अ‍ॅपशहर

अजून काय स्मार्ट करणार...

आधीच स्मार्ट असलेल्या पुण्यातील बाणेर रस्त्याला अजून काय स्मार्ट करणार, असा सवाल करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मोदींच्या कार्यक्रमाची खिल्ली उडविली. बालेवाडी येथील क्रीडा संकुलाचा विकास कोणी आणि किती दिवसांत केला, ही बाब जनतेला माहिती असल्याचाही कोपरखळीही पवार यांनी मारली.

Maharashtra Times 25 Jun 2016, 4:51 am
ज्येष्ठ नेते शरद पवार यांची टीका
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sharad pawar slams modi over smart city
अजून काय स्मार्ट करणार...


म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

आधीच स्मार्ट असलेल्या पुण्यातील बाणेर रस्त्याला अजून काय स्मार्ट करणार, असा सवाल करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मोदींच्या कार्यक्रमाची खिल्ली उडविली. बालेवाडी येथील क्रीडा संकुलाचा विकास कोणी आणि किती दिवसांत केला, ही बाब जनतेला माहिती असल्याचाही कोपरखळीही पवार यांनी मारली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी-चिंचवडमधील कार्यकर्त्यांचा मेळावा शुक्रवारी थेरगाव येथे झाला. त्या वेळी पवार बोलत होते. स्मार्ट सिटी योजनेच्या घोषणेच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत बालेवाडी येथे आज, शनिवारी कार्यक्रम होणार आहे. त्याचा संदर्भ घेत पवार म्हणाले, की ‘स्मार्ट सिटीमध्ये पुण्याची निवड केली. पिंपरी-चिंचवडची केली नाही, याबाबत आम्ही राजकारण करणार नाही. परंतु, पुण्याची निवड करताना गंजपेठ, भवानीपेठ, नाना पेठ, येरवडा झोपडपट्टी या ठिकाणी विकासकामे आवश्यक होती. आधीच स्मार्ट असलेल्या बाणेरच्या रस्त्याला आणखी काय स्मार्ट करणार आहेत, तेच समजत नाही. सहा महिन्यांत बालेवाडी क्रीडासंकुल उभारले. या ठिकाणी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धाही झाल्या. हे कोणामुळे शक्य झाले, ही बाब जनतेला माहीत आहे.’
‘स्मार्ट सिटी योजनेत पर्वती भागातील विकासकामांना प्राधान्य दिले असते तर, अधिक बरे झाले असते. तिथे घरकुले उभारली असती. वृक्षारोपण करून टेकडी हिरवीगार केली असती तर लोकांनी कौतुक केले असते. परंतु, तसे होत नसल्याची खंत वाटते,’ असेही पवार म्हणाले. केंद्राने स्मार्ट सिटी योजना जाहीर करण्यापूर्वीच पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्त्वाखालील नगरसेवकांनी योजनेची अंमलबजावणी करून या शहराचा चेहरा स्मार्ट केला आहे. त्याचा विचार करून तरी या शहराचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, ऐनवेळी वगळण्यात आले. त्याची खंत न बाळगता कार्यकर्त्यांनी ध्येयाने काम करावे, असा सल्ला पवार यांनी दिला.
....
ब्रिटनने युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याचा कौल तेथील जनतेने सार्वमताद्वारे दिला आहे. ब्रिटिश जनतेच्या या निर्णयाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार नाही, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटले आहे. तरीदेखील डॉलरच्या तुलनेत रुपया घसरणार आहे. त्याचा आपल्या अर्थव्यवस्थेवर निश्चितच परिणाम होईल.
शरद पवार

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज