Shraddha.Chamke@timesgroucp.com
Tweet :@shraddhacMT
पुणे : नागपूरहून पुण्याला येणाऱ्या 'शिवशाही' बसच्या चालक आणि वाहकाला जालन्यापासून पुण्यापर्यंतचा रस्ता अजिबातच माहिती नसल्याची धक्कादायक बाब नुकतीच घडली आहे. जालना स्थानकातून बस बाहेर पडल्यापासून पुण्यात दाखल होईलपर्यंत बसच्या दोन्ही चालकांनी आणि वाहकाने अनेकदा प्रवाशांनाच मार्ग विचारला. काही वेळेला रस्ता चुकल्याचा प्रकारही घडला. त्यामुळे 'शिवशाही' बसवर नेमणूक करताना चालक-वाहकांना पुरेसे प्रशिक्षण आणि योग्य माहिती दिली नसल्याचे दिसून येत आहे.
'एसटी'च्या संदर्भातील हा प्रकार २१ जुलैला घडला. जालना स्थानकातून बस सुटल्यापासून प्रवाशांनी चालकाला आणि वाहकाला दिलेल्या माहितीच्या आधारावर ही गाडी औरंगाबादला पोहोचली. तेथून बाहेर पडल्यानंतर पुन्हा नगरकडे कसे जायचे, हा प्रश्न पुन्हा वाहकाला पडला. दरम्यानच्या काळात दोन्ही चालकांचे मोबाइलवर सलग बोलणे सुरू होते. नगरकडे जाण्याचा मार्ग वाहकाने प्रवाशांना विचारून चालकाला सांगितला आणि गाडी नगरकडे मार्गस्थ झाली; परंतु नगरमध्ये बस दाखल झाल्यानंतर त्यांना बसस्थानक कोठे आहे, याची माहिती नव्हती. त्यांचा तो प्रश्नही प्रवाशांनीच सोडविला. नगरहून गाडी पुण्यात दाखल झाली. शिवाजीनगर येथे आकाशवाणीजवळ सिग्नलला गाडी थांबल्यावर तिघांनीही एकमेकांना 'चौकातून गाडी सरळ घ्यायची, की डावीकडे वळवायची' असा प्रश्न केला. गाडीतल्याच प्रवाशाने मार्ग सांगितल्यानंतर बस शिवाजीनगर स्थानकात दाखल झाली. अशाप्रकारे दोन चालक आणि एक वाहक असूनही या 'शिवशाही'ने प्रवाशांच्याच मार्गदर्शनाखाली जालना ते पुणे प्रवास पूर्ण केला.
रस्ता माहिती नाही, तरीही प्रवास...
जालना ते पुणे प्रवासादरम्यान चालक-वाहकांना मार्गांची माहिती नसल्याने त्यांची भंबेरी उडाली होती. ते पाहून एका प्रवाशाने वाहकाला विचारले, 'तुम्हाला मार्ग माहीत नाही का,' त्यावर त्याने 'मी एकदाच या मार्गावर येऊन गेलो आहे; त्यामुळे मार्ग माहीत नाहीत,' असे उत्तर दिले. एसटीचे मार्ग वाहक किंवा चालक यापैकी एकाला तरी माहिती असणे आवश्यक आहे. 'शिवशाही'तच असा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये 'चालकालाच मार्ग माहीत नाही आणि निघाले प्रवासाला,' अशी चर्चा रंगली होती.
Tweet :@shraddhacMT
पुणे : नागपूरहून पुण्याला येणाऱ्या 'शिवशाही' बसच्या चालक आणि वाहकाला जालन्यापासून पुण्यापर्यंतचा रस्ता अजिबातच माहिती नसल्याची धक्कादायक बाब नुकतीच घडली आहे. जालना स्थानकातून बस बाहेर पडल्यापासून पुण्यात दाखल होईलपर्यंत बसच्या दोन्ही चालकांनी आणि वाहकाने अनेकदा प्रवाशांनाच मार्ग विचारला. काही वेळेला रस्ता चुकल्याचा प्रकारही घडला. त्यामुळे 'शिवशाही' बसवर नेमणूक करताना चालक-वाहकांना पुरेसे प्रशिक्षण आणि योग्य माहिती दिली नसल्याचे दिसून येत आहे.
'एसटी'च्या संदर्भातील हा प्रकार २१ जुलैला घडला. जालना स्थानकातून बस सुटल्यापासून प्रवाशांनी चालकाला आणि वाहकाला दिलेल्या माहितीच्या आधारावर ही गाडी औरंगाबादला पोहोचली. तेथून बाहेर पडल्यानंतर पुन्हा नगरकडे कसे जायचे, हा प्रश्न पुन्हा वाहकाला पडला. दरम्यानच्या काळात दोन्ही चालकांचे मोबाइलवर सलग बोलणे सुरू होते. नगरकडे जाण्याचा मार्ग वाहकाने प्रवाशांना विचारून चालकाला सांगितला आणि गाडी नगरकडे मार्गस्थ झाली; परंतु नगरमध्ये बस दाखल झाल्यानंतर त्यांना बसस्थानक कोठे आहे, याची माहिती नव्हती. त्यांचा तो प्रश्नही प्रवाशांनीच सोडविला. नगरहून गाडी पुण्यात दाखल झाली. शिवाजीनगर येथे आकाशवाणीजवळ सिग्नलला गाडी थांबल्यावर तिघांनीही एकमेकांना 'चौकातून गाडी सरळ घ्यायची, की डावीकडे वळवायची' असा प्रश्न केला. गाडीतल्याच प्रवाशाने मार्ग सांगितल्यानंतर बस शिवाजीनगर स्थानकात दाखल झाली. अशाप्रकारे दोन चालक आणि एक वाहक असूनही या 'शिवशाही'ने प्रवाशांच्याच मार्गदर्शनाखाली जालना ते पुणे प्रवास पूर्ण केला.
रस्ता माहिती नाही, तरीही प्रवास...
जालना ते पुणे प्रवासादरम्यान चालक-वाहकांना मार्गांची माहिती नसल्याने त्यांची भंबेरी उडाली होती. ते पाहून एका प्रवाशाने वाहकाला विचारले, 'तुम्हाला मार्ग माहीत नाही का,' त्यावर त्याने 'मी एकदाच या मार्गावर येऊन गेलो आहे; त्यामुळे मार्ग माहीत नाहीत,' असे उत्तर दिले. एसटीचे मार्ग वाहक किंवा चालक यापैकी एकाला तरी माहिती असणे आवश्यक आहे. 'शिवशाही'तच असा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये 'चालकालाच मार्ग माहीत नाही आणि निघाले प्रवासाला,' अशी चर्चा रंगली होती.