म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्माच्या नावावर चालणाऱ्या शक्तींना आयुष्यभर विरोध केला, त्यांच्यासोबत तुम्ही आघाडी करता आणि धर्मांध शक्तीला मते मिळवून निवडून देता... तुम्ही कुणाला साथ दिली,’ असा खडा सवाल माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांना केला. उत्तर प्रदेशात एका तरुणाला कॉटवर बांधून जाळले जाते, बेंगळुरूत भाजपच्या मागासवर्गीय खासदाराला गावात प्रवेश करू दिला जात नाही, मग लोकशाही कुठेय.. या सत्ताधाऱ्यांना लाज वाटली पाहिजे’ असे ताशेरेही त्यांनी ओढले.
पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त रिपब्लिकन युवा मोर्चा महाराष्ट्रतर्फे काँग्रेसचे नेते रमेश बागवे यांना आंबेडकर-नेहरू मैत्री पुरस्कार प्रदान करताना ते बोलत होते. ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे, उल्हास पवार, बाळासाहेब शिवरकर, मोहन जोशी, अभय छाजेड, अरविंद शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे, आयोजक राहुल डंबाळे आदी उपस्थित होते. जवाहरलाल नेहरूंना पंतप्रधान करा असे सरदार पटेल यांनीच सांगितल्याचा इतिहास लपवून ठेवला जात असल्याची खंत व्यक्त करून सुशीलकुमार शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर टीकेची झोड उठवली. ‘सोलापूर येथे अमित शहांच्या सभेपूर्वी दुसरे सरदार पटेल जन्माला आल्याचे बोर्ड लावण्यात आले. मात्र, कलम ३७० रद्द केल्याने कोणालाही सरदार पटेल होता येत नाही. काश्मीरमध्ये महिनाभरानंतरही शाळा, संपर्क यंत्रणा सुरू नाही. त्याची दखल सर्वोच्च न्यायालयाला घ्यावी लागते. मोदींना पुतीन यांच्यासारखे हुकूमशहा व्हायचे आहे. मात्र, ते देश सांभाळू शकणार नाही’ असा टोलाही त्यांनी लगावला. सुवर्णा डंबाळे यांनी प्रास्ताविक केले.
देशाला आरएसएस-भाजपचे ग्रहण
‘आरक्षणामुळेच मागासवर्गीयांना प्रगतीची संधी प्राप्त होते, तसेच आधी धर्म, जात, समाज व्यवस्थेची समीक्षा करा, मग आरक्षणाची समीक्षा करा’, अशी टीका करून जोगेंद्र कवाडे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरक्षणाबाबत केलेल्या विधानाचा समाचार घेतला. ‘या देशाच्या संविधान, समता, बंधुतेला आरएसएस-भाजपरूपी ग्रहण लागले आहे. त्यातून सुटण्यासाठी आघाडीला मतांचे दान द्या,’ असे आवाहन त्यांनी केले. तर ‘सर्व तूप तुमच्या वाट्याला घेऊन घटक पक्षाला विसरू नका,’ अशी टिप्पणीही त्यांनी आघाडीतील जागावाटपावर केली.
पक्षांतर म्हणजे राजकारणाचे भणंगीकरण
‘सिद्धांत, तत्त्वांसाठी पक्ष बदलणे समजू शकतो, पण सध्याचे पक्षांतर म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाचे भणंगीकरण आहे. पन्नास वर्षे साखर कारखाने, सूतगिरण्यांद्वारे साम्राज्य निर्माण करणारे, आता तिकीट मिळणार नाही किंवा ‘ईडी’ची नोटीस येऊन तुरुंगात जावे लागेल, या भीतीपोटी पक्ष बदलत आहेत,’ असा उद्वेग भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केला.
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्माच्या नावावर चालणाऱ्या शक्तींना आयुष्यभर विरोध केला, त्यांच्यासोबत तुम्ही आघाडी करता आणि धर्मांध शक्तीला मते मिळवून निवडून देता... तुम्ही कुणाला साथ दिली,’ असा खडा सवाल माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांना केला. उत्तर प्रदेशात एका तरुणाला कॉटवर बांधून जाळले जाते, बेंगळुरूत भाजपच्या मागासवर्गीय खासदाराला गावात प्रवेश करू दिला जात नाही, मग लोकशाही कुठेय.. या सत्ताधाऱ्यांना लाज वाटली पाहिजे’ असे ताशेरेही त्यांनी ओढले.
पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त रिपब्लिकन युवा मोर्चा महाराष्ट्रतर्फे काँग्रेसचे नेते रमेश बागवे यांना आंबेडकर-नेहरू मैत्री पुरस्कार प्रदान करताना ते बोलत होते. ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे, उल्हास पवार, बाळासाहेब शिवरकर, मोहन जोशी, अभय छाजेड, अरविंद शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे, आयोजक राहुल डंबाळे आदी उपस्थित होते. जवाहरलाल नेहरूंना पंतप्रधान करा असे सरदार पटेल यांनीच सांगितल्याचा इतिहास लपवून ठेवला जात असल्याची खंत व्यक्त करून सुशीलकुमार शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर टीकेची झोड उठवली. ‘सोलापूर येथे अमित शहांच्या सभेपूर्वी दुसरे सरदार पटेल जन्माला आल्याचे बोर्ड लावण्यात आले. मात्र, कलम ३७० रद्द केल्याने कोणालाही सरदार पटेल होता येत नाही. काश्मीरमध्ये महिनाभरानंतरही शाळा, संपर्क यंत्रणा सुरू नाही. त्याची दखल सर्वोच्च न्यायालयाला घ्यावी लागते. मोदींना पुतीन यांच्यासारखे हुकूमशहा व्हायचे आहे. मात्र, ते देश सांभाळू शकणार नाही’ असा टोलाही त्यांनी लगावला. सुवर्णा डंबाळे यांनी प्रास्ताविक केले.
देशाला आरएसएस-भाजपचे ग्रहण
‘आरक्षणामुळेच मागासवर्गीयांना प्रगतीची संधी प्राप्त होते, तसेच आधी धर्म, जात, समाज व्यवस्थेची समीक्षा करा, मग आरक्षणाची समीक्षा करा’, अशी टीका करून जोगेंद्र कवाडे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरक्षणाबाबत केलेल्या विधानाचा समाचार घेतला. ‘या देशाच्या संविधान, समता, बंधुतेला आरएसएस-भाजपरूपी ग्रहण लागले आहे. त्यातून सुटण्यासाठी आघाडीला मतांचे दान द्या,’ असे आवाहन त्यांनी केले. तर ‘सर्व तूप तुमच्या वाट्याला घेऊन घटक पक्षाला विसरू नका,’ अशी टिप्पणीही त्यांनी आघाडीतील जागावाटपावर केली.
पक्षांतर म्हणजे राजकारणाचे भणंगीकरण
‘सिद्धांत, तत्त्वांसाठी पक्ष बदलणे समजू शकतो, पण सध्याचे पक्षांतर म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाचे भणंगीकरण आहे. पन्नास वर्षे साखर कारखाने, सूतगिरण्यांद्वारे साम्राज्य निर्माण करणारे, आता तिकीट मिळणार नाही किंवा ‘ईडी’ची नोटीस येऊन तुरुंगात जावे लागेल, या भीतीपोटी पक्ष बदलत आहेत,’ असा उद्वेग भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केला.