पुणे: अपघाताने एखाद्याची भेट होते म्हणतात, त्याचाच प्रत्यय शंकरशेठ रस्त्यावर शुक्रवारी (२० सप्टेंबर) पहाटे दोन कुटुंबीयांना आला. दोन कारचा समोरा-समोर अपघात झाल्यानंतर हे प्रकरण पोलिस चौकीत पोहचले; पण चर्चेतून दोन्ही कारचालक एकमेकांचे नातेवाइक असल्याचे समोर येताच तक्रार न देताच हे प्रकरण सामोपचाराने मिटले.
शुक्रवारी पहाटे अडीच वाजता ढोले पाटील चौकात दोन कारची समोरासमोर धडक बसली. जोरदार झालेल्या या धडकेनंतर चालक तावातावाने कारमधून खाली उतरले. दोन्ही गाड्यांच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे दोन्ही कारचालक एकमेकांना दोष देऊ लागल्याने वाद सुरू झाला. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नव्हती. परंतु, कारचे नुकसान झाल्याने ते कोणी भरून द्यायचे, कोणाच्या गाडीचा वेग अधिक होता, यावरून वाद वाढत गेला. दोघेही आपापल्या भूमिकेवर ठाम असल्याने हा वाद मिटत नव्हता.
त्यामुळे अखेर दोन्ही कारचालक परस्परविरोधी तक्रार देण्यासाठी लोहियानगर पोलिस चौकीत पोहोचले. दोघेही आपली बाजू पोलिसांसमोर मांडताना एकमेकांना दोष देत होते. 'चौकात आल्याने माझ्या गाडीचा वेग कमी होता. हाच वेगात आला आणि माझ्या गाडीला येऊन धडकला' असेच दोघांचेही म्हणणे होते. त्यामुळे दोघांनी परस्परविरोधी तक्रार देण्यास सुरुवात केली. याच दरम्यान पोलिसांनी दोन्ही तक्रारदारांना तुमचे नाव काय, असा प्रश्न विचारला. तेव्हा दोघांनी आपले नाव आणि आडनाव सांगितले. दोघांचेही आडनाव एकच असल्याने ते सांगितल्यावर दोघे एकमेकांकडे बघू लागले. पोलिसांनीदेखील दोघांचे आडनाव एकच का, असे विचारले. त्यानंतर या दोघांचा वादाचा सूर मावळून त्यांनी एकमेकांशी संवाद साधायला सुरवात केली.
दोघांचे पूर्ण नाव आणि नातेवाइकांच्या नावांची विचारणा झाल्यावर दोन्ही कारचालक हे एकमेकांचे नातेवाइक असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर मात्र, दोघांनी सामोपचाराने मिटवून घेत आपली आता काहीच तक्रार नसल्याचे पोलिसांना सांगत वाद मिटवून घेतला. कोणालाही दुखापत झाली नव्हती, त्यातच दोघेही एकमेकांचे नातेवाइक निघाल्याने वाद सामोपचाराने मिटला. तुम्ही आपसात मिटवून घेतले असले, त आता वेगावर नियंत्रण ठेवा अशी तंबी देऊन पोलिसांनी दोघांचे जाबजबाब घेऊन सोडून दिले.
शुक्रवारी पहाटे अडीच वाजता ढोले पाटील चौकात दोन कारची समोरासमोर धडक बसली. जोरदार झालेल्या या धडकेनंतर चालक तावातावाने कारमधून खाली उतरले. दोन्ही गाड्यांच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे दोन्ही कारचालक एकमेकांना दोष देऊ लागल्याने वाद सुरू झाला. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नव्हती. परंतु, कारचे नुकसान झाल्याने ते कोणी भरून द्यायचे, कोणाच्या गाडीचा वेग अधिक होता, यावरून वाद वाढत गेला. दोघेही आपापल्या भूमिकेवर ठाम असल्याने हा वाद मिटत नव्हता.
त्यामुळे अखेर दोन्ही कारचालक परस्परविरोधी तक्रार देण्यासाठी लोहियानगर पोलिस चौकीत पोहोचले. दोघेही आपली बाजू पोलिसांसमोर मांडताना एकमेकांना दोष देत होते. 'चौकात आल्याने माझ्या गाडीचा वेग कमी होता. हाच वेगात आला आणि माझ्या गाडीला येऊन धडकला' असेच दोघांचेही म्हणणे होते. त्यामुळे दोघांनी परस्परविरोधी तक्रार देण्यास सुरुवात केली. याच दरम्यान पोलिसांनी दोन्ही तक्रारदारांना तुमचे नाव काय, असा प्रश्न विचारला. तेव्हा दोघांनी आपले नाव आणि आडनाव सांगितले. दोघांचेही आडनाव एकच असल्याने ते सांगितल्यावर दोघे एकमेकांकडे बघू लागले. पोलिसांनीदेखील दोघांचे आडनाव एकच का, असे विचारले. त्यानंतर या दोघांचा वादाचा सूर मावळून त्यांनी एकमेकांशी संवाद साधायला सुरवात केली.
दोघांचे पूर्ण नाव आणि नातेवाइकांच्या नावांची विचारणा झाल्यावर दोन्ही कारचालक हे एकमेकांचे नातेवाइक असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर मात्र, दोघांनी सामोपचाराने मिटवून घेत आपली आता काहीच तक्रार नसल्याचे पोलिसांना सांगत वाद मिटवून घेतला. कोणालाही दुखापत झाली नव्हती, त्यातच दोघेही एकमेकांचे नातेवाइक निघाल्याने वाद सामोपचाराने मिटला. तुम्ही आपसात मिटवून घेतले असले, त आता वेगावर नियंत्रण ठेवा अशी तंबी देऊन पोलिसांनी दोघांचे जाबजबाब घेऊन सोडून दिले.