म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘आतापर्यंत उत्पन्न व संपत्ती जाहीर न केलेल्या आणि कर बुडवलेल्या व्यक्तींना आपले उत्पन्न व संपत्ती ‘इन्कम डिक्लेरेशन स्कीम’द्वारे अधिकृत करता येणार आहे. त्यासाठी या संपत्ती व उत्पन्नावर ४५ टक्के कर भरावा लागणार आहे. या योजनेचा नागरिकांनी फायदा घेऊन उत्पन्न व संपत्ती अधिकृत केल्यास त्यांच्यावर कारवाई होणार नाही. मात्र, या योजनेची मुदत संपल्यानंतर करबुडव्या व्यक्तींवर कडक कारवाई करू,’ अशी माहिती पुण्याच्या प्राप्तिकर विभागाचे आयुक्त डी. एस. बेणुपाणी यांनी शुक्रवारी दिली.
प्राप्तिकर विभागाच्यावतीने योजनेची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली. या वेळी बेणुपाणी बोलत होते. मुख्य प्राप्तिकर आयुक्त एम. एल. कर्माकर, अतिरिक्त आयुक्त मझहर अक्रम, जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जितो) पुणेचे अध्यक्ष विजय भंडारी उपस्थित होते. बेणुपाणी म्हणाले, ‘इन्कम डिक्लेरेशन स्कीमअंतर्गत नागरिकांना येत्या ३० सप्टेंबरपर्यंत आपले संपूर्ण उत्पन्न व संपत्ती जाहीर करता येईल व त्यावर ४५ टक्के कर भरून अधिकृत करता येईल. या करामध्ये ३० टक्के नियमित कर असून उर्वरित ७.५ टक्के कर कृषी कल्याण कर आणि साडेसात टक्के दंड म्हणून आकारला आहे. या योजनेची मुदत संपल्यानंतर करबुडव्या व्यक्तींवर कडक कारवाई करण्यात येईल.’ कर्माकर म्हणाले, ‘देशात प्राप्तिकर विभागाकडे सुमारे ९४ लाख मोठ्या आर्थिक व्यवहारांची माहिती आहे. विभागाने ७ लाख व्यक्तींना पत्र पाठवले आहे. यामध्ये महागड्या चारचाकी घेणे, जमीन, घर व संपत्तीचे खरेदी-विक्रीचे व्यवहार, महागड्या वस्तू घेणे, ३० लाखांवरील आर्थिक व्यवहार, विदेशी दौरे, पतपेढ्या, बँकेमधील गुंतवणूक या व्यवहारांची माहिती आहे. विविध प्रकारच्या १४ स्रोतांद्वारे प्राप्तिकर विभागाचे करबुडव्यांवर लक्ष आहे. त्यामुळे नागरिकांना कर बुडवता येणार नाही. न्यायालयीन खटल्यात, भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकलेल्या आणि गुन्ह्यांची नोंद असणाऱ्या व्यक्तींना योजनेचा लाभ घेता येणार नाही.’
रविवारी कार्यशाळा इन्कम डिक्लेरेशन आणि डिस्प्युट रीसॉल्युशल योजनेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी येत्या रविवारी (२४ जुलै) प्राप्तिकर विभाग व ‘जितो’च्या वतीने सॅलिसबरी पार्क येथील महावीर प्रतिष्ठान येथे सकाळी १० वाजता कार्यशाळा होणार आहे. यात प्राप्तिकर विभागांच्या योजनेबाबत नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यात येणार आहे. ही कार्यशाळा सर्वांसाठी खुली आहे. त्यात प्राप्तिकर विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार असल्याची माहिती भंडारी यांनी दिली.
‘आतापर्यंत उत्पन्न व संपत्ती जाहीर न केलेल्या आणि कर बुडवलेल्या व्यक्तींना आपले उत्पन्न व संपत्ती ‘इन्कम डिक्लेरेशन स्कीम’द्वारे अधिकृत करता येणार आहे. त्यासाठी या संपत्ती व उत्पन्नावर ४५ टक्के कर भरावा लागणार आहे. या योजनेचा नागरिकांनी फायदा घेऊन उत्पन्न व संपत्ती अधिकृत केल्यास त्यांच्यावर कारवाई होणार नाही. मात्र, या योजनेची मुदत संपल्यानंतर करबुडव्या व्यक्तींवर कडक कारवाई करू,’ अशी माहिती पुण्याच्या प्राप्तिकर विभागाचे आयुक्त डी. एस. बेणुपाणी यांनी शुक्रवारी दिली.
प्राप्तिकर विभागाच्यावतीने योजनेची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली. या वेळी बेणुपाणी बोलत होते. मुख्य प्राप्तिकर आयुक्त एम. एल. कर्माकर, अतिरिक्त आयुक्त मझहर अक्रम, जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जितो) पुणेचे अध्यक्ष विजय भंडारी उपस्थित होते. बेणुपाणी म्हणाले, ‘इन्कम डिक्लेरेशन स्कीमअंतर्गत नागरिकांना येत्या ३० सप्टेंबरपर्यंत आपले संपूर्ण उत्पन्न व संपत्ती जाहीर करता येईल व त्यावर ४५ टक्के कर भरून अधिकृत करता येईल. या करामध्ये ३० टक्के नियमित कर असून उर्वरित ७.५ टक्के कर कृषी कल्याण कर आणि साडेसात टक्के दंड म्हणून आकारला आहे. या योजनेची मुदत संपल्यानंतर करबुडव्या व्यक्तींवर कडक कारवाई करण्यात येईल.’ कर्माकर म्हणाले, ‘देशात प्राप्तिकर विभागाकडे सुमारे ९४ लाख मोठ्या आर्थिक व्यवहारांची माहिती आहे. विभागाने ७ लाख व्यक्तींना पत्र पाठवले आहे. यामध्ये महागड्या चारचाकी घेणे, जमीन, घर व संपत्तीचे खरेदी-विक्रीचे व्यवहार, महागड्या वस्तू घेणे, ३० लाखांवरील आर्थिक व्यवहार, विदेशी दौरे, पतपेढ्या, बँकेमधील गुंतवणूक या व्यवहारांची माहिती आहे. विविध प्रकारच्या १४ स्रोतांद्वारे प्राप्तिकर विभागाचे करबुडव्यांवर लक्ष आहे. त्यामुळे नागरिकांना कर बुडवता येणार नाही. न्यायालयीन खटल्यात, भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकलेल्या आणि गुन्ह्यांची नोंद असणाऱ्या व्यक्तींना योजनेचा लाभ घेता येणार नाही.’
रविवारी कार्यशाळा इन्कम डिक्लेरेशन आणि डिस्प्युट रीसॉल्युशल योजनेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी येत्या रविवारी (२४ जुलै) प्राप्तिकर विभाग व ‘जितो’च्या वतीने सॅलिसबरी पार्क येथील महावीर प्रतिष्ठान येथे सकाळी १० वाजता कार्यशाळा होणार आहे. यात प्राप्तिकर विभागांच्या योजनेबाबत नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यात येणार आहे. ही कार्यशाळा सर्वांसाठी खुली आहे. त्यात प्राप्तिकर विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार असल्याची माहिती भंडारी यांनी दिली.