म. टा. प्रतिनिधी, पुणे/ हडपसर: नरेंद्र दाभोळकर, कॉ. गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांचा अद्याप तपास लागला नाही. त्यांच्या मारेकऱ्यांचा तपास दुसऱ्या यंत्रणेकडे द्या, अशी मागणी कुटुंबीय करीत आहेत. दुसरीकडे आमच्यासारख्या राजकीय लोकांच्या मागे ईडी, सीबीआयसारख्या यंत्रणा लावण्यात येतात. अशा तपासांच्या वेळी या यंत्रणा कुठे असतात, असा सवाल करून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर बोचरी टीका केली. 'सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना आता धडा शिकवा. त्यांना मताच्या रूपाने अधिकार गाजवत महाराष्ट्रात परिवर्तन करा,' असे आवाहन त्यांनी या वेळी केली.
राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मित्र पक्षाच्या आघाडीचे उमेदवार चेतन तुपे यांच्या प्रचारार्थ पवार यांची हडपसर येथे सभा झाली. त्या वेळी व्यासपीठावर चेतन तुपे, सुरेश घुले, माजी आमदार बाळासाहेब शिवरकर, जयदेव गायकवाड, जगन्नाथ शेवाळे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, नगरसेवक योगेश ससाणे, वैशाली बनकर, नंदा लोणकर आदी उपस्थित होते. भाजपचे अमित शहा १५ वर्षांत शरद पवारांनी काय केले, असे वारंवार विचारत आहेत. त्याचा संदर्भ देऊन पवार यांनी औद्योगिक वसाहती, महिलांना आरक्षण, मराठवाडा नामांतर, कर्जमाफी, शेतकऱ्यांना हमी भाव या निर्णयांची माहिती दिली. 'केंद्र व राज्यात भाजपाची सत्ता असताना ते आम्हाला आम्ही काय केले असे विचारत आहेत. संसार करायला तुमच्या हातात दिला. संसार करायचा सोडून भलत्यालाच तुम्ही विचारता. हे वागणे बरे नव्हे. नीट वागले पाहिजे,' असा टोला पवार यांनी फडणवीस, मोदी शहा यांना लगावला.
'सत्ता हातात असताना सत्ताधाऱ्यांनी नम्रतेने वागले पाहिजे. सत्तेचा वापर चांगल्या कामासाठी केला जातो. मात्र, भाजप युतीचे सरकार हे सत्तेचा वापर विरोधकांना शरण आणण्यासाठी, त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी करीत आहेत. माझ्यासारख्याचा महाराष्ट्र शिखर बँकेशी संबंध नसताना ईडीची कारवाई केली जाते. ईडी, सीबीआयसारख्या यंत्रणांचा योग्य कामासाठी वापर केला पाहिजे. पुण्यातील नरेंद्र दाभोळकर, कोल्हापूरचे कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचा अद्याप तपास लागत नाही. त्यांचा तपास दुसऱ्या यंत्रणेकडे द्यावा, अशी मागणी त्यांचे कुटुंबीय करीत आहेत. अशा प्रकारचा तपास या यंत्रणाकडे का दिला जात नाही,'असा सवाल पवार यांनी केला.
'देशाची आर्थिक स्थिती ढासळली आहे. काही तरी करा, असे केंद्रीय अर्थमंत्र्यांचे पती स्वतः म्हणत आहे. तरीही सत्ताधाऱ्यांना काय करायचे समजेना. नरेंद्र मोदी व अमित शहा यांना माझे नाव घेतल्याशिवाय झोप लागत नाही. माझे नाव घ्या. आपली काही तक्रार नाही,' अशी उपरोधिक टीका त्यांनी केली. 'शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचे. महाराष्ट्राचा इतिहास सांगणाऱ्या किल्ल्यांचे संवर्धन करण्याऐवजी त्या ठिकाणी बार, छमछमची व्यवस्था करणार आहे. बार आणि छमछममध्ये रस असेल तर चौफुल्याला जा,' असा सल्लाही पवार यांनी भाजप नेत्यांना दिला.
.
हडपसरचा कोणी काश्मीरला शेती करणार?
'प्रत्येक ठिकाणी मोदी, शहा प्रचाराला जात आहेत. त्या ठिकाणी ३७० कलम रद्द केल्याचे बोलत आहेत. याबाबत आम्ही आमची भूमिका पूर्वीच जाहीर केली. ३७० रद्द केले, तसेच ३७१ ही रद्द करून दाखवा. त्याचे उत्तर द्यायला तयार नाहीत. ३७० कलमाचा जयघोष सुरू आहे,' अशी टीका पवार यांनी केली. 'आता ३७० कलम समजून घेतले पाहिजे. हे कलम रद्द झाल्याने आता अनेकांना काश्मीरमध्ये जाऊन शेती करता येणार आहे. हडपसरमध्ये असा कोणी मायेचा पूत आहे का जो काश्मीरमध्ये जाऊन शेती करणार आहे,' असा सवाल पवार यांनी विचारला. त्या वेळी उपस्थितांमधून 'नाही' असा आवाज येताच खसखस पिकली.
पैलवानांच्या गोष्टी आम्हाला सांगू नका...!
'या निवडणुकीत काही दम वाटत नाही. आमचा पैलवान तयार आहे. पण समोर कोणी पैलवान दिसत नाही,' असे विधान मुख्यमंत्र्यांनी केले. त्या विधानाचा समाचार घेताना, 'मी हवे तेवढे पैलवान तयार करू शकतो. पैलवान कसे तयार करायचे याची मला माहिती आहे. मी राज्य कुस्तीगीर परिषदेचा अध्यक्ष आहे. त्याशिवाय क्रिकेटच्या महाराष्ट्र, भारत तसेच आंतरराष्ट्रीय संघटनेचा तसेच खोखो, कबड्डी या संघटनांचा अध्यक्ष होतो. त्यामुळे खेळाडू, पैलवान कसे तयार करायचे हे माहिती याची माहिती मुख्यमंत्र्यांना नसावी. राजकारणाबाहेर आपण लक्ष देतो. त्यामुळे फडणवीस आम्हाला पैलवान तयार करण्याच्या गोष्टी तुम्ही सांगू नका,' अशा शब्दांत पवारांनी मुख्यमंत्र्यांवर तोफ डागली.
राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मित्र पक्षाच्या आघाडीचे उमेदवार चेतन तुपे यांच्या प्रचारार्थ पवार यांची हडपसर येथे सभा झाली. त्या वेळी व्यासपीठावर चेतन तुपे, सुरेश घुले, माजी आमदार बाळासाहेब शिवरकर, जयदेव गायकवाड, जगन्नाथ शेवाळे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, नगरसेवक योगेश ससाणे, वैशाली बनकर, नंदा लोणकर आदी उपस्थित होते. भाजपचे अमित शहा १५ वर्षांत शरद पवारांनी काय केले, असे वारंवार विचारत आहेत. त्याचा संदर्भ देऊन पवार यांनी औद्योगिक वसाहती, महिलांना आरक्षण, मराठवाडा नामांतर, कर्जमाफी, शेतकऱ्यांना हमी भाव या निर्णयांची माहिती दिली. 'केंद्र व राज्यात भाजपाची सत्ता असताना ते आम्हाला आम्ही काय केले असे विचारत आहेत. संसार करायला तुमच्या हातात दिला. संसार करायचा सोडून भलत्यालाच तुम्ही विचारता. हे वागणे बरे नव्हे. नीट वागले पाहिजे,' असा टोला पवार यांनी फडणवीस, मोदी शहा यांना लगावला.
'सत्ता हातात असताना सत्ताधाऱ्यांनी नम्रतेने वागले पाहिजे. सत्तेचा वापर चांगल्या कामासाठी केला जातो. मात्र, भाजप युतीचे सरकार हे सत्तेचा वापर विरोधकांना शरण आणण्यासाठी, त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी करीत आहेत. माझ्यासारख्याचा महाराष्ट्र शिखर बँकेशी संबंध नसताना ईडीची कारवाई केली जाते. ईडी, सीबीआयसारख्या यंत्रणांचा योग्य कामासाठी वापर केला पाहिजे. पुण्यातील नरेंद्र दाभोळकर, कोल्हापूरचे कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचा अद्याप तपास लागत नाही. त्यांचा तपास दुसऱ्या यंत्रणेकडे द्यावा, अशी मागणी त्यांचे कुटुंबीय करीत आहेत. अशा प्रकारचा तपास या यंत्रणाकडे का दिला जात नाही,'असा सवाल पवार यांनी केला.
'देशाची आर्थिक स्थिती ढासळली आहे. काही तरी करा, असे केंद्रीय अर्थमंत्र्यांचे पती स्वतः म्हणत आहे. तरीही सत्ताधाऱ्यांना काय करायचे समजेना. नरेंद्र मोदी व अमित शहा यांना माझे नाव घेतल्याशिवाय झोप लागत नाही. माझे नाव घ्या. आपली काही तक्रार नाही,' अशी उपरोधिक टीका त्यांनी केली. 'शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचे. महाराष्ट्राचा इतिहास सांगणाऱ्या किल्ल्यांचे संवर्धन करण्याऐवजी त्या ठिकाणी बार, छमछमची व्यवस्था करणार आहे. बार आणि छमछममध्ये रस असेल तर चौफुल्याला जा,' असा सल्लाही पवार यांनी भाजप नेत्यांना दिला.
.
हडपसरचा कोणी काश्मीरला शेती करणार?
'प्रत्येक ठिकाणी मोदी, शहा प्रचाराला जात आहेत. त्या ठिकाणी ३७० कलम रद्द केल्याचे बोलत आहेत. याबाबत आम्ही आमची भूमिका पूर्वीच जाहीर केली. ३७० रद्द केले, तसेच ३७१ ही रद्द करून दाखवा. त्याचे उत्तर द्यायला तयार नाहीत. ३७० कलमाचा जयघोष सुरू आहे,' अशी टीका पवार यांनी केली. 'आता ३७० कलम समजून घेतले पाहिजे. हे कलम रद्द झाल्याने आता अनेकांना काश्मीरमध्ये जाऊन शेती करता येणार आहे. हडपसरमध्ये असा कोणी मायेचा पूत आहे का जो काश्मीरमध्ये जाऊन शेती करणार आहे,' असा सवाल पवार यांनी विचारला. त्या वेळी उपस्थितांमधून 'नाही' असा आवाज येताच खसखस पिकली.
पैलवानांच्या गोष्टी आम्हाला सांगू नका...!
'या निवडणुकीत काही दम वाटत नाही. आमचा पैलवान तयार आहे. पण समोर कोणी पैलवान दिसत नाही,' असे विधान मुख्यमंत्र्यांनी केले. त्या विधानाचा समाचार घेताना, 'मी हवे तेवढे पैलवान तयार करू शकतो. पैलवान कसे तयार करायचे याची मला माहिती आहे. मी राज्य कुस्तीगीर परिषदेचा अध्यक्ष आहे. त्याशिवाय क्रिकेटच्या महाराष्ट्र, भारत तसेच आंतरराष्ट्रीय संघटनेचा तसेच खोखो, कबड्डी या संघटनांचा अध्यक्ष होतो. त्यामुळे खेळाडू, पैलवान कसे तयार करायचे हे माहिती याची माहिती मुख्यमंत्र्यांना नसावी. राजकारणाबाहेर आपण लक्ष देतो. त्यामुळे फडणवीस आम्हाला पैलवान तयार करण्याच्या गोष्टी तुम्ही सांगू नका,' अशा शब्दांत पवारांनी मुख्यमंत्र्यांवर तोफ डागली.