पुणे:
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात यापुढं पुणेरी पगडीऐवजी फुले पगडीचा वापर करा, असं वक्तव्य करणाऱ्या शरद पवार यांनी या मुद्द्यावरून आता वेगळाच सूर आळवला आहे. 'पगडीबाबतच्या माझ्या वक्तव्यावरून अनेक मंडळी रागावली आहेत. पण कुणाचेही मन दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. कोणत्याही एका वर्गाच्या विरोधात मला बोलायचं नव्हतं,' असं पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यात पवार यांनी छगन भुजबळ यांचा महात्मा फुले पगडी देऊन सन्मान केला होता. तसंच, यापुढं राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर पुणेरी पगडीचा वापर करू नका, त्याऐवजी फुले पगडीनं उपस्थितांचं स्वागत करा, असं पवार यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरून महाराष्ट्रात उलटसुलट चर्चा सुरू झाली होती. पवारांनी पुणेरी पगडीचा अपमान केला आहे. ते पुन्हा जातीयवादाकडं वळत आहेत, अशी टीका त्यांच्यावर होऊ लागली होती. त्यामुळं पवारांना याबाबत खुलासा करावा लागला.
पुणे महानगरपालिकेच्या एका कार्यक्रमात त्यांनी आज या प्रकरणावर भाष्य केलं. 'महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज हे माझे आदर्श आहेत. त्यामुळंच राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात मी फुले पगडीचा आग्रह धरला. यातून कुणालाही दुखावण्याचा किंवा पुण्यावर टीका करायचा हेतू नव्हता. मी पुण्यात वाढलो आहे याचा अभिमानच आहे', असं पवार म्हणाले. 'सातारा आणि कोल्हापूर येथे छत्रपती आहेत. छत्रपती हे एकच असतात. त्यामुळं त्यांची पगडी वापरता येत नाही. शाहू महाराजांची पगडी सामान्यांना सहज उपलब्ध होत नाही. डॉ. आंबेडकर यांनी परदेशी हॅट वापरली असली तरी रोजच्या आयुष्यात ते टोपी वापरत नव्हते. त्यामुळं समतेचा आणि विज्ञानाचा पुरस्कार करणाऱ्या महात्मा फुले यांचं पागोटं घालण्यात यावं, अशी माझी इच्छा होती. तेच मी बोलून दाखवलं,' असंही ते म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात यापुढं पुणेरी पगडीऐवजी फुले पगडीचा वापर करा, असं वक्तव्य करणाऱ्या शरद पवार यांनी या मुद्द्यावरून आता वेगळाच सूर आळवला आहे. 'पगडीबाबतच्या माझ्या वक्तव्यावरून अनेक मंडळी रागावली आहेत. पण कुणाचेही मन दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. कोणत्याही एका वर्गाच्या विरोधात मला बोलायचं नव्हतं,' असं पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यात पवार यांनी छगन भुजबळ यांचा महात्मा फुले पगडी देऊन सन्मान केला होता. तसंच, यापुढं राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर पुणेरी पगडीचा वापर करू नका, त्याऐवजी फुले पगडीनं उपस्थितांचं स्वागत करा, असं पवार यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरून महाराष्ट्रात उलटसुलट चर्चा सुरू झाली होती. पवारांनी पुणेरी पगडीचा अपमान केला आहे. ते पुन्हा जातीयवादाकडं वळत आहेत, अशी टीका त्यांच्यावर होऊ लागली होती. त्यामुळं पवारांना याबाबत खुलासा करावा लागला.
पुणे महानगरपालिकेच्या एका कार्यक्रमात त्यांनी आज या प्रकरणावर भाष्य केलं. 'महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज हे माझे आदर्श आहेत. त्यामुळंच राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात मी फुले पगडीचा आग्रह धरला. यातून कुणालाही दुखावण्याचा किंवा पुण्यावर टीका करायचा हेतू नव्हता. मी पुण्यात वाढलो आहे याचा अभिमानच आहे', असं पवार म्हणाले. 'सातारा आणि कोल्हापूर येथे छत्रपती आहेत. छत्रपती हे एकच असतात. त्यामुळं त्यांची पगडी वापरता येत नाही. शाहू महाराजांची पगडी सामान्यांना सहज उपलब्ध होत नाही. डॉ. आंबेडकर यांनी परदेशी हॅट वापरली असली तरी रोजच्या आयुष्यात ते टोपी वापरत नव्हते. त्यामुळं समतेचा आणि विज्ञानाचा पुरस्कार करणाऱ्या महात्मा फुले यांचं पागोटं घालण्यात यावं, अशी माझी इच्छा होती. तेच मी बोलून दाखवलं,' असंही ते म्हणाले.