मावळातील पाचणे गावाच्या यात्रेमधील प्रकार
म. टा. प्रतिनिधी, लोणावळा
मावळ तालुक्यातील पाचणे गावात ग्रामदैवत पायाबा महाराज यांच्या यात्रेसाठी आलेल्या २०० ते २५० भाविकांना पेढ्यांच्या प्रसादातून विषबाधा झाली. ही घटना शुक्रवारी रात्री दहानंतर घडली. या प्रकरणी एका पेढेविक्रेत्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून त्याच्या दुकानातील पेढ्यांची तपासणी केली जात आहे. बाधित ग्रामस्थांवर परिसरातील विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी दुकानदार विठ्ठल शिंदे (माळी), रा. चांदखेड, मावळ याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तळेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी मावळ तालुक्यातील पाचणे गावात ग्रामदैवत श्री पायाबा महाराजांच्या वार्षिक यात्रेचा (उरुस) पहिला व मुख्य दिवस होता. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दुकानदार शिंदे यांनी या गावच्या यात्रेला आपले पेढे, रेवड्या आणि इतर पदार्थांचे दुकान मांडले होते. या वेळी यात्रेनिमित्त गावात आलेल्या भाविकांनी तसेच ग्रामस्थांनी शिंदे यांच्या दुकानातील पेढे खरेदी करून ते प्रसाद म्हणून वाटले होते. पेढे खाणाऱ्यांना घरी गेल्यानंतर उलट्या आणि जुलाबाचा त्रास होऊ लागला. बाधितांना उपचारासाठी तात्काळ परिसरातील हिंजवडी, नेरे, मारुंजी, बेबडओहळ, डांगे चौक, सोमाटणे फाटा, तळेगाव, चांदखेड येथील खासगी रुग्णालयात तसेच औंध जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. या घटनेत सुमारे २०० ते २५० ग्रामस्थ व भाविकांना पेढ्यातून विषबाधेचा त्रास झाला आहे.
‘विषबाधा झालेल्या सर्वांवर परिसरातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे. या प्रकरणी दुकानदारास व त्याच्याकडील पेढे ताब्यात घेतले असून, पेढ्यांची तपासणी करण्यासाठी अन्न निरीक्षक विभागाच्या पथकाला प्राचारण केले करण्यात आले आहे. पेढ्यांमधील कोणत्या घटकातून विषबाधा झाली, हे तपासणीनंतर स्पष्ट होईल, त्यानंतर संबंधिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल,’ असे तळेगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ लिस निरीक्षक मुगुटराव पाटील यांनी सांगितले आहे.
याबाबत पाचण्याचे सरपंच मनोज येवले म्हणाले, ‘यात्रेत घडलेली घटना दुर्दैवी असली, तरी महाराजांच्या कृपेने मोठा अनर्थ टळला आहे. लोकांना जुलाब व उलट्यांचा त्रास होऊ लागल्याने ग्रामस्थांनी त्यांना तात्काळ उपचारांसाठी नजीकच्या रुग्णालयात रवाना केले. उपचारानंतर अनेकांना घरी सोडण्यात आले असून, काहींवर अजून उपचार सुरू असले, तरी त्यांची प्रकृती सुधारली आहे.’
म. टा. प्रतिनिधी, लोणावळा
मावळ तालुक्यातील पाचणे गावात ग्रामदैवत पायाबा महाराज यांच्या यात्रेसाठी आलेल्या २०० ते २५० भाविकांना पेढ्यांच्या प्रसादातून विषबाधा झाली. ही घटना शुक्रवारी रात्री दहानंतर घडली. या प्रकरणी एका पेढेविक्रेत्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून त्याच्या दुकानातील पेढ्यांची तपासणी केली जात आहे. बाधित ग्रामस्थांवर परिसरातील विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी दुकानदार विठ्ठल शिंदे (माळी), रा. चांदखेड, मावळ याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तळेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी मावळ तालुक्यातील पाचणे गावात ग्रामदैवत श्री पायाबा महाराजांच्या वार्षिक यात्रेचा (उरुस) पहिला व मुख्य दिवस होता. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दुकानदार शिंदे यांनी या गावच्या यात्रेला आपले पेढे, रेवड्या आणि इतर पदार्थांचे दुकान मांडले होते. या वेळी यात्रेनिमित्त गावात आलेल्या भाविकांनी तसेच ग्रामस्थांनी शिंदे यांच्या दुकानातील पेढे खरेदी करून ते प्रसाद म्हणून वाटले होते. पेढे खाणाऱ्यांना घरी गेल्यानंतर उलट्या आणि जुलाबाचा त्रास होऊ लागला. बाधितांना उपचारासाठी तात्काळ परिसरातील हिंजवडी, नेरे, मारुंजी, बेबडओहळ, डांगे चौक, सोमाटणे फाटा, तळेगाव, चांदखेड येथील खासगी रुग्णालयात तसेच औंध जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. या घटनेत सुमारे २०० ते २५० ग्रामस्थ व भाविकांना पेढ्यातून विषबाधेचा त्रास झाला आहे.
‘विषबाधा झालेल्या सर्वांवर परिसरातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे. या प्रकरणी दुकानदारास व त्याच्याकडील पेढे ताब्यात घेतले असून, पेढ्यांची तपासणी करण्यासाठी अन्न निरीक्षक विभागाच्या पथकाला प्राचारण केले करण्यात आले आहे. पेढ्यांमधील कोणत्या घटकातून विषबाधा झाली, हे तपासणीनंतर स्पष्ट होईल, त्यानंतर संबंधिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल,’ असे तळेगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ लिस निरीक्षक मुगुटराव पाटील यांनी सांगितले आहे.
याबाबत पाचण्याचे सरपंच मनोज येवले म्हणाले, ‘यात्रेत घडलेली घटना दुर्दैवी असली, तरी महाराजांच्या कृपेने मोठा अनर्थ टळला आहे. लोकांना जुलाब व उलट्यांचा त्रास होऊ लागल्याने ग्रामस्थांनी त्यांना तात्काळ उपचारांसाठी नजीकच्या रुग्णालयात रवाना केले. उपचारानंतर अनेकांना घरी सोडण्यात आले असून, काहींवर अजून उपचार सुरू असले, तरी त्यांची प्रकृती सुधारली आहे.’