म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘खरं म्हणजे मला स्वतःच स्वतःविषयी बोलणे असे जमत नाही. मी नाही बोलणार स्वतःविषयी. पण मला आज आसपास भोवताली जे घडतंय, त्याविषयी बोलायचे आहे; आज आपण कुठल्या परिस्थितीत वावरतोय ?... समाजातली ही दरी मला आतून अस्वस्थ करते. आपण असे छान नाट्यगृहात बसलेलो असताना बाहेर कुणीतरी पोटासाठी झगडतोय, हे काय आहे ?... मला हे वास्तव त्रास देतं. यावर उपाय सांगेल का कोणी ? हे बदलेल का कुणी ?...’ हृदयाला भिडणाऱ्या आणि कंप पावणाऱ्या स्वरांत पुणेकरांसमोर एकेकाळी मंच गाजवणारा ‘नटसम्राट’ बोलत होता आणि समोर उपस्थित प्रत्येक जण हा कातर स्वर ऐकून अंतर्मुख झाला होता...
डॉ. श्रीराम लागू यांचे हे सध्याच्या समाजस्थितीवर प्रश्न उपस्थित करणारे भाष्य उपस्थितांना बुधवारी ऐकायला मिळाले. पुणे नवरात्र महोत्सवाअंतर्गत दिला जाणारा यंदाचा ‘महर्षी पुरस्कार’ डॉ. लागू यांना राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी ‘सध्या समाजात जी सामाजिक अस्वस्थता आहे, ती डॉ. लागू यांच्यासारख्या अभिनेत्याच्या मनाला खिन्न करत असेल, तर समाज म्हणून आपण सगळ्यांनी त्याचा विचार करायला हवा,’ अशा शब्दांत विखे पाटील यांनीही या विषयाचे गांभीर्य अधोरेखित केले.
माजी आमदार उल्हास पवार, माजी आमदार मोहन जोशी, वास्तुविशारद महेश नामपूरकर, अंकुश काकडे, आयोजक नगरसेवक आबा बागूल, दीपा लागू आदी उपस्थित होते. अभिनेत्री ज्योती सुभाष यांनी डॉ. लागू यांच्या मानपत्राचे वाचन केले.
दरम्यान, अभिनेते प्रदीप वेलणकर यांनाही या वेळी विशेष सन्मानाने गौरविण्यात आले. पुरस्काराला उत्तर देताना वेलणकर म्हणाले, ‘मला पुण्यात स्वतःचे एक छोटेसे घर घ्यायची इच्छा आहे. मला फारसे पुरस्कार मिळालेले नाहीत. पण महत्त्वाचे दोन पुरस्कार पुण्यात मिळाले, यासाठी मी कृतज्ञ आहे. माझ्या प्रवासाचे सारे श्रेय माझ्या पत्नीला, रजनीला मी देईन.’
‘खरं म्हणजे मला स्वतःच स्वतःविषयी बोलणे असे जमत नाही. मी नाही बोलणार स्वतःविषयी. पण मला आज आसपास भोवताली जे घडतंय, त्याविषयी बोलायचे आहे; आज आपण कुठल्या परिस्थितीत वावरतोय ?... समाजातली ही दरी मला आतून अस्वस्थ करते. आपण असे छान नाट्यगृहात बसलेलो असताना बाहेर कुणीतरी पोटासाठी झगडतोय, हे काय आहे ?... मला हे वास्तव त्रास देतं. यावर उपाय सांगेल का कोणी ? हे बदलेल का कुणी ?...’ हृदयाला भिडणाऱ्या आणि कंप पावणाऱ्या स्वरांत पुणेकरांसमोर एकेकाळी मंच गाजवणारा ‘नटसम्राट’ बोलत होता आणि समोर उपस्थित प्रत्येक जण हा कातर स्वर ऐकून अंतर्मुख झाला होता...
डॉ. श्रीराम लागू यांचे हे सध्याच्या समाजस्थितीवर प्रश्न उपस्थित करणारे भाष्य उपस्थितांना बुधवारी ऐकायला मिळाले. पुणे नवरात्र महोत्सवाअंतर्गत दिला जाणारा यंदाचा ‘महर्षी पुरस्कार’ डॉ. लागू यांना राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी ‘सध्या समाजात जी सामाजिक अस्वस्थता आहे, ती डॉ. लागू यांच्यासारख्या अभिनेत्याच्या मनाला खिन्न करत असेल, तर समाज म्हणून आपण सगळ्यांनी त्याचा विचार करायला हवा,’ अशा शब्दांत विखे पाटील यांनीही या विषयाचे गांभीर्य अधोरेखित केले.
माजी आमदार उल्हास पवार, माजी आमदार मोहन जोशी, वास्तुविशारद महेश नामपूरकर, अंकुश काकडे, आयोजक नगरसेवक आबा बागूल, दीपा लागू आदी उपस्थित होते. अभिनेत्री ज्योती सुभाष यांनी डॉ. लागू यांच्या मानपत्राचे वाचन केले.
दरम्यान, अभिनेते प्रदीप वेलणकर यांनाही या वेळी विशेष सन्मानाने गौरविण्यात आले. पुरस्काराला उत्तर देताना वेलणकर म्हणाले, ‘मला पुण्यात स्वतःचे एक छोटेसे घर घ्यायची इच्छा आहे. मला फारसे पुरस्कार मिळालेले नाहीत. पण महत्त्वाचे दोन पुरस्कार पुण्यात मिळाले, यासाठी मी कृतज्ञ आहे. माझ्या प्रवासाचे सारे श्रेय माझ्या पत्नीला, रजनीला मी देईन.’