म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘देशात जेईई मेन्स आणि अॅडव्हान्स्ड परीक्षेची तयारी करण्यासाठी सुरू झालेले कोचिंग क्लासेस विद्यार्थ्यांना कैदी बनविण्याचे काम करत आहेत. हे क्लासेस विद्यार्थ्यांना केवळ परीक्षार्थी बनवून संशोधनाला खीळ घालत आहेत,’ असे परखड मत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सोमवारी व्यक्त केले.
अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेतर्फे (एआयसीटीई) आणि केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या स्मार्ट इंडिया हॅकेथॉन २०१८ चा शुभारंभ जावडेकर यांनी केला. त्या वेळी ते बोलत होते. एआयसीटीईचे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव आर. सुब्रह्मण्यम, सीओईपीचे संचालक डॉ. बी. बी. आहुजा, एआयसीटीईचे ओमप्रकाश मित्तल, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे रवींद्र साठे, आयफोरसीचे अध्यक्ष डॉ. अरुण जामकर, हॅकेथॉन संयोजन समितीचे सचिव डॉ. अभय जेरे आदी उपस्थित होते. जावडेकर यांच्या हस्ते ‘स्मार्ट इंडिया हॅकेथॉन’ या मोबाइल अॅपचा शुभारंभ करण्यात आला. या हॅकेथॉनमध्ये ५३ केंद्रीय मंत्रालय आणि २२ राज्यांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी नावीन्यपूर्ण संशोधन प्रकल्प करण्यात येणार आहे.
जावडेकर म्हणाले, ‘भारताची प्रगती इनोव्हेशनने होणार आहे. यापुढे जो देश इनोव्हेशन करील, त्याची देशाची प्रगती होणार आहे. त्यासाठी इंजिनीअरिंग विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांनी हँड्स ऑन ट्रेनिंगवर लक्ष केंद्रीत करण्याची आवश्यकता आहे. या प्रतिभासंपन्न विद्यार्थ्यांच्या क्षमता तपासण्यासाठी तसेच त्यांना कल्पनाशक्तीला बळ देण्यासाठी स्मार्ट इंडिया हॅकेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. भारताला जगातील तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता बनवायचे असल्यास नावीन्यपूर्ण संशोधन करण्याशिवाय पर्याय नाही. इनोव्हेशन करण्यात सातत्य राखल्याचे यश मिळणार आहे. मात्र, इंजिनीअरिंग प्रवेश परीक्षांची तयारी करून घेणारे कोचिंग क्लासेस इयत्ता आठवीपासूनच्या विद्यार्थ्यांना कैदी बनविण्याचे काम करत आहे. त्यामुळे संशोधनाला खीळ बसत आहेत.’
देशात इंधनानंतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंची सर्वाधिक आयात केली जाते. कारण आपल्या देशात इलेक्ट्रॉनिक हार्डवेअरची निर्मिती कमी प्रमाणात होते. त्यामुळेच यंदा हॅकेथॉनमध्ये हार्डवेअर एडिशन आहे. आपण फक्त काही सॉफ्टवेअरर्सची निर्मिती करतो आणि ते विकतो. आपण एकही सोशल मीडिया साइट्स तयार करत नाही. हे चित्र बदलण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी देशातील एक लाखापेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी या हॅकेथॉनमध्ये सहभागी झाले पाहिजे, असेही जावडेकर म्हणाले.
सुब्रह्मण्यम म्हणाले, की ‘जगात इनोव्हेशनच्याबाबतीत भारत खूप मागे आहे. आपली शिक्षण पद्धती ही पाठ्यपुस्तकांवर अधिक धारित आहे. पुस्तकात दिलेल्या अभ्यासक्रमांची घोकंपट्टी करून गुण मिळवायचे आणि नोकऱ्या मिळवायच्या, असे देशात सुरू आहे. इनोव्हेशनशिवाय देशाची प्रगती होणार नाही. ‘स्टार्टअप इंडिया’ला गती मिळणार नाही. तसेच, रोजगारनिर्मिती देखील होणार नाही. त्यामुळेच विद्यार्थ्यांनी शिकण्यात 'इनोव्हेशन' आणण्याची गरज असून त्याद्वारे सामाजिक समस्यांवर उपाय शोधावे.’
डॉ.जेरे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. दिलीप मालखेडे यांनी सूत्रसंचालन केले. हॅकेथॉनची अधिक माहिती www.i4c.co.in व www.innovate.mygov.in या वेबसाइटवर मिळेल.
‘शूटिंगचा निर्णय राज्याने घ्यावा’
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राज्य सरकारच्या अखत्यारित येते. त्यामुळे विद्यापीठाने शूटिंगसाठी मैदान दीड महिन्यासाठी भाड्याने दिले असल्यास याबाबतचा योग्य निर्णय राज्य सरकारने घ्यावा, असे जावडेकर यांनी पत्रकारांनी विचारलेले प्रश्नावर उत्तर दिले. तसेच, त्यांनी कोचिंग क्लासेसबाबतच्या योजनेवर अधिक बोलण्यास नकार दिला.
‘देशात जेईई मेन्स आणि अॅडव्हान्स्ड परीक्षेची तयारी करण्यासाठी सुरू झालेले कोचिंग क्लासेस विद्यार्थ्यांना कैदी बनविण्याचे काम करत आहेत. हे क्लासेस विद्यार्थ्यांना केवळ परीक्षार्थी बनवून संशोधनाला खीळ घालत आहेत,’ असे परखड मत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सोमवारी व्यक्त केले.
अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेतर्फे (एआयसीटीई) आणि केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या स्मार्ट इंडिया हॅकेथॉन २०१८ चा शुभारंभ जावडेकर यांनी केला. त्या वेळी ते बोलत होते. एआयसीटीईचे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव आर. सुब्रह्मण्यम, सीओईपीचे संचालक डॉ. बी. बी. आहुजा, एआयसीटीईचे ओमप्रकाश मित्तल, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे रवींद्र साठे, आयफोरसीचे अध्यक्ष डॉ. अरुण जामकर, हॅकेथॉन संयोजन समितीचे सचिव डॉ. अभय जेरे आदी उपस्थित होते. जावडेकर यांच्या हस्ते ‘स्मार्ट इंडिया हॅकेथॉन’ या मोबाइल अॅपचा शुभारंभ करण्यात आला. या हॅकेथॉनमध्ये ५३ केंद्रीय मंत्रालय आणि २२ राज्यांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी नावीन्यपूर्ण संशोधन प्रकल्प करण्यात येणार आहे.
जावडेकर म्हणाले, ‘भारताची प्रगती इनोव्हेशनने होणार आहे. यापुढे जो देश इनोव्हेशन करील, त्याची देशाची प्रगती होणार आहे. त्यासाठी इंजिनीअरिंग विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांनी हँड्स ऑन ट्रेनिंगवर लक्ष केंद्रीत करण्याची आवश्यकता आहे. या प्रतिभासंपन्न विद्यार्थ्यांच्या क्षमता तपासण्यासाठी तसेच त्यांना कल्पनाशक्तीला बळ देण्यासाठी स्मार्ट इंडिया हॅकेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. भारताला जगातील तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता बनवायचे असल्यास नावीन्यपूर्ण संशोधन करण्याशिवाय पर्याय नाही. इनोव्हेशन करण्यात सातत्य राखल्याचे यश मिळणार आहे. मात्र, इंजिनीअरिंग प्रवेश परीक्षांची तयारी करून घेणारे कोचिंग क्लासेस इयत्ता आठवीपासूनच्या विद्यार्थ्यांना कैदी बनविण्याचे काम करत आहे. त्यामुळे संशोधनाला खीळ बसत आहेत.’
देशात इंधनानंतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंची सर्वाधिक आयात केली जाते. कारण आपल्या देशात इलेक्ट्रॉनिक हार्डवेअरची निर्मिती कमी प्रमाणात होते. त्यामुळेच यंदा हॅकेथॉनमध्ये हार्डवेअर एडिशन आहे. आपण फक्त काही सॉफ्टवेअरर्सची निर्मिती करतो आणि ते विकतो. आपण एकही सोशल मीडिया साइट्स तयार करत नाही. हे चित्र बदलण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी देशातील एक लाखापेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी या हॅकेथॉनमध्ये सहभागी झाले पाहिजे, असेही जावडेकर म्हणाले.
सुब्रह्मण्यम म्हणाले, की ‘जगात इनोव्हेशनच्याबाबतीत भारत खूप मागे आहे. आपली शिक्षण पद्धती ही पाठ्यपुस्तकांवर अधिक धारित आहे. पुस्तकात दिलेल्या अभ्यासक्रमांची घोकंपट्टी करून गुण मिळवायचे आणि नोकऱ्या मिळवायच्या, असे देशात सुरू आहे. इनोव्हेशनशिवाय देशाची प्रगती होणार नाही. ‘स्टार्टअप इंडिया’ला गती मिळणार नाही. तसेच, रोजगारनिर्मिती देखील होणार नाही. त्यामुळेच विद्यार्थ्यांनी शिकण्यात 'इनोव्हेशन' आणण्याची गरज असून त्याद्वारे सामाजिक समस्यांवर उपाय शोधावे.’
डॉ.जेरे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. दिलीप मालखेडे यांनी सूत्रसंचालन केले. हॅकेथॉनची अधिक माहिती www.i4c.co.in व www.innovate.mygov.in या वेबसाइटवर मिळेल.
‘शूटिंगचा निर्णय राज्याने घ्यावा’
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राज्य सरकारच्या अखत्यारित येते. त्यामुळे विद्यापीठाने शूटिंगसाठी मैदान दीड महिन्यासाठी भाड्याने दिले असल्यास याबाबतचा योग्य निर्णय राज्य सरकारने घ्यावा, असे जावडेकर यांनी पत्रकारांनी विचारलेले प्रश्नावर उत्तर दिले. तसेच, त्यांनी कोचिंग क्लासेसबाबतच्या योजनेवर अधिक बोलण्यास नकार दिला.