सिंहगडाच्या पायथ्याशी होतेय पर्यटकांची लूट
म. टा. प्रतिनिधी, पुणे
ऐन पावसाळ्यात डोणजे फाट्यावरून सिंहगडाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रिटीकरण सुरू केल्याने सध्या पर्यटकांची गैरसोय होते आहे. पर्यटकांना जाण्यासाठी सिंहगड समितीने पर्यायी रस्ता उपलब्ध केला असला, तरी स्थानिक जीपचालक संधीचा फायदा घेऊन पर्यटकांकडून दुप्पट शुल्काची आकारणी करीत आहेत.
पावसाळ्यामध्ये धुक्यात हरवलेला गड आणि आल्हाददायक वातावरण अनुभवण्यासाठी पुणेकर मोठ्या संख्येने गडावर भटकंतीसाठी जातात. पावसाळ्यातील शनिवार आणि रविवारी गडावर दहा हजारांपेक्षा जास्त पर्यटक येतात. गेल्या आठवड्यापासून पावसाला सुरूवात झाल्यामुळे पर्यटकांची पावले गडाकडे वळाली आहेत. मात्र, स्थानिक प्रशासनाने याचा विचार न करता ऐन पावसात आतकरवाडी ते डोणजे फाटा या रस्त्याच्या काँक्रिटीकरणास सुरुवात केली आहे. आतकरवाडी भागातील रस्ता पूर्ण झाला असला, तरी डोणजे चौकातून जाणाऱ्या रस्त्याचे काम अर्धवट झाल्यामुळे पर्यटकांना गावातून वळसा घालून जावे लागते आहे.
पर्यटकांच्या सोयीसाठी घेरा सिंहगड समितीने गावातून पर्यायी रस्ता काढला, तरी तो कच्चा असल्याने दुचाकी गाड्या चिखलात घसरत आहेत; तर मोठ्या गाड्यांचे चाक चिखलात रूतून बसल्याचे प्रकार होत आहेत. या मार्गावरून कसरत केल्यानंतर पर्यटक घाट रस्त्यापर्यंत पोहोचतात. पीएमपी बसही डोणजे फाट्यापर्यंत जात आहेत. यामुळे आतकरवाडीपर्यंतच्या मार्गावर राहणाऱ्या नागरिकांना चालत जाण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही.
रस्ता बंद आणि पर्यटनाचा हंगाम ही संधी ओळखून स्थानिक जीपचालकांनी पर्यटकांच्या गैरसोयीचा फायदा उठवला आहे. डोणजे फाट्याजवळच लोक बसचालकांना आत रस्ता बंद असल्याची खोटी माहिती देऊन अडवत आहेत. त्यामुळे दिवसभरात एक किंवा दोन बस आतकरवाडीपर्यंत पोहोचत आहेत. परिणामी बसने येणाऱ्या पर्यटकांना खासगी जीपचालक सांगतील ती रक्कम देण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. या संदर्भात गावकऱ्यांनी वन विभाग आणि पीएमपीला माहिती कळविली आहे. मात्र, अजून परिस्थितीत बदल झालेला नाही. वन विभागाच्या दुर्लक्षामुळे जीपचालकांचा उपद्रव वाढला असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.
गडावरील अतिक्रमणे वाढली
वाढत्या पर्यटनामुळे गडावरील हॉटेलचा व्यवसाय सध्या जोरात आहे. वर्षानुवर्षे गडावर ढाबे चालविणाऱ्यांचे उत्पन्न पाहून गेल्या वर्षभरात टप्प्याटप्याने नवीन व्यावसायिक दाखल झाले आहेत. त्यामुळे गडवरील मोकळ्या जागांवर आता हॉटेलचे जंगल वाढते आहे. वन विभागाने या अतिक्रमणाकडे वेळीच लक्ष न दिल्यास सिंहगडाचे ऐतिहासिक पावित्र्य हरवून जाईल, अशी तक्रार गावकऱ्यांनी वन विभागाकडे केली आहे.
म. टा. प्रतिनिधी, पुणे
ऐन पावसाळ्यात डोणजे फाट्यावरून सिंहगडाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रिटीकरण सुरू केल्याने सध्या पर्यटकांची गैरसोय होते आहे. पर्यटकांना जाण्यासाठी सिंहगड समितीने पर्यायी रस्ता उपलब्ध केला असला, तरी स्थानिक जीपचालक संधीचा फायदा घेऊन पर्यटकांकडून दुप्पट शुल्काची आकारणी करीत आहेत.
पावसाळ्यामध्ये धुक्यात हरवलेला गड आणि आल्हाददायक वातावरण अनुभवण्यासाठी पुणेकर मोठ्या संख्येने गडावर भटकंतीसाठी जातात. पावसाळ्यातील शनिवार आणि रविवारी गडावर दहा हजारांपेक्षा जास्त पर्यटक येतात. गेल्या आठवड्यापासून पावसाला सुरूवात झाल्यामुळे पर्यटकांची पावले गडाकडे वळाली आहेत. मात्र, स्थानिक प्रशासनाने याचा विचार न करता ऐन पावसात आतकरवाडी ते डोणजे फाटा या रस्त्याच्या काँक्रिटीकरणास सुरुवात केली आहे. आतकरवाडी भागातील रस्ता पूर्ण झाला असला, तरी डोणजे चौकातून जाणाऱ्या रस्त्याचे काम अर्धवट झाल्यामुळे पर्यटकांना गावातून वळसा घालून जावे लागते आहे.
पर्यटकांच्या सोयीसाठी घेरा सिंहगड समितीने गावातून पर्यायी रस्ता काढला, तरी तो कच्चा असल्याने दुचाकी गाड्या चिखलात घसरत आहेत; तर मोठ्या गाड्यांचे चाक चिखलात रूतून बसल्याचे प्रकार होत आहेत. या मार्गावरून कसरत केल्यानंतर पर्यटक घाट रस्त्यापर्यंत पोहोचतात. पीएमपी बसही डोणजे फाट्यापर्यंत जात आहेत. यामुळे आतकरवाडीपर्यंतच्या मार्गावर राहणाऱ्या नागरिकांना चालत जाण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही.
रस्ता बंद आणि पर्यटनाचा हंगाम ही संधी ओळखून स्थानिक जीपचालकांनी पर्यटकांच्या गैरसोयीचा फायदा उठवला आहे. डोणजे फाट्याजवळच लोक बसचालकांना आत रस्ता बंद असल्याची खोटी माहिती देऊन अडवत आहेत. त्यामुळे दिवसभरात एक किंवा दोन बस आतकरवाडीपर्यंत पोहोचत आहेत. परिणामी बसने येणाऱ्या पर्यटकांना खासगी जीपचालक सांगतील ती रक्कम देण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. या संदर्भात गावकऱ्यांनी वन विभाग आणि पीएमपीला माहिती कळविली आहे. मात्र, अजून परिस्थितीत बदल झालेला नाही. वन विभागाच्या दुर्लक्षामुळे जीपचालकांचा उपद्रव वाढला असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.
गडावरील अतिक्रमणे वाढली
वाढत्या पर्यटनामुळे गडावरील हॉटेलचा व्यवसाय सध्या जोरात आहे. वर्षानुवर्षे गडावर ढाबे चालविणाऱ्यांचे उत्पन्न पाहून गेल्या वर्षभरात टप्प्याटप्याने नवीन व्यावसायिक दाखल झाले आहेत. त्यामुळे गडवरील मोकळ्या जागांवर आता हॉटेलचे जंगल वाढते आहे. वन विभागाने या अतिक्रमणाकडे वेळीच लक्ष न दिल्यास सिंहगडाचे ऐतिहासिक पावित्र्य हरवून जाईल, अशी तक्रार गावकऱ्यांनी वन विभागाकडे केली आहे.