म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
देशाच्या राजकारणात पप्पू ही खोचक उपाधी देऊन काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना ट्रोल केले गेले. आता लोकसभेच्या रिंगणातील अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना महाराष्ट्राचा पप्पू असे संबोधून ट्रोल केले जात आहे. पार्थ यांच्या प्रचाराची पद्धतच ट्रोल होण्यास कारणीभूत असल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट होऊ लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेससाठी प्रतिष्ठेची असलेली ही निवडणूक अधिकच अटीतटीची होत असल्याचे चित्र सध्या मतदारसंघात निर्माण झाले आहे.
इंग्रजीत लिहून आणलेले चार ओळींचे भाषण, ट्रेनमधून प्रवास, धार्मिक रॅलीमध्ये नाचणे, ट्रॅफिक नसताना सभेच्या ठिकाणी पळत जाणे, घोड्यावरून चिंचवड गावातील रपेट, मावळच का निवडले यावरचे उत्तर, समाजमंदिरांमधील गाठीभेटी आणि कामगारांसाठी काय करणार यासाठी फेसबुकवर पोस्ट केले असल्याचे सांगून वेळ मारून नेणे अशा अनेक कारणांमुळे पार्थ पवारांना सोशल मीडियावर जोरदार ट्रोल केले जात आहे.
शिवेसना आमदारांनी 'पबमध्ये नाचणारे आता रथयात्रेत नाचू लागले,' अशी टीका पार्थ यांचे नाव न घेता केली. त्यावर 'दादांवरील आणि माझ्यावरील टीकेला योग्य उत्तर कार्यकर्तेच देतील,' असे सांगून पार्थ यांनी भाष्य करणे टाळले. ग्रामीण भागांचा समावेश असलेल्या मावळात शहरी भागात राहिलेल्या पार्थ यांची प्रचारासाठी लगबग सुरू आहे. त्यातच पार्थ यांना प्रसिद्धीमाध्यमांनी विचारलेल्या कोणत्याही प्रश्नाला सर्मपक आणि नेमके उत्तर देता येत नसल्याने ते अधिकच अडचणीत सापडत असल्याचे चित्र आहे.
'पुणे-मुंबईचा प्रवास करताना मावळातून जायचो. त्यामुळे मावळ भागासाठी काही तरी काम करण्याची इच्छा असल्याने हा मतदार संघ निवडला,' असे उत्तर पार्थ यांनी एका प्रश्नाला नुकतेच दिले. त्यावरून ते चांगलेच ट्रोल झाले. पार्थ यांच्या सोशल मीडियावरून प्रचाराची धुरा सांभळणारे जय अजित पवार यांच्या नावाने असलेल्या फेसबुक पेजवरून कार्यकर्त्यांची जुळवाजुळव करण्यात आली होती. फेसबुकवरून कार्यकर्ते जमवण्याची वेळ आली आहे की काय असे विचारतही त्यांच्यावर टीका करण्यात आली.
रविवारी (३१ मार्च) कामगार मेळावा घेऊन अजित पवार यांनी उपस्थितांसमोर भाषण केले. सकाळी ठरलेल्या वेळात सुरू झालेल्या या मेळाव्याला पार्थ पवार दीड तास उशिरा पोहचले. दरम्यान अजित पवार यांचे भाषण संपले होते. त्यामुळे पार्थ यांनी भाषण न करणेच पसंत केले. याबाबतही प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांवर पार्थ यांना नेमके उत्तर देता आले नाही. या घटनेची चर्चा सोशल मीडियावर 'पार्थ पवार म्हणजे महाराष्ट्राचा पप्पू' अशी सुरू झाली.
सेना - भाजपचे मनोमीलन दिखाव्याचे?
शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि भाजप शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांच्यातील मनोमीलन केवळ दिखाव्यापुरते असल्याचे सांगितले जात आहे. युतीचा उमेदवार असे सांगताना भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी पिंपरी-चिंचवडमध्ये बारणे यांचा प्रचार करताना दिसत नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादीला युतीमधील या कलहाचा फायदा होऊ शकतो असे बोलले जात आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेसला युतीतील कलहाचा फायदा उठवता येत नसल्याचे दिसून येत आहे.
देशाच्या राजकारणात पप्पू ही खोचक उपाधी देऊन काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना ट्रोल केले गेले. आता लोकसभेच्या रिंगणातील अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना महाराष्ट्राचा पप्पू असे संबोधून ट्रोल केले जात आहे. पार्थ यांच्या प्रचाराची पद्धतच ट्रोल होण्यास कारणीभूत असल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट होऊ लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेससाठी प्रतिष्ठेची असलेली ही निवडणूक अधिकच अटीतटीची होत असल्याचे चित्र सध्या मतदारसंघात निर्माण झाले आहे.
इंग्रजीत लिहून आणलेले चार ओळींचे भाषण, ट्रेनमधून प्रवास, धार्मिक रॅलीमध्ये नाचणे, ट्रॅफिक नसताना सभेच्या ठिकाणी पळत जाणे, घोड्यावरून चिंचवड गावातील रपेट, मावळच का निवडले यावरचे उत्तर, समाजमंदिरांमधील गाठीभेटी आणि कामगारांसाठी काय करणार यासाठी फेसबुकवर पोस्ट केले असल्याचे सांगून वेळ मारून नेणे अशा अनेक कारणांमुळे पार्थ पवारांना सोशल मीडियावर जोरदार ट्रोल केले जात आहे.
शिवेसना आमदारांनी 'पबमध्ये नाचणारे आता रथयात्रेत नाचू लागले,' अशी टीका पार्थ यांचे नाव न घेता केली. त्यावर 'दादांवरील आणि माझ्यावरील टीकेला योग्य उत्तर कार्यकर्तेच देतील,' असे सांगून पार्थ यांनी भाष्य करणे टाळले. ग्रामीण भागांचा समावेश असलेल्या मावळात शहरी भागात राहिलेल्या पार्थ यांची प्रचारासाठी लगबग सुरू आहे. त्यातच पार्थ यांना प्रसिद्धीमाध्यमांनी विचारलेल्या कोणत्याही प्रश्नाला सर्मपक आणि नेमके उत्तर देता येत नसल्याने ते अधिकच अडचणीत सापडत असल्याचे चित्र आहे.
'पुणे-मुंबईचा प्रवास करताना मावळातून जायचो. त्यामुळे मावळ भागासाठी काही तरी काम करण्याची इच्छा असल्याने हा मतदार संघ निवडला,' असे उत्तर पार्थ यांनी एका प्रश्नाला नुकतेच दिले. त्यावरून ते चांगलेच ट्रोल झाले. पार्थ यांच्या सोशल मीडियावरून प्रचाराची धुरा सांभळणारे जय अजित पवार यांच्या नावाने असलेल्या फेसबुक पेजवरून कार्यकर्त्यांची जुळवाजुळव करण्यात आली होती. फेसबुकवरून कार्यकर्ते जमवण्याची वेळ आली आहे की काय असे विचारतही त्यांच्यावर टीका करण्यात आली.
रविवारी (३१ मार्च) कामगार मेळावा घेऊन अजित पवार यांनी उपस्थितांसमोर भाषण केले. सकाळी ठरलेल्या वेळात सुरू झालेल्या या मेळाव्याला पार्थ पवार दीड तास उशिरा पोहचले. दरम्यान अजित पवार यांचे भाषण संपले होते. त्यामुळे पार्थ यांनी भाषण न करणेच पसंत केले. याबाबतही प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांवर पार्थ यांना नेमके उत्तर देता आले नाही. या घटनेची चर्चा सोशल मीडियावर 'पार्थ पवार म्हणजे महाराष्ट्राचा पप्पू' अशी सुरू झाली.
सेना - भाजपचे मनोमीलन दिखाव्याचे?
शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि भाजप शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांच्यातील मनोमीलन केवळ दिखाव्यापुरते असल्याचे सांगितले जात आहे. युतीचा उमेदवार असे सांगताना भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी पिंपरी-चिंचवडमध्ये बारणे यांचा प्रचार करताना दिसत नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादीला युतीमधील या कलहाचा फायदा होऊ शकतो असे बोलले जात आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेसला युतीतील कलहाचा फायदा उठवता येत नसल्याचे दिसून येत आहे.