अ‍ॅपशहर

एफआरपीची थकबाकी१५४३ कोटी रुपये

राज्यातील साखर कारखान्यांकडे अद्यापही सुमारे एक हजार ५४३ कोटी रुपयांची रास्त व किफायतशीर किंमतीची (एफआरपी) थकबाकी असल्याचे निदर्शनास आले आहे.

Maharashtra Times 25 Jun 2018, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, पुणे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sugar-cane


राज्यातील साखर कारखान्यांकडे अद्यापही सुमारे एक हजार ५४३ कोटी रुपयांची रास्त व किफायतशीर किंमतीची (एफआरपी) थकबाकी असल्याचे निदर्शनास आले आहे.

साखर आयुक्तालयाने घेतलेल्या आढाव्यानुसार ३१ मे अखेर 'एफआरपी'ची रक्कम एक हजार ७६८ कोटी रुपये होती. सुमारे २२५ कोटी रुपयांची थकबाकी जमा झाल्यामुळे थकबाकी सुमारे एक हजार ५४३ रुपये झाली आहे. राज्यात 'एफआरपी'ची एकूण देय रक्कम सुमारे २१ हजार २८० कोटी रुपये होती. त्यापैकी शेतकऱ्यांच्या खात्यावर आतापर्यंत सुमारे २० हजार २६५ कोटी रुपये जमा झाले आहेत.

'एफआरपी'ची सर्वाधिक थकीत रक्कम पुणे विभागात सुमारे ६३० कोटी ३० लाख रुपये आहे. अमरावती विभागात 'एफआरपी'ची सर्व रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. अन्य विभागांपैकी कोल्हापूर विभागाकडे सुमारे ३८२ कोटी ७८ लाख रुपये, नगर विभागाकडे सुमारे ७७ कोटी पाच लाख रुपये, औरंगाबाद विभागात सुमारे १७९ कोटी ६१ लाख रुपये, नांदेडमध्ये सुमारे २६५ कोटी १४ लाख रुपये, नागपूर विभागात आठ कोटी ३२ लाख रुपये थकबाकी असल्याचे आयुक्‍तालयातून सांगण्यात आले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज