अ‍ॅपशहर

हिंदूविरोधी चित्रपटांना रोखण्याची मागणी

हिंदू धर्मातील परंपरा आणि हिंदूंच्या आस्थांविषयी विकृत दृश्ये दाखवणाऱ्या चित्रपटांना रोखा अशी एकमुखी मागणी आळंदी येथे झालेल्या वारकरी महाअधिवेशनात करण्यात आली. सनबर्न फेस्टिव्हल हद्दपार करण्यात यावा, असा ठराव या वेळी मंजूर करण्यात आला.

Maharashtra Times 20 Nov 2017, 3:15 am
हिंदू धर्मातील परंपरा आणि हिंदूंच्या आस्थांविषयी विकृत दृश्ये दाखवणाऱ्या चित्रपटांना रोखा अशी एकमुखी मागणी आळंदी येथे झालेल्या वारकरी महाअधिवेशनात करण्यात आली. सनबर्न फेस्टिव्हल हद्दपार करण्यात यावा, असा ठराव या वेळी मंजूर करण्यात आला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम stop movies against hindus said varkari mahasangh varakari mahasangh contraverasial movies pune
हिंदूविरोधी चित्रपटांना रोखण्याची मागणी

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त हिंदू जनजागृती समिती आणि वारकरी संप्रदाय यांच्या वतीने आळंदी येथील देविदास धर्मशाळा तथा मामासाहेब दांडेकर स्मृतिमंदिर येथे तेरावे वारकरी महाअधिवेशन नुकतेच झाले. अध्यक्षस्थानी स्वामी अमृताश्रम महराज होते. अधिवेशनाला निवृत्ती महाराज वक्ते, प्रकाश महाराज जवंजाळ, रामेश्वर शास्त्री महाराज, बाबुराव महाराज वाघ, कोकरे महाराज, पेनोरे महाराज, निरंजनशास्त्री कोठकर महाराज, श्याम महाराज राठोड, चोले महाराज, नारायण महाराज शिंदे उपस्थित होते.
‘गोवंश हत्याबंदी कायदा महाराष्ट्रात झाला खरा, पण त्याची कठोर अंमलबजावणी राज्यभरात व्हायला हवी,’ असे मत जवंजाळ यांनी व्यक्त केले. ‘सनबर्न फेस्टिव्हल’ समाजासाठी आणि धर्मासाठी घातक असल्याची कल्पना जनतेला नाही. प्रारंभी गोव्यात होणाऱ्या या कार्यक्रमात अंमली पदार्थांची विक्री यांसह अनेक अनैतिक गोष्टी घडत होत्या. त्याठिकाणी पोलिसांनी धाड टाकल्यावर अडीच कोटी रुपयांचे मादक पदार्थांसह ते विकणारा व्यापारीही पकडला गेला. त्यानंतर गोवा सरकारने या कार्यक्रमाला गोव्यातून हाकलून दिले. असे असताना पाश्चात्य संगीताचा कार्यक्रम म्हणून आणि महाराष्ट्र सरकारला महसूल मिळेल यासाठी सरकारने हा कार्यक्रमपुण्यात आणला. परंतु पुण्यातच अन्य ठिकाणी कार्यक्रम व्हावा यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. हिंदू धर्म, भारतीय संस्कृती नष्ट करणारा असा कार्यक्रम महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हटले जाणाऱ्या पुण्यातच नव्हे तर भारतात कुठेच होऊ नये अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने केली आहे.
हिंदू धर्मावर होणाऱ्या आघातांना परतवून लावण्यासाठी वारकरी संप्रदाय आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी सिद्ध राहायला हवे, असे आवाहन या वेळी करण्यात आले. मारुती तुणतुणे महाराज यांनी सूत्रसंचालन केले.
000
अधिवेशनातील ठराव -

- पद्मावती चित्रपटावर बंदी आणावी

- अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या भ्रष्टाचाराची चौकशी

- वारकरी संस्था, वेदपाठशाळेला शंभर कोटींचे अनुदान

- महाराष्ट्रात धर्मांतर बंदी कायदा करण्यात यावा

- पंढरपूर, आळंदी, देहू, पैठण मद्य-मांसमुक्त करावीत

- विठ्ठल-रुक्मिणी देवस्थानमधील भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई

- घटनेचे कलम ३७० रद्द करून समान नागरी कायदा करावा

- शासन अधिग्रहित मंदिरे शासनमुक्त करून भक्तांच्या स्वाधीन

- सनबर्न फेस्टिव्हल पुण्यासह भारतातून हद्दपार करावा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज