उपनगरातील रस्त्यांवर मोठ्या संख्येने भंगार वाहने; महापालिकेचे दुर्लक्ष
म. टा. प्रतिनिधी, कात्रज
उपनगरातील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांच्या कडेला बेकायदा पार्किंगचे ग्रहण लागले आहे. बेवारस वाहने मोठ्या प्रमाणात जागा अडवून धोकादायक स्थिती निर्माण करत आहे. मात्र, महापालिकेचे अशा वाहनांवर कारवाई करत नसल्याचे चित्र आहे.
बेवारस, जिर्ण, भंगार वाहनांमुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. बेकायदा पार्किंगमुळे होणारी वहातूक कोंडी फोडण्यासाठी वाहतूक पोलिस सातत्याने कारवाई करतात. मात्र, अनेक वाहनमालक अजूनही ऐकण्याच्या स्थितीत नाहीत. साताता रस्ता बीआरटी मार्ग परिसर या अत्यंत वर्दळीच्या भागातही बेवारस वाहनांची संख्या वाढत आहे. धनकवडी, कात्रज, आंबेगाव पठार, भारती विद्यापीठ परिसर, बालाजीनगर, चव्हाणनगर परिसरातील सर्व मार्गावर बेवारस वाहने अनेक महिन्यांपासून उभी आहेत. त्यामुळे वातुकीला अडथळा निर्माण होत असून पादचाऱ्यांना चालण्याठी जागा शिल्लक राहत नाही. बेवारस वाहने उचलण्याची मोहीम पालिकेने जाहीर केली. मात्र, या परिसरातील एकही वाहन उचललेले नाही.
...
बेवारस वाहनांवर कारवाईसाठी आम्ही महापालिका प्रशासनाशी वारंवार पत्रव्यवहार केला आहे. परंतु, महापालिका प्रशासनाने कोणतीही कारवाई न करता त्याकडे दुर्लक्ष केले आहे.
- प्रभाकर ढगे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा, भारती विद्यापीठ
म. टा. प्रतिनिधी, कात्रज
उपनगरातील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांच्या कडेला बेकायदा पार्किंगचे ग्रहण लागले आहे. बेवारस वाहने मोठ्या प्रमाणात जागा अडवून धोकादायक स्थिती निर्माण करत आहे. मात्र, महापालिकेचे अशा वाहनांवर कारवाई करत नसल्याचे चित्र आहे.
बेवारस, जिर्ण, भंगार वाहनांमुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. बेकायदा पार्किंगमुळे होणारी वहातूक कोंडी फोडण्यासाठी वाहतूक पोलिस सातत्याने कारवाई करतात. मात्र, अनेक वाहनमालक अजूनही ऐकण्याच्या स्थितीत नाहीत. साताता रस्ता बीआरटी मार्ग परिसर या अत्यंत वर्दळीच्या भागातही बेवारस वाहनांची संख्या वाढत आहे. धनकवडी, कात्रज, आंबेगाव पठार, भारती विद्यापीठ परिसर, बालाजीनगर, चव्हाणनगर परिसरातील सर्व मार्गावर बेवारस वाहने अनेक महिन्यांपासून उभी आहेत. त्यामुळे वातुकीला अडथळा निर्माण होत असून पादचाऱ्यांना चालण्याठी जागा शिल्लक राहत नाही. बेवारस वाहने उचलण्याची मोहीम पालिकेने जाहीर केली. मात्र, या परिसरातील एकही वाहन उचललेले नाही.
...
बेवारस वाहनांवर कारवाईसाठी आम्ही महापालिका प्रशासनाशी वारंवार पत्रव्यवहार केला आहे. परंतु, महापालिका प्रशासनाने कोणतीही कारवाई न करता त्याकडे दुर्लक्ष केले आहे.
- प्रभाकर ढगे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा, भारती विद्यापीठ