अ‍ॅपशहर

शिवशाहीचीच्या धडकेत दोन बैलांचा मृत्यू

छत्रपती साखर कारखान्याच्या ऊसतोड मजुरांच्या बैलगाडीला शिवशाही बसने धडक दिली. यामध्ये दोन बैल जागीच ठार झाले असून, ऊसतोड मजूरासह दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.

Authored byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 19 Mar 2021, 3:31 pm
भवानीनगर : छत्रपती साखर कारखान्याच्या ऊसतोड मजुरांच्या बैलगाडीला शिवशाही बसने धडक दिली. यामध्ये दोन बैल जागीच ठार झाले असून, ऊसतोड मजूरासह दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. इंदापूर-बारामती रस्त्यावर भवानीनगरजवळ गुरुवारी पहाटे हा अपघात झाला. अपघातामध्ये शिवशाही बसचेदेखील नुकसान झाले आहे. बसमधील प्रवाशांपैकी कोणीही जखमी झाले नाही.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम शिवशाहीचीच्या धडकेत दोन बैलांचा मृत्यू


पहाटे साडेपाच वाजता अकलूजकडे जाणारी शिवशाही बस भवानीनगरजवळ आली असता, समोरून जाणाऱ्या ऊसतोड मजुरांच्या बैलगाडीला जोरात धडक दिली. यामध्ये गाडीचे बैल उडून बाजूला पडले. गाडीत बसलेले ऊसतोड मजूर रामराव सोनसळे व त्यांची पत्नी हे दोघेही रस्त्यावर पडले. त्यांना गंभीर दुखापत झाली असून, पुढील उपचारासाठी पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघाताची माहिती समजताच कारखान्याचे उपाध्यक्ष अमोल पाटील, उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, ऊसतोड मजुरांच्या संघटनेचे कार्याध्यक्ष सुखदेव सानप, भाऊसाहेब आंधळे घटनास्थळी दाखल झाले. वालचंदनगर पोलिसांनी पंचनामा केला. या प्रकरणी बसचालकावर कारवाई करण्याची मागणी ऊसतोड मजुरांच्या वतीने करण्यात आली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज