म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘येत्या एक जानेवारीपर्यंत कोपर्टी बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा निकाल लागला नाही तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यात फिरू देणार नाही,’ असा इशारा राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला.
राज्य परिवहन महामंडळाच्या गलथान कारभाराविरोधात खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली स्वारगेट बस स्थानकात जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. या वेळी जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, महिला अध्यक्षा वैशाली नागवडे, युवक अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, बांधकाम सभापती प्रवीण माने, महिला व बालकल्याण सभापती राणी शेळके, समाजकल्याण सभापती सुरेखा चौरे, सुजाता पवार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, माजी आमदार अशोक पवार उपस्थित होते.
‘कोपर्डीच्या घटनेला दीड वर्षांपेक्षा जास्त काळ झाला आहे. तरीही या खटल्याचा निकाल लागला नाही. नराधमांना जरब बसेल अशा प्रकारचा निकाल आत्तापर्यंत लावायला हवा होता. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांचे आश्वासन विसरले आहेत,’ अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी टीका केली. या खटल्याचा निकाल लवकरात लवकर लागला नाही, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
‘खा. सुळे यांनी राजकारण करू नये’
‘कोपर्डीमध्ये अल्पवयीन मुलीवर झालेली अत्याचाराची घटना लाच्छनास्पदच आहे. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशीच इच्छा सर्वांसोबतच सरकारचीदेखील इच्छा आहे. सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी संबंधित घटनेचा निकाल नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत लागण्याची शक्यता वर्तविली आहे. तरीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे कोपर्डी घटनेचे राजकारण करीत आहेत. ते त्यांनी करू नये,’ अशी अपेक्षा भाजपाचे सहयोगी सदस्य व खासदार संजय काकडे यांनी व्यक्त केली.
खासदार सुळे यांनी कोपर्डी घटनेचा निकाल १ जानेवारीपर्यंत न लागल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असे विधान पुण्यात केले. त्यावर खासदार काकडे यांनी भूमिका स्पष्ट केली.
‘कोपर्डी घटनेबद्दल जेवढी काळजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांना आहे. त्यापेक्षा अधिक काळजी फडणवीस सरकार घेत आहे. सरकारी वकील उज्ज्वल निकम हे खटल्याचे काम पाहत आहेत. स्वत: निकम यांनीच नोव्हेंबरमध्येच निकाल लागेल, असे म्हटले आहे. तरीही खासदार सुळे यांनी या विषयाला आता वेगळे वळण देण्याची आवश्यकता नव्हती. परंतु, राष्ट्रवादी काँग्रसविषयी लोकांची गेलेली सहानुभूती अशा घटनेच्या माध्यमातून परत मिळविण्यासाठी राष्ट्रवादीच्या खासदारांनी केलेली ही केविलवाणी धडपड वाटते,’ अशी टीका खासदार काकडे यांनी केली.
‘येत्या एक जानेवारीपर्यंत कोपर्टी बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा निकाल लागला नाही तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यात फिरू देणार नाही,’ असा इशारा राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला.
राज्य परिवहन महामंडळाच्या गलथान कारभाराविरोधात खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली स्वारगेट बस स्थानकात जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. या वेळी जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, महिला अध्यक्षा वैशाली नागवडे, युवक अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, बांधकाम सभापती प्रवीण माने, महिला व बालकल्याण सभापती राणी शेळके, समाजकल्याण सभापती सुरेखा चौरे, सुजाता पवार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, माजी आमदार अशोक पवार उपस्थित होते.
‘कोपर्डीच्या घटनेला दीड वर्षांपेक्षा जास्त काळ झाला आहे. तरीही या खटल्याचा निकाल लागला नाही. नराधमांना जरब बसेल अशा प्रकारचा निकाल आत्तापर्यंत लावायला हवा होता. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांचे आश्वासन विसरले आहेत,’ अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी टीका केली. या खटल्याचा निकाल लवकरात लवकर लागला नाही, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
‘खा. सुळे यांनी राजकारण करू नये’
‘कोपर्डीमध्ये अल्पवयीन मुलीवर झालेली अत्याचाराची घटना लाच्छनास्पदच आहे. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशीच इच्छा सर्वांसोबतच सरकारचीदेखील इच्छा आहे. सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी संबंधित घटनेचा निकाल नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत लागण्याची शक्यता वर्तविली आहे. तरीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे कोपर्डी घटनेचे राजकारण करीत आहेत. ते त्यांनी करू नये,’ अशी अपेक्षा भाजपाचे सहयोगी सदस्य व खासदार संजय काकडे यांनी व्यक्त केली.
खासदार सुळे यांनी कोपर्डी घटनेचा निकाल १ जानेवारीपर्यंत न लागल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असे विधान पुण्यात केले. त्यावर खासदार काकडे यांनी भूमिका स्पष्ट केली.
‘कोपर्डी घटनेबद्दल जेवढी काळजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांना आहे. त्यापेक्षा अधिक काळजी फडणवीस सरकार घेत आहे. सरकारी वकील उज्ज्वल निकम हे खटल्याचे काम पाहत आहेत. स्वत: निकम यांनीच नोव्हेंबरमध्येच निकाल लागेल, असे म्हटले आहे. तरीही खासदार सुळे यांनी या विषयाला आता वेगळे वळण देण्याची आवश्यकता नव्हती. परंतु, राष्ट्रवादी काँग्रसविषयी लोकांची गेलेली सहानुभूती अशा घटनेच्या माध्यमातून परत मिळविण्यासाठी राष्ट्रवादीच्या खासदारांनी केलेली ही केविलवाणी धडपड वाटते,’ अशी टीका खासदार काकडे यांनी केली.