अ‍ॅपशहर

नागरिकांना विश्वासात घेऊनच विकास आराखडा

‘श्री क्षेत्र भीमाशंकरच्या विकास आराखड्यासाठी राज्य सरकारने १८० कोटी रुपयांचा निधी दिला असून, स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊनच विकास आराखडा मंजूर केला जाईल,’ असे आश्वासन राज्याचे अर्थ आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

Maharashtra Times 24 Aug 2016, 3:00 am
‘भीमा शंकर’साठी सरकारचे आश्वासन; १८० कोटींचा निधी मंजूर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sudheer mungantiwar bheemashankar
नागरिकांना विश्वासात घेऊनच विकास आराखडा

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘श्री क्षेत्र भीमाशंकरच्या विकास आराखड्यासाठी राज्य सरकारने १८० कोटी रुपयांचा निधी दिला असून, स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊनच विकास आराखडा मंजूर केला जाईल,’ असे आश्वासन राज्याचे अर्थ आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
श्रावणी सोमवारनिमित्त मुनगंटीवार हे भीमाशंकर येथे दर्शनासाठी आले होते. त्या वेळी भीमाशंकर ग्रामस्थ कृती समितीच्या वतीने त्यांना निवेदन देऊन विकास आराखड्यावर चर्चा करण्यात आली. या वेळी समितीचे अध्यक्ष संतोष कोडिलकर, आंबेगाव तालुक्याचे प्रांताधिकारी कल्याणराव पांढरे, मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये, उपविभागीय पोलिस निरीक्षक मितेश घटटे, वनरक्षक तुषार ढमढेरे, देवस्थानचे विश्वस्त आणि खेडचे तहसीलदार सुनील जोशी, आंबेगावचे तहसीलदार रवींद्र सबनीस, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व खेड तालुका भाजपाचे अध्यक्ष अतुल देशमुख तसेच भीमाशंकर देवस्थानचे सहकारी विश्वस्त सुरेश कौदरे, रत्नाकर कोडिलकर, मधुकर गंवादे, दत्तात्रय कौदरे, रवींद्र शिर्के, कैलास डामसे आदी उपस्थित होते.
मुनगंटीवार म्हणाले, ‘भीमाशंकर विकास आराखडा अंतिम करण्यापूर्वी देवस्थान समिती आणि ग्रामस्थ कृती समिती यांच्या समोर आराखड्याचे सादरीकरण करण्यात येईल. या विकास आराखडयामध्ये गॅलरीच्या जागेत देवस्थानचे कार्यालय व हॉल बांधणे, पोलिस स्टेशन, आरोग्य केंद्र, मंदिराजवळ येण्यासाठी कॉंक्रिट रस्ता, मंदिर परिसराचे सुशोभीकरण करणे, एसटी स्थानकाजवळ धर्मशाळा, भोजनालय, भक्त निवास उभारणे, अस्तित्वात असलेल्या दोन धर्मशाळा दुमजली बांधणे आदी कामे करण्यात येणार आहेत.’
‘आराखड्यात बाधित होणाऱ्या दुकानांचे पुनर्वसन केले जाणार आहे. या विकास कामांसाठी सुमारे १८० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे,’ असेही ते म्हणाले.
..
‘आराखड्यात बाधित होणाऱ्या दुकानांचे पुनर्वसन केले जाणार आहे. या विकास कामांसाठी सुमारे १८० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे विकास आराखड्याचे कामही नागरिकांना विश्वासात घेऊनच केले जाईल.
- सुधीर मुनगंटीवार, अर्थ आणि वनमंत्री

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज