लोणावळा : मुंबईहून पुण्याकडे भरधाव वेगाने येणारी गाडी एक्स्प्रेस-वे लगतच्या ओढ्यात पडून झालेल्या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ओझर्डे व आढे गावच्या दरम्यान मंगळवारी सकाळी साडेपाचच्या सुमारास हा अपघात झाला.
प्रितम विलास साळुंखे (वय २६, रा. धायरी, पुणे), राहुल हनुमंत राजगुरू (वय २५, रा. धनकवडी, पुणे) अशी अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. प्रतीक अमरे (वय २६, रा. विठ्ठलवाडी, पुणे) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तळेगाव दाभाडे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईहून पुण्याकडे प्रवासी घेऊन येणारी विटास ही गाडी (एमएच १२ केएम ७५४५) ओझर्ड व आढे गावच्या दरम्यान असलेल्या एका ओढ्यात सुमारे ४० ते ५० फूट कोसळली. या दुर्घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला, त एक जण गंभीर जखमी झाला. चालकाला डुलकी लागल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला.
प्रितम विलास साळुंखे (वय २६, रा. धायरी, पुणे), राहुल हनुमंत राजगुरू (वय २५, रा. धनकवडी, पुणे) अशी अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. प्रतीक अमरे (वय २६, रा. विठ्ठलवाडी, पुणे) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तळेगाव दाभाडे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईहून पुण्याकडे प्रवासी घेऊन येणारी विटास ही गाडी (एमएच १२ केएम ७५४५) ओझर्ड व आढे गावच्या दरम्यान असलेल्या एका ओढ्यात सुमारे ४० ते ५० फूट कोसळली. या दुर्घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला, त एक जण गंभीर जखमी झाला. चालकाला डुलकी लागल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला.