जेजुरीत सोमवती यात्रेनिमित्त भाविकांची गर्दी
म. टा. वृत्तसेवा, जेजुरी
सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार! असा जयघोष करीत आणि भंडाऱ्याची उधळण करीत सोमवती यात्रेनिमित्त सुमारे तीन लाख भाविकांनी जेजुरीगडावर खंडेरायाचे दर्शन घेत कुलधर्म-कुलाचार केला. रविवारपासूनच भाविकांनी जेजुरीत गर्दी केली होती.
सोमवारी गडावर दर्शनासाठी भाविकांची मोठी रांग होती. दुपारी एक वाजता प्रमुख वतनदार इनामदार पेशवे यांनी आदेश दिल्यानंतर उत्सवमूर्तींसह पालखी सोहळ्याने गडावरून प्रस्थान ठेवले. व्यवस्थापनाकडून बंदुकीच्या फैरी झाडून सोहळ्याला सलामी देण्यात आली. या वेळी पालखी सोहळ्यासाठी गडावर मुख्य विश्वस्त अॅड. वसंत नाझीरकर, डॉ. प्रसाद खंडागळे, संदीप घोणे, सुधीर गोडसे, अॅड. दशरथ घोरपडे, तहसीलदार सचिन गिरी आदी उपस्थित होते. पालखी सोहळ्यासमोर मानाचा पंचकल्यानी अश्व, छत्रचामरे-अब्दागिरी, घडशी समाज बांधवांचा सनईचा मंगलमय सूर निनादत होता. जेजुरीकर मानकरी-खांदेकरी पुजारीवर्गासमवेत पालखी सोहळा गडप्रदक्षिणा करून पायरी मार्गाने मल्हारगौतमेश्वर-छत्रीमंदिर येथे स्थिरावत धालेवाडी मार्गे कऱ्हा स्नानासाठी मार्गस्थ झाला. सायंकाळी पाच वाजता कऱ्हा नदी किनारी खंडोबा-म्हाळसा उत्सवमूर्तींना विधिवत अभिषेक घालून स्नान घालण्यात आले. या वेळी हजारो भाविकांनी उत्सव-मूर्तींबरोबर स्नानाची पर्वणी लुटली.
जेजुरी व परिसरामध्ये पावसाने दोन दिवस हजेरी लावली असली, तरी खंडोबा देवाला जेथे स्नान घातले जाते ते नदीपात्र अद्याप कोरडे असल्याने प्रशासनाने टँकरच्या पाण्याची सोय केली होती.
महिलांनी चोरट्याला पकडले
श्री खंडोबा देवाचा पालखी सोहळा दुपारी तीन वाजता छत्रीच्या देवळावर आला असता तेथे गर्दीत उभ्या असलेल्या विद्या चिंतामण वरळीकर (रा. वरळी, कोळीवाडा, मुंबई) या महिलेच्या मागे उभे राहून गळ्यातील सोन्याची साखळी दाताने तोडत असताना एका चोरट्याला महिलांनी पकडले व भरपूर चोप दिला. मात्र गर्दीचा फायदा घेऊन चोरटा पळून जाण्यात यशस्वी ठरला. महिलांच्या धाडसामुळे विद्या वरळीकर यांना त्यांची पंचवीस हजारांची साखळी परत मिळाली. यात्रेत अनेक भाविकांचे दागिने, पैसे चोरीला जाण्याचे प्रकार घडले.
म. टा. वृत्तसेवा, जेजुरी
सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार! असा जयघोष करीत आणि भंडाऱ्याची उधळण करीत सोमवती यात्रेनिमित्त सुमारे तीन लाख भाविकांनी जेजुरीगडावर खंडेरायाचे दर्शन घेत कुलधर्म-कुलाचार केला. रविवारपासूनच भाविकांनी जेजुरीत गर्दी केली होती.
सोमवारी गडावर दर्शनासाठी भाविकांची मोठी रांग होती. दुपारी एक वाजता प्रमुख वतनदार इनामदार पेशवे यांनी आदेश दिल्यानंतर उत्सवमूर्तींसह पालखी सोहळ्याने गडावरून प्रस्थान ठेवले. व्यवस्थापनाकडून बंदुकीच्या फैरी झाडून सोहळ्याला सलामी देण्यात आली. या वेळी पालखी सोहळ्यासाठी गडावर मुख्य विश्वस्त अॅड. वसंत नाझीरकर, डॉ. प्रसाद खंडागळे, संदीप घोणे, सुधीर गोडसे, अॅड. दशरथ घोरपडे, तहसीलदार सचिन गिरी आदी उपस्थित होते. पालखी सोहळ्यासमोर मानाचा पंचकल्यानी अश्व, छत्रचामरे-अब्दागिरी, घडशी समाज बांधवांचा सनईचा मंगलमय सूर निनादत होता. जेजुरीकर मानकरी-खांदेकरी पुजारीवर्गासमवेत पालखी सोहळा गडप्रदक्षिणा करून पायरी मार्गाने मल्हारगौतमेश्वर-छत्रीमंदिर येथे स्थिरावत धालेवाडी मार्गे कऱ्हा स्नानासाठी मार्गस्थ झाला. सायंकाळी पाच वाजता कऱ्हा नदी किनारी खंडोबा-म्हाळसा उत्सवमूर्तींना विधिवत अभिषेक घालून स्नान घालण्यात आले. या वेळी हजारो भाविकांनी उत्सव-मूर्तींबरोबर स्नानाची पर्वणी लुटली.
जेजुरी व परिसरामध्ये पावसाने दोन दिवस हजेरी लावली असली, तरी खंडोबा देवाला जेथे स्नान घातले जाते ते नदीपात्र अद्याप कोरडे असल्याने प्रशासनाने टँकरच्या पाण्याची सोय केली होती.
महिलांनी चोरट्याला पकडले
श्री खंडोबा देवाचा पालखी सोहळा दुपारी तीन वाजता छत्रीच्या देवळावर आला असता तेथे गर्दीत उभ्या असलेल्या विद्या चिंतामण वरळीकर (रा. वरळी, कोळीवाडा, मुंबई) या महिलेच्या मागे उभे राहून गळ्यातील सोन्याची साखळी दाताने तोडत असताना एका चोरट्याला महिलांनी पकडले व भरपूर चोप दिला. मात्र गर्दीचा फायदा घेऊन चोरटा पळून जाण्यात यशस्वी ठरला. महिलांच्या धाडसामुळे विद्या वरळीकर यांना त्यांची पंचवीस हजारांची साखळी परत मिळाली. यात्रेत अनेक भाविकांचे दागिने, पैसे चोरीला जाण्याचे प्रकार घडले.