म. टा. प्रतिनिधी, पुणे
वाहतूक पोलिसांनी अभिनव प्रयोग राबवत बुधवारी गर्दीच्या वेळी शहरातील प्रमुख पाच रस्त्यांवर वाहतूक नियमन आणि कारवाईचा धडाका लावला. त्यामुळे भर रस्त्यात राजेशाही थाटात उभ्या राहणाऱ्या वाहन चालकांना ‘सरळ’ करण्यासह नियमांची पायमल्ली करणाऱ्या चालकांनाही दणका बसला. त्यामुळे वाहतूक सुरळीत होऊन सर्वसामान्यांना ‘व्हीआयपी’ मार्गाचा अनुभव आला.
पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी नव्याने ३०० पोलिस कर्मचारी वाहतूक पोलिसांच्या दिमतीला दिले आहेत. वाहतूक उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांनी या पोलिस कर्मचाऱ्यांना वाहतूक नियमनासाठी वेगवेगळ्या ठिकाणी तैनात केले. तर, गर्दीचे रस्ते मोकळे करण्यासाठी ६० कर्मचाऱ्यांची टीम तयार करण्यात आली.
वाहतूक पोलिस दलात पूर्वीपासून काम करत असलेले १५ पोलिस कर्मचारी आणि नव्याने वाहतूक शाखेत असलेले ४५ कर्मचारी अशा ६० कर्मचाऱ्यांना पाच रस्त्यांवर वाहतूक नियमनाची जबाबदारी देण्यात आली. एका रस्त्याला १२ कर्मचारी असे ६० कर्मचारी बाजीराव रोड, सातारा रोड, सिंहगड रोड, शिवाजी रोड आणि फर्ग्युसन रोडवर तैनात करण्यात आले आहेत. प्रत्येक रस्त्यांवरील १२ कर्मचाऱ्यांनी तीन कर्मचाऱ्यांची एक अशा तीन टीम तयार केल्या. वाहतूक शाखेतील जुना एक आणि नव्याने दाखल झालेले दोन अशा तीन टीम या रस्त्यांवर विखुरल्या. वाहतूक शाखेतील जुन्या कर्मचाऱ्यांना पावती करण्याचे अधिकार आहेत, तर नव्याने दाखल झालेले कर्मचारी वाहतूक नियमन करत होते. या कर्मचाऱ्यांनी या प्रमुख रस्त्यांचे तीन टप्पे केले आणि पायी पेट्रोलिंग करत रस्ता ‘क्लिअर’ केला.
पोलिसांकडून रस्त्यांवर वाहने उभी करून रस्ता अडवणाऱ्यांना हाकलण्यात येत होते. पोलिस पायी पेट्रोलिंग करत असल्याने उलट्या दिशेने रस्ता ओलांडण्याच्या घटना कमी घडत होत्या. रस्ता ‘क्लिअर’ करण्यासाठी चौकांमधील कर्मचारी कमी करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे चौकांमध्येही वाहतूक नियमन आणि कारवाई सुरू आहे.
वाहतूक पोलिस दलासाठी नव्याने ३०० कर्मचारी देण्यात आले आहेत. वाहतूक पोलिसांकडून वाहतूक नियमनासाठी आवश्यक असे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांच्या सूचनांचेही स्वागत आहे. सुरुवातीला रस्ता मोकळा करणे, हा प्रयत्न सुरू करण्यात आला आहे. नागरिकांनीही नियमांचे पालन करून वाहतूक पोलिसांना मदत करावी.
- रश्मी शुक्ला, पोलिस आयुक्त
‘सीसीटीव्ही’चा वापर
रस्त्यांवरील वाहतूक नियमानाची अंमलबजावणी योग्य तऱ्हेने होते की नाही, यावर निगराणी ठेवण्यासाठी ‘सीसीटीव्ही’चा वापर करण्यात आला. पोलिस कर्मचाऱ्यांनाही आपली जबाबदारी चोख बजावत गर्दीच्या वेळी रस्ते मोकळे करत सर्वसामान्यांना ‘व्हीआयपी’ मार्गाचा सुखद अनुभव दिला.
वाहतूक पोलिसांनी अभिनव प्रयोग राबवत बुधवारी गर्दीच्या वेळी शहरातील प्रमुख पाच रस्त्यांवर वाहतूक नियमन आणि कारवाईचा धडाका लावला. त्यामुळे भर रस्त्यात राजेशाही थाटात उभ्या राहणाऱ्या वाहन चालकांना ‘सरळ’ करण्यासह नियमांची पायमल्ली करणाऱ्या चालकांनाही दणका बसला. त्यामुळे वाहतूक सुरळीत होऊन सर्वसामान्यांना ‘व्हीआयपी’ मार्गाचा अनुभव आला.
पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी नव्याने ३०० पोलिस कर्मचारी वाहतूक पोलिसांच्या दिमतीला दिले आहेत. वाहतूक उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांनी या पोलिस कर्मचाऱ्यांना वाहतूक नियमनासाठी वेगवेगळ्या ठिकाणी तैनात केले. तर, गर्दीचे रस्ते मोकळे करण्यासाठी ६० कर्मचाऱ्यांची टीम तयार करण्यात आली.
वाहतूक पोलिस दलात पूर्वीपासून काम करत असलेले १५ पोलिस कर्मचारी आणि नव्याने वाहतूक शाखेत असलेले ४५ कर्मचारी अशा ६० कर्मचाऱ्यांना पाच रस्त्यांवर वाहतूक नियमनाची जबाबदारी देण्यात आली. एका रस्त्याला १२ कर्मचारी असे ६० कर्मचारी बाजीराव रोड, सातारा रोड, सिंहगड रोड, शिवाजी रोड आणि फर्ग्युसन रोडवर तैनात करण्यात आले आहेत. प्रत्येक रस्त्यांवरील १२ कर्मचाऱ्यांनी तीन कर्मचाऱ्यांची एक अशा तीन टीम तयार केल्या. वाहतूक शाखेतील जुना एक आणि नव्याने दाखल झालेले दोन अशा तीन टीम या रस्त्यांवर विखुरल्या. वाहतूक शाखेतील जुन्या कर्मचाऱ्यांना पावती करण्याचे अधिकार आहेत, तर नव्याने दाखल झालेले कर्मचारी वाहतूक नियमन करत होते. या कर्मचाऱ्यांनी या प्रमुख रस्त्यांचे तीन टप्पे केले आणि पायी पेट्रोलिंग करत रस्ता ‘क्लिअर’ केला.
पोलिसांकडून रस्त्यांवर वाहने उभी करून रस्ता अडवणाऱ्यांना हाकलण्यात येत होते. पोलिस पायी पेट्रोलिंग करत असल्याने उलट्या दिशेने रस्ता ओलांडण्याच्या घटना कमी घडत होत्या. रस्ता ‘क्लिअर’ करण्यासाठी चौकांमधील कर्मचारी कमी करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे चौकांमध्येही वाहतूक नियमन आणि कारवाई सुरू आहे.
वाहतूक पोलिस दलासाठी नव्याने ३०० कर्मचारी देण्यात आले आहेत. वाहतूक पोलिसांकडून वाहतूक नियमनासाठी आवश्यक असे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांच्या सूचनांचेही स्वागत आहे. सुरुवातीला रस्ता मोकळा करणे, हा प्रयत्न सुरू करण्यात आला आहे. नागरिकांनीही नियमांचे पालन करून वाहतूक पोलिसांना मदत करावी.
- रश्मी शुक्ला, पोलिस आयुक्त
‘सीसीटीव्ही’चा वापर
रस्त्यांवरील वाहतूक नियमानाची अंमलबजावणी योग्य तऱ्हेने होते की नाही, यावर निगराणी ठेवण्यासाठी ‘सीसीटीव्ही’चा वापर करण्यात आला. पोलिस कर्मचाऱ्यांनाही आपली जबाबदारी चोख बजावत गर्दीच्या वेळी रस्ते मोकळे करत सर्वसामान्यांना ‘व्हीआयपी’ मार्गाचा सुखद अनुभव दिला.