अ‍ॅपशहर

आणखी किती प्रवाशांचे बळी घेणार?: सिंधुताई

दिवसे न दिवस धोकादायक होत चाललेल्या मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर बुधवारी रात्री भीषण अपघातात २० जणांचा जीव जाता जाता वाचला. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील वाहतूक व्यवस्था असूरक्षित होत चालल्याने ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सकपाळ या उर्से टोलनाक्यावरच्या आयआरबी कर्मचाऱ्यांवर प्रचंड संतापल्या.

Maharashtra Times 19 Jan 2017, 9:43 am
मटा ऑनलाइन वृत्त । पुणे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sindhutai sapkal sparks anger after mumbai pune express way ruckus
आणखी किती प्रवाशांचे बळी घेणार?: सिंधुताई


दिवसे न दिवस धोकादायक होत चाललेल्या मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर बुधवारी रात्री भीषण अपघातात २० जणांचा जीव जाता जाता वाचला. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील वाहतूक व्यवस्था असूरक्षित होत चालल्याने ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सकपाळ या उर्से टोलनाक्यावरच्या आयआरबी कर्मचाऱ्यांवर प्रचंड संतापल्या. पैसे देऊनही या मार्गावरचा प्रवास सुरक्षित का नाही? अजून किती प्रवाशांचे बळी घेणार आहात? असे खडे बोल सुनावतानाच येत्या आठ दिवसात प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी घेतली नाही तर हजारो नागरिकांना घेऊन या महामार्गावर आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी दिला.

बुधवारी रात्री सिंधुताई मुंबईहून पुण्याला जात होत्या. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर त्यांच्या डोळ्यासमोरच भीषण अपघात होता होता टळला. या गाडीत लहानमुलांसह वीस महिलांचा समावेश होता. हे सर्व प्रवाशी थोडक्यात बचावले. पण हा सगळा प्रकार पाहून सिंधुताई मात्र प्रचंड अस्वस्थ झाल्या आणि त्यांनी प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी न घेणाऱ्या उर्से टोल नाक्याच्या कर्मचाऱ्यांना फैलावरच घेतले. आणखी किती प्रवाशांचे जीव घेणार आहात? मोठ्या गाड्यांनी टोल नाका अडवून ठेवला आहे. छोट्या गाड्या जाण्यासाठी तरी एक मार्गिका तरी ठेवा असं सांगतानाच आमच्याकडून टोलचे पैसे घेताना? कोणी अधिकार दिला तुम्हाला माणसं मारण्याचा? मोठ मोठी माणसं या एक्सप्रेसवेवर मृत्यूमुखी पडली, जखमी झाले. त्यांचे संसार उघड्यावर पडले. वीस माणसं आत्ता मेली असती. तुम्ही काय करता? असा सवालच सिंधुताईंनी केला.

कुणाला कुणाचा जीव घेण्याचा अधिका नाही. काय लावलं हे? तुम्हाला आठ दिवसाची मुदत देते. आठ दिवसात हा प्रश्न निकाली नाही काढला तर हजारो लोक घेऊन इथं बसेन असा इशाराही त्यांनी दिला. सिंधुताईंच्या या रुद्रावतारामुळे टोल नाक्यावर प्रचंड गर्दी जमली होती.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज