'महाराष्ट्र टाइम्स'च्या 'पुणे सुपरफास्ट' उपक्रमांतर्गत शनिवारी कार्यक्रम
म. टा. प्रतिनिधी, पुणे
वेगाने विकसित होत असलेल्या पुण्यातील पायाभूत सुविधांच्या निर्मितीवर; तसेच रस्ते आणि वाहतुकीच्या समस्यांवर चर्चा करून ठोस उपाय सुचविण्यासाठी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी 'महाराष्ट्र टाइम्स'च्या 'पुणे सुपरफास्ट'च्या व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत. मेट्रोपासून रिंगरोडपर्यंत आणि विमानतळापासून ते महामार्गांपर्यंतच्या अनेक विषयांवर ते निमंत्रितांशी संवाद साधणार असून, हा कार्यक्रम येत्या शनिवारी (१२ मे) सायंकाळी साडेपाच वाजता 'यशदा'च्या सभागृहात होणार आहे. धडाकेबाज निर्णय घेण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या गडकरी यांच्याकडून पुण्यालगतच्या वाहतूक समस्यांवर 'सुपरफास्ट' कार्यवाही होण्याची अपेक्षा आहे.
सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणारे विविध प्रश्न सोडविण्यासाठी 'मटा'ने 'पुणे सुपरफास्ट' या व्यासपीठाची निर्मिती केली आहे. 'पुणे सुपरफास्ट'च्या व्यासपीठावरून यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे, माजी पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी विविध समस्या निराकरणाच्या दृष्टीने मार्गदर्शन केले आहे. याच मालिकेत आता नितीन गडकरी शहर आणि परिसरातील पायाभूत सुविधांबाबत संवाद साधणार आहेत. हा कार्यक्रम फक्त निमंत्रितांसाठी आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवड आणि लगतच्या परिसरामध्ये सध्या सर्वाधिक मोठी समस्या वाहतुकीची आहे. शहरातून जाणारे महामार्ग रुंद झाले, तरीही ते वाढत्या वाहतुकीला अपुरेच पडत आहेत. एका महामार्गावरून येणारी वाहतूक दुसऱ्या महामार्गाकडे जाताना विनाकारण शहरात येत असल्याने कोंडीत आणखी भर पडत आहे. शहराभोवतीच्या विविध महामार्गांना जोडण्यासाठीच्या रिंग रोडला गती मिळाली असली, तरी अद्याप त्याचे काम सुरू होऊ शकलेले नाही. शहर आणि परिसरालगतच्या खासगी वाहनांवर निर्बंध घालण्यासाठी सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने, शहर आणि परिसरात मेट्रोचे जाळे निर्माण करण्याची मागणी सर्व स्तरांतून केली जात आहे.
राज्यामध्ये १९९५ मध्ये शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीच्या सरकारच्या काळात सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून नितीन गडकरी यांची कामगिरी लक्षवेधी ठरली होती. पुणे-मुंबई दरम्यानचा प्रवासाचा वेळ वाचविण्यासाठी द्रुतगती महामार्गाची संकल्पना प्रत्यक्ष उतरविण्यात त्यांचा प्रमुख वाटा आहे. मुंबईत एकावेळी ५५ उड्डाणपुलांची निर्मिती त्यांच्या काळत झाली होती. गेल्या चार वर्षांपासून केंद्रीय दळणवळण मंत्री म्हणूनही त्यांनी रस्ते निर्मितीवर सर्वाधिक भर दिला आहे. अनेक राज्य महामार्गांना राष्ट्रीय महामार्गांचा दर्जा देऊन त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. देशातील रस्त्यांचे जाळे सुधारण्यासाठी 'भारतमाला' प्रकल्पांतर्गत कोट्यवधींची कामे केली जाणार आहेत. गडकरी यांच्या वेगवान कार्यपद्धतीनुसार शहरालगतच्या प्रश्नांवरही त्यांच्याकडून 'पुणे सुपरफास्ट' कार्यक्रमात गतिमान उत्तरे मिळतील, अशी अपेक्षा आहे.
म. टा. प्रतिनिधी, पुणे
वेगाने विकसित होत असलेल्या पुण्यातील पायाभूत सुविधांच्या निर्मितीवर; तसेच रस्ते आणि वाहतुकीच्या समस्यांवर चर्चा करून ठोस उपाय सुचविण्यासाठी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी 'महाराष्ट्र टाइम्स'च्या 'पुणे सुपरफास्ट'च्या व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत. मेट्रोपासून रिंगरोडपर्यंत आणि विमानतळापासून ते महामार्गांपर्यंतच्या अनेक विषयांवर ते निमंत्रितांशी संवाद साधणार असून, हा कार्यक्रम येत्या शनिवारी (१२ मे) सायंकाळी साडेपाच वाजता 'यशदा'च्या सभागृहात होणार आहे. धडाकेबाज निर्णय घेण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या गडकरी यांच्याकडून पुण्यालगतच्या वाहतूक समस्यांवर 'सुपरफास्ट' कार्यवाही होण्याची अपेक्षा आहे.
सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणारे विविध प्रश्न सोडविण्यासाठी 'मटा'ने 'पुणे सुपरफास्ट' या व्यासपीठाची निर्मिती केली आहे. 'पुणे सुपरफास्ट'च्या व्यासपीठावरून यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे, माजी पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी विविध समस्या निराकरणाच्या दृष्टीने मार्गदर्शन केले आहे. याच मालिकेत आता नितीन गडकरी शहर आणि परिसरातील पायाभूत सुविधांबाबत संवाद साधणार आहेत. हा कार्यक्रम फक्त निमंत्रितांसाठी आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवड आणि लगतच्या परिसरामध्ये सध्या सर्वाधिक मोठी समस्या वाहतुकीची आहे. शहरातून जाणारे महामार्ग रुंद झाले, तरीही ते वाढत्या वाहतुकीला अपुरेच पडत आहेत. एका महामार्गावरून येणारी वाहतूक दुसऱ्या महामार्गाकडे जाताना विनाकारण शहरात येत असल्याने कोंडीत आणखी भर पडत आहे. शहराभोवतीच्या विविध महामार्गांना जोडण्यासाठीच्या रिंग रोडला गती मिळाली असली, तरी अद्याप त्याचे काम सुरू होऊ शकलेले नाही. शहर आणि परिसरालगतच्या खासगी वाहनांवर निर्बंध घालण्यासाठी सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने, शहर आणि परिसरात मेट्रोचे जाळे निर्माण करण्याची मागणी सर्व स्तरांतून केली जात आहे.
राज्यामध्ये १९९५ मध्ये शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीच्या सरकारच्या काळात सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून नितीन गडकरी यांची कामगिरी लक्षवेधी ठरली होती. पुणे-मुंबई दरम्यानचा प्रवासाचा वेळ वाचविण्यासाठी द्रुतगती महामार्गाची संकल्पना प्रत्यक्ष उतरविण्यात त्यांचा प्रमुख वाटा आहे. मुंबईत एकावेळी ५५ उड्डाणपुलांची निर्मिती त्यांच्या काळत झाली होती. गेल्या चार वर्षांपासून केंद्रीय दळणवळण मंत्री म्हणूनही त्यांनी रस्ते निर्मितीवर सर्वाधिक भर दिला आहे. अनेक राज्य महामार्गांना राष्ट्रीय महामार्गांचा दर्जा देऊन त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. देशातील रस्त्यांचे जाळे सुधारण्यासाठी 'भारतमाला' प्रकल्पांतर्गत कोट्यवधींची कामे केली जाणार आहेत. गडकरी यांच्या वेगवान कार्यपद्धतीनुसार शहरालगतच्या प्रश्नांवरही त्यांच्याकडून 'पुणे सुपरफास्ट' कार्यक्रमात गतिमान उत्तरे मिळतील, अशी अपेक्षा आहे.