आठ टक्के विद्यार्थी पारंगत
पुणे : ‘देशात कौशल्य विकासाची चर्चा सुरू असून पंतप्रधान नरेंद्र मोदीही या मुद्द्याकडे गांभीर्याने पाहत आहेत. त्यासाठी स्वतंत्र मंत्रालयही सुरू करण्यात आले आहे. प्रत्यक्षात नॉलेज कमिशनच्या अहवालानुसार देशात अवघे आठ टक्के विद्यार्थी कौशल्य विकासात पारंगत आहेत. कौशल्य विकासाचा विस्तार करण्यात आणि सर्व क्षेत्रात यशस्वी होण्याचा आत्मविश्वास असलेली पिढी घडविण्यात आपण कमी पडलो,’ अशी खंत अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी शुक्रवारी व्यक्त केली.
अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेतर्फे सुरू करण्यात आलेल्या राजर्षी शाहू अॅकॅडमी कौशल्य विकास आणि स्पर्धा परीक्षा केंद्राचे उद्घाटन करताना ते बोलत होते. माजी मंत्री आणि परिषदेचे उपाध्यक्ष शशिकांत सुतार, माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, मधुकर कोकाटे, भारत विकास ग्रुपचे अध्यक्ष हनुमंतराव गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिल पाटील, परिषदेच्या सरचिटणीस प्रमिला गायकवाड आदी या वेळी उपस्थित होते.
पवार म्हणाले, ‘राज्यात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ३० लाखांवर पोहोचली आहे. तब्बल चार हजारांवर महाविद्यालयांची संख्या आहे. मात्र, देशात अवघे आठ टक्के विद्यार्थी कौशल्य विकासात पारंगत आहेत. नावीन्यपूर्ण संशोधनाबाबत जगातील १२० देशांमध्ये भारताचे स्थान शंभरावे आहे. एकीकडे बेरोजगारी वाढत असून तरुणांमध्ये नैराश्य येत आहे, तर दुसरीकडे आवश्यक कौशल्ये असलेले कामगार मिळत नसल्याची खंत उद्योजक व्यक्त करत आहेत. त्यातून मार्ग काढण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी पुढाकार घेऊन प्रत्येक जिल्ह्यात स्पर्धा परीक्षा व कौशल्य विकासाचे केंद्र सुरू करणे गरजेचे आहे.’
या वेळी प्रभाकर देशमुख आणि मधुकर कोकाटे यांनी अॅकॅडमीतर्फे चालविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली, तर हनुमंत गायकवाड यांनी भारत विकास ग्रुपच्या कामांचा आढावा सादर केला. प्रास्ताविक शशिकांत सुतार यांनी केले.
-----------
अन् उलगडले ‘पतंजली’चे रहस्य
पल्या कर्तृत्वाने शून्यातून विश्व निर्माण करण्याचे उदाहरण देताना ‘काही वर्षांपूर्वी दशरथ माने यांनी सुरू केलेला सोनाई दूध डेअरीचा व्यवसाय आता बाराशे कोटींवर पोहोचला आहे’ असे सांगून पवार काही क्षण थांबले. ‘सध्या रामदेवबाबांच्या पतंजलीची शुद्ध दूध, तुपाची जाहिरात सगळीकडे दिसते, मात्र, सोनईचाच सगळा माल पतंजलीकडे जातो,’ अशा शब्दांत शरद पवार यांनी रामदेवबाबांच्या पतंजलीचे रहस्य उलडल्यावर सभागृहात खसखस पिकली.
----------
फोटोः ८०८० - स्वप्नील शिंदे
अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेतर्फे सुरू करण्यात आलेल्या राजर्षी शाहू अॅकॅडमी कौशल्य विकास व स्पर्धा परीक्षा केंद्राचे उद्घाटन परिषदेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी परिषदेचे उपाध्यक्ष आणि माजी मंत्री शशिकांत सुतार व सरचिटणीस प्रमिला गायकवाड व अन्य उपस्थित होते.
पुणे : ‘देशात कौशल्य विकासाची चर्चा सुरू असून पंतप्रधान नरेंद्र मोदीही या मुद्द्याकडे गांभीर्याने पाहत आहेत. त्यासाठी स्वतंत्र मंत्रालयही सुरू करण्यात आले आहे. प्रत्यक्षात नॉलेज कमिशनच्या अहवालानुसार देशात अवघे आठ टक्के विद्यार्थी कौशल्य विकासात पारंगत आहेत. कौशल्य विकासाचा विस्तार करण्यात आणि सर्व क्षेत्रात यशस्वी होण्याचा आत्मविश्वास असलेली पिढी घडविण्यात आपण कमी पडलो,’ अशी खंत अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी शुक्रवारी व्यक्त केली.
अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेतर्फे सुरू करण्यात आलेल्या राजर्षी शाहू अॅकॅडमी कौशल्य विकास आणि स्पर्धा परीक्षा केंद्राचे उद्घाटन करताना ते बोलत होते. माजी मंत्री आणि परिषदेचे उपाध्यक्ष शशिकांत सुतार, माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, मधुकर कोकाटे, भारत विकास ग्रुपचे अध्यक्ष हनुमंतराव गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिल पाटील, परिषदेच्या सरचिटणीस प्रमिला गायकवाड आदी या वेळी उपस्थित होते.
पवार म्हणाले, ‘राज्यात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ३० लाखांवर पोहोचली आहे. तब्बल चार हजारांवर महाविद्यालयांची संख्या आहे. मात्र, देशात अवघे आठ टक्के विद्यार्थी कौशल्य विकासात पारंगत आहेत. नावीन्यपूर्ण संशोधनाबाबत जगातील १२० देशांमध्ये भारताचे स्थान शंभरावे आहे. एकीकडे बेरोजगारी वाढत असून तरुणांमध्ये नैराश्य येत आहे, तर दुसरीकडे आवश्यक कौशल्ये असलेले कामगार मिळत नसल्याची खंत उद्योजक व्यक्त करत आहेत. त्यातून मार्ग काढण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी पुढाकार घेऊन प्रत्येक जिल्ह्यात स्पर्धा परीक्षा व कौशल्य विकासाचे केंद्र सुरू करणे गरजेचे आहे.’
या वेळी प्रभाकर देशमुख आणि मधुकर कोकाटे यांनी अॅकॅडमीतर्फे चालविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली, तर हनुमंत गायकवाड यांनी भारत विकास ग्रुपच्या कामांचा आढावा सादर केला. प्रास्ताविक शशिकांत सुतार यांनी केले.
-----------
अन् उलगडले ‘पतंजली’चे रहस्य
पल्या कर्तृत्वाने शून्यातून विश्व निर्माण करण्याचे उदाहरण देताना ‘काही वर्षांपूर्वी दशरथ माने यांनी सुरू केलेला सोनाई दूध डेअरीचा व्यवसाय आता बाराशे कोटींवर पोहोचला आहे’ असे सांगून पवार काही क्षण थांबले. ‘सध्या रामदेवबाबांच्या पतंजलीची शुद्ध दूध, तुपाची जाहिरात सगळीकडे दिसते, मात्र, सोनईचाच सगळा माल पतंजलीकडे जातो,’ अशा शब्दांत शरद पवार यांनी रामदेवबाबांच्या पतंजलीचे रहस्य उलडल्यावर सभागृहात खसखस पिकली.
----------
फोटोः ८०८० - स्वप्नील शिंदे
अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेतर्फे सुरू करण्यात आलेल्या राजर्षी शाहू अॅकॅडमी कौशल्य विकास व स्पर्धा परीक्षा केंद्राचे उद्घाटन परिषदेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी परिषदेचे उपाध्यक्ष आणि माजी मंत्री शशिकांत सुतार व सरचिटणीस प्रमिला गायकवाड व अन्य उपस्थित होते.