म. टा. प्रतिनिधी, पुणे
वातावरणातील प्रतिकूल बदलांमुळे गायब झालेली थंडी या आठवड्यात पुन्हा परतणार आहे. विदर्भ, मराठवाड्यामध्ये पुढील दोन दिवस तुरळक ठिकाणी पाऊस हजेरी लावणार आहे. मध्य महाराष्ट्रात मात्र हवामान कोरडे राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. बंगालच्या उपसागरावरही कमी दाबाचा पट्टा तयार होण्यास पोषक परिस्थिती आहे; तसेच बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवारे निर्माण होण्याची शक्यता आहे. या सर्व बदलांचे पडसाद महाराष्ट्रावरही उमटले आहेत. गेल्या आठवडाभरात राज्याच्या बहुतांश भागात ढगाळ हवामान असून किमान आणि कमाल तापमानामध्ये लक्षणीय वाढ नोंदविण्यात येते आहे. राज्यातील वातावरणामध्ये हवेचा दाब कमी झाला असून आग्नेयेकडून येणारे वारे बाष्प वाहून आणत असल्याने थंडीला अडथळा निर्माण झाला आहे.
येत्या आठवडाभरामध्ये मध्य महाराष्ट्रातील काही भागात आकाश निरभ्र राहणार आहे. त्यामुळे तापमानामध्ये घट होऊन पुन्हा थंडी परतणार आहे. पण मराठवाडा, विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडणार असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.
पुण्यामध्ये आठवडाभरात किमान तापमानात लक्षणीय घट होणार असून कमाल तापमानात फारसा बदल होणार नाही. त्यामुळे संध्याकाळनंतर पुणेकरांना थंडी जाणवणार आहे. पुण्यात पुढील काळात निरभ्र आकाश राहणार असल्याने थंडी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
दरम्यान, राज्यात रविवारी दिवसभरात विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडला तर कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे होते. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ नोंदविण्यात आली. पुण्यामध्ये दिवसभरात ३२.८ अंश सेल्सिअस कमाल आणि १५ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले. नाशिकमध्ये ११.३ अंश सेल्सिअस राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली.
..............
वातावरणातील प्रतिकूल बदलांमुळे गायब झालेली थंडी या आठवड्यात पुन्हा परतणार आहे. विदर्भ, मराठवाड्यामध्ये पुढील दोन दिवस तुरळक ठिकाणी पाऊस हजेरी लावणार आहे. मध्य महाराष्ट्रात मात्र हवामान कोरडे राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. बंगालच्या उपसागरावरही कमी दाबाचा पट्टा तयार होण्यास पोषक परिस्थिती आहे; तसेच बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवारे निर्माण होण्याची शक्यता आहे. या सर्व बदलांचे पडसाद महाराष्ट्रावरही उमटले आहेत. गेल्या आठवडाभरात राज्याच्या बहुतांश भागात ढगाळ हवामान असून किमान आणि कमाल तापमानामध्ये लक्षणीय वाढ नोंदविण्यात येते आहे. राज्यातील वातावरणामध्ये हवेचा दाब कमी झाला असून आग्नेयेकडून येणारे वारे बाष्प वाहून आणत असल्याने थंडीला अडथळा निर्माण झाला आहे.
येत्या आठवडाभरामध्ये मध्य महाराष्ट्रातील काही भागात आकाश निरभ्र राहणार आहे. त्यामुळे तापमानामध्ये घट होऊन पुन्हा थंडी परतणार आहे. पण मराठवाडा, विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडणार असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.
पुण्यामध्ये आठवडाभरात किमान तापमानात लक्षणीय घट होणार असून कमाल तापमानात फारसा बदल होणार नाही. त्यामुळे संध्याकाळनंतर पुणेकरांना थंडी जाणवणार आहे. पुण्यात पुढील काळात निरभ्र आकाश राहणार असल्याने थंडी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
दरम्यान, राज्यात रविवारी दिवसभरात विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडला तर कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे होते. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ नोंदविण्यात आली. पुण्यामध्ये दिवसभरात ३२.८ अंश सेल्सिअस कमाल आणि १५ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले. नाशिकमध्ये ११.३ अंश सेल्सिअस राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली.
..............