पुणे:
'मंदिर वही बनायेंगे' असे म्हणत किती दिवस लोकांना मूर्ख बनवत राहणार, अशा शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. २५ नोव्हेंबरला उद्धव ठाकरे अयोध्येचा दौरा करणार असून त्याआधी आज त्यांनी शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ शिवनेरीला भेट दिली.
शिवसेनेच्या वतीने आज शिवजन्मस्थळासमोरील मातीचे भूमीपूजन करण्यात आले. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते मातीकलशाचे पूजन करून हा कलश ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. ठाकरे यांनी त्यानंतर शिवनेरीवरील बाल शिवाजी आणि राजमाता जिजाऊंच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी शिवसैनिकांना संबोधित केले.
'छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व हिंदूंचे दैवत आहेत. छत्रपती शिवरायांच्या जन्मभूमीतील माती म्हणजे हिंदूंच्या भावना आहेत आणि या भावना घेऊनच मी रामाची जन्मभूमी अयोध्येला निघालो आहे. गेली अनेक वर्षे भाजप 'मंदिर वही बनायेंगे'चे नारे देत आहेत. तेव्हा खरंच हे मंदिर अस्तित्वात येणार आहे की हा फक्त एक निवडणुकीसाठीचा मुद्दा होता याचा जाब विचारण्यासाठी मी अयोध्येला जात आहे,' हे उद्धव ठाकरे म्हणाले. ते म्हणाले ,' केंद्र सरकारला चार वर्षे सत्तेत असूनही राम मंदिराबाबत काहीही करता आलेले नाही. सरकार केवळ भूलथापा मारत आहे.'
राम मंदिराच्या मुद्द्यावरून त्यांनी भाजप सडकून टीकाही केली. मोठ्या लवाजम्यासकट उद्धव ठाकरे अयोध्येला जात असले तरी अयोध्येच्या आखाड्यातील साधूसंत मात्र त्यांना भेटायला तयार नाहीत. उद्धव यांनी तेथील साधू-संतांना पाठवलेले भेटीचे निमंत्रण त्यांनी धुडकावून लावले आहे. तेव्हा उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
अयोध्येला सभा घेणार नाही
अयोध्येला राजकारण करण्यासाठी जात नाही, असं उद्धव यांनी म्हटलं आहे. तिथे जाऊन संत-महंतांच्या सत्संगमध्ये ते भाग घेणार आहेत. साधू-संतांच्या भेटी घेणार आहे. त्यामुळं अयोध्येत शिवसेनेची सभा होणार नाही, हेही स्पष्ट झालं आहे.
'मंदिर वही बनायेंगे' असे म्हणत किती दिवस लोकांना मूर्ख बनवत राहणार, अशा शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. २५ नोव्हेंबरला उद्धव ठाकरे अयोध्येचा दौरा करणार असून त्याआधी आज त्यांनी शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ शिवनेरीला भेट दिली.
शिवसेनेच्या वतीने आज शिवजन्मस्थळासमोरील मातीचे भूमीपूजन करण्यात आले. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते मातीकलशाचे पूजन करून हा कलश ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. ठाकरे यांनी त्यानंतर शिवनेरीवरील बाल शिवाजी आणि राजमाता जिजाऊंच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी शिवसैनिकांना संबोधित केले.
'छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व हिंदूंचे दैवत आहेत. छत्रपती शिवरायांच्या जन्मभूमीतील माती म्हणजे हिंदूंच्या भावना आहेत आणि या भावना घेऊनच मी रामाची जन्मभूमी अयोध्येला निघालो आहे. गेली अनेक वर्षे भाजप 'मंदिर वही बनायेंगे'चे नारे देत आहेत. तेव्हा खरंच हे मंदिर अस्तित्वात येणार आहे की हा फक्त एक निवडणुकीसाठीचा मुद्दा होता याचा जाब विचारण्यासाठी मी अयोध्येला जात आहे,' हे उद्धव ठाकरे म्हणाले. ते म्हणाले ,' केंद्र सरकारला चार वर्षे सत्तेत असूनही राम मंदिराबाबत काहीही करता आलेले नाही. सरकार केवळ भूलथापा मारत आहे.'
राम मंदिराच्या मुद्द्यावरून त्यांनी भाजप सडकून टीकाही केली. मोठ्या लवाजम्यासकट उद्धव ठाकरे अयोध्येला जात असले तरी अयोध्येच्या आखाड्यातील साधूसंत मात्र त्यांना भेटायला तयार नाहीत. उद्धव यांनी तेथील साधू-संतांना पाठवलेले भेटीचे निमंत्रण त्यांनी धुडकावून लावले आहे. तेव्हा उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
अयोध्येला सभा घेणार नाही
अयोध्येला राजकारण करण्यासाठी जात नाही, असं उद्धव यांनी म्हटलं आहे. तिथे जाऊन संत-महंतांच्या सत्संगमध्ये ते भाग घेणार आहेत. साधू-संतांच्या भेटी घेणार आहे. त्यामुळं अयोध्येत शिवसेनेची सभा होणार नाही, हेही स्पष्ट झालं आहे.