अ‍ॅपशहर

पुणेकरांवर चक्क रस्त्यावरच अंत्यसंस्कार करण्याची वेळ, कारण वाचून हादराल

राज्य सरकार व जिल्हा प्रशासनाच्या उदासीन कारभाराचा पर्दाफाश झाल्याचे पहायला मिळाले. पुणे शहराच्या अगदी जवळ असलेल्या गावातले हे वास्तव चित्र राज्य सरकार व जिल्हा प्रशासनाच्या कारभाराचे वाभाडे काढणारे आहे.

Edited byरेणुका धायबर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Sep 2022, 9:16 am
पुणे : पुणे शहरालगत असलेल्या सिंहगड किल्ले परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याशी आतकरवाडी नावाचे गाव आहे. पुणे शहरापासून अगदी ३० ते ३५ किमी अंतरावर असलेले हे गाव. या गावात स्मशानभूमी नाही. त्यात मुसळधार पाऊस सुरू होता. वाहणारे पाणी ओसरण्यसाठी नागरिकांना तब्बल तीन तासाहून अधिक वेळ अंत्यविधी करण्यासाठी ताटकळत थांबावे लागले. पाऊस थांबत नसल्याचे लक्षात येताच नागरिकांनी चक्क रस्त्यावर अंत्यविधी करावा लागला. त्यामुळे पुणे शहरापासून जवळ असूनही अशी वेळ आल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pune news today


राज्य सरकार व जिल्हा प्रशासनाच्या उदासीन कारभाराचा पर्दाफाश झाल्याचे पहायला मिळाले. पुणे शहराच्या अगदी जवळ असलेल्या गावातले हे वास्तव चित्र राज्य सरकार व जिल्हा प्रशासनाच्या कारभाराचे वाभाडे काढणारे आहे. घेरा सिंहगडमध्ये आठ ते दहा लहान मोठी गावे असून बहुतांश गावात अद्यापही स्मशानभूमीची सोय नसल्याचे वास्तव समोर आले आहे.

Weather Update: मुंबई-पुणे, रत्नागिरीला मुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाचा आजचा अंदाज काय?
येथील ग्रामस्थांना स्मशानभूमीसाठी हक्काची जागाच नसल्याने येथे राज्य सरकार व जिल्हा परिषदेमार्फत स्मशानभूमी उभारल्या गेल्या नाहीत. त्यामुळे येथे अनेक ठिकाणी रस्त्यातच अंत्यविधीचे सोपस्कार पार पाडले जातात. ग्रुप ग्रामपंचायत असलेली घेरा सिंहगडला चार महसुली गावे आहे. गावठाण मागणीचे प्रस्ताव राज्य सरकार व जिल्हा प्रशासनाकडे धूळखात पडलेले आहेत.

रस्त्यावर अंत्यसंस्कार करावे लागल्याची घटना प्रशासनाला चपराक देणारी आहे. कारण पुणे सारख्या मेट्रो सिटी असलेल्या परिसरात अशी घटना म्हणजे प्रशासन विदारक चित्र दाखवणारी आहे. या घटनेमुळे नागरिकांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे.
लेखकाबद्दल
रेणुका धायबर
रेणुका धायबर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. डिजिटल पत्रकारितेचा आठ वर्षांचा अनुभव आहे. २०१४ पासून पत्रकारीतेत आहेत. झी २४ तास , न्यूज १८ लोकमत, टीव्ही ९ अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्र, राजकारण, गुन्हेगारी, देश, विदेश, स्पेशल बातम्या यासोबत व्यवसाय विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख