म. टा. प्रतिनिधी, पुणे
कात्रज चौकात दुचाकीवरून आलेल्या व्यक्तींनी एका व्यक्तीच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून पाच लाखांची रोकड असलेली बॅग चोरून नेल्याचा प्रकार रविवारी रात्री नऊच्या सुमारास घडला. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. याबाबत तक्रारदाराकडे भारती विद्यापीठ पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. दुचाकीवरून दोन व्यक्ती आल्या. त्यांनी डोळ्यात मिरची पावडर टाकत हातामधील रोकड चोरल्याचे तक्रारदाराने पोलिसांना सांगितले.
चोरीनंतर आरोपी कोंढव्याच्या दिशेने पळून गेल्याचे तक्रारदारांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी नाकाबंदी वाढविली असून, अधिक तपास सुरू आहे. तसेच, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
कात्रज चौकात दुचाकीवरून आलेल्या व्यक्तींनी एका व्यक्तीच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून पाच लाखांची रोकड असलेली बॅग चोरून नेल्याचा प्रकार रविवारी रात्री नऊच्या सुमारास घडला. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. याबाबत तक्रारदाराकडे भारती विद्यापीठ पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. दुचाकीवरून दोन व्यक्ती आल्या. त्यांनी डोळ्यात मिरची पावडर टाकत हातामधील रोकड चोरल्याचे तक्रारदाराने पोलिसांना सांगितले.
चोरीनंतर आरोपी कोंढव्याच्या दिशेने पळून गेल्याचे तक्रारदारांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी नाकाबंदी वाढविली असून, अधिक तपास सुरू आहे. तसेच, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.