीत, त्यामुळे त्यात सुधारणा करण्यात यावी .
यावेळी संवाद साधताना शरद पवार यांनी राहुरी विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या पत्राचा उल्लेख केला. ते म्हणाले की, 'एका विद्यापीठाचे कुलगुरू मला काल भेटायला आले होते. एमपीएससीच्या अभ्यासक्रमामध्ये बदल केला गेल्याची माहिती त्यांनी मला दिली. तसेच विद्यार्थ्यांच्या मागण्या रास्त असल्याचे त्यांनी मला सांगितले. महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठातील विद्यार्थी हे याच्याविरोधात गेल्या २६ दिवसांपासून आंदोलन करत असून याचा परिणाम विद्यापीठाच्या कामावर होत असल्याचे ते म्हणाले. या विद्यार्थ्यांच्या मागण्या योग्य असल्याकारणाने आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची या प्रकरणी भेट घेऊन एक बैठक घ्या, असी विनंती करणारे एक लेखी निवेदनही त्यांनी मला दिलं.'
मुख्यमंत्र्यांनी बैठक घेण्याचं कबूल केलं आहे- पवार
पवार पुढे म्हणाले की, 'या प्रकरणी मी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांची मागणी मान्य करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी मला दिलं असून येत्या दोन दिवसात यासंबंधी एक बैठक घेण्याचंही त्यांनी कबूल केलं आहे.'
दरम्यान, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी आंदोलकर्त्या ५ विद्यार्थ्यांचं एक शिष्टमंडळ पवार यांच्या नेतृत्त्वात जाणार आहे. या आंदोलनात या शिष्टमंडळात कोण असेल याची नावेही जाहीर करण्यात आली आहेत.
अशा आहेत विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या
> एमपीएससीच्या मुख्य परीक्षेसाठी लागू करण्यात आलेला नवा अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू करावा.
> नवा पॅटर्न लागू करण्याची घाई करु नये.
> परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मुलांना किमान ५ ते ६ महिने वेळ मिळावा.
> नवा अभ्यासक्रम यूपीएससीच्या (UPSC) अभ्यासक्रमाप्रमाणे आहे. या अभ्यासक्रमाची पुस्तके मराठीतून उपलब्ध नाहीत, त्यामुळे त्यात सुधारणा करण्यात यावी .