अ‍ॅपशहर

भाजपचे काम संकुचित

‘महापालिकेच्या निवडणुकीत बहुमताच्या जोरावर सत्ताधारी ठरलेला भारतीय जनता पक्ष पालिकेत संकुचित मनोवृत्तीने काम करत आहे,’ अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षा खासदार वंदना चव्हाण यांनी शुक्रवारी केली. गेली दहा ते पंधरा वर्षे पालिकेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. मात्र सत्ताधारी म्हणून काम करताना आम्ही विरोधी पक्षांना एकत्र घेऊनच कारभार केल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

Maharashtra Times 22 Apr 2017, 2:41 am
भाजपवर खासदार वंदना चव्हाण यांची टीका
महाराष्ट्र टाइम्स.कॉम vabdana chavan
भाजपचे काम संकुचित

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘महापालिकेच्या निवडणुकीत बहुमताच्या जोरावर सत्ताधारी ठरलेला भारतीय जनता पक्ष पालिकेत संकुचित मनोवृत्तीने काम करत आहे,’ अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षा खासदार वंदना चव्हाण यांनी शुक्रवारी केली. गेली दहा ते पंधरा वर्षे पालिकेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. मात्र सत्ताधारी म्हणून काम करताना आम्ही विरोधी पक्षांना एकत्र घेऊनच कारभार केल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
पालिकेत ९८ जागांचे बहुमत मिळाल्याने याचा चुकीचा अर्थ काढून भाजप विरोधी पक्षांना विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेत आहे. कात्रज-कोंढवा रोडच्या कामाची ३५ टक्के जादा दराने आलेली निविदा चार महिन्यांपूर्वी अमान्य केलेली असतानाही निवडणुकीनंतर केवळ बहुमताच्या जोरावर भाजपने हा ठराव मान्य करून घेतला. यामुळे पुणेकरांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणार असल्याचे त्यांनी सांगितले. सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी जाहीर केल्याप्रमाणे केंद्र सरकारच्या निधीतून कात्रज ते फुरसुंगी या बाह्यवळण रस्त्याचे काम होत असेल, तर राष्ट्रवादी त्याला पाठिंबा देऊन त्याचे स्वागतच करेल, अशी भूमिका त्यांनी मांडली. महापालिकेचे विरोधी पक्षनेते चेतन तुपे या वेळी उपस्थित होते.
पालिकेत सत्ताधारी म्हणून काम करणाऱ्या पक्षांनी सर्वांना एकत्र घेऊन शहरहिताचे निर्णय घेतले पाहिजे. गेली दोन टर्म पालिकेत सत्ताधारी म्हणून काम करताना राष्ट्रवादीने विरोधी पक्षांना बरोबर घेऊन सभागृह चालविले आहे. मात्र, नुकत्याच सत्ताधारी झालेल्या भाजपला याचा विसर पडला आहे. विरोधी पक्षांना विश्वासात घेणे तर दूरच राहिले. सभागृहात बसण्याच्या जागांचे वाटप, सभागृहात विरोधी पक्षांच्या सभासदांना बोलण्यास मज्जाव करणे, अशा वृत्तीचे दर्शन भाजपकडून घडत आहे. यामुळे शहराच्या विकासाला खीळ बसेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

शहरासमोर अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. वाहतूक, कचरा समस्या, पाणीप्रश्न असे अनेक विषय आहेत. यावर मार्ग काढण्यासाठी महापौर, सभागृह नेते यांनी पुढाकार घेत सर्वांना एकत्र घेऊन तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. विरोधकांना एकत्र घेऊन बैठका घेतल्यानंतरच सत्ताधाऱ्यांना प्रशासनावर अंकुश ठेवता येइल. स्वीकृत सभासदांचे अर्ज भरण्यावरून पालिकेत झालेल्या हाणामारीचा कडक शब्दात खासदार चव्हाण यांनी समाचार घेतला. एकाच पक्षांचे पदाधिकारी अशा पद्धतीने पालिकेत हाणामारी करत असतील तर शहरात ‘गुंडाराज’ आल्याचे दिसते. या प्रकारातून भाजपने आपले खरे रूप दाखविले असल्याची टीका त्यांनी केली.
००
कात्रज चौकात सोमवारी आंदोलन
कात्रज कोंढवा रोडच्या कामासाठी ३५ टक्के जादा दराची निविदा बहुमताच्या जोरावर मान्य करून भाजपने पुणेकरांवर शंभर कोटी रुपयांचा वाढीव बोजा टाकला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हा रस्ता करण्याची तयारी दाखविल्याची माहिती सभागृह नेते भिमाले यांनी सभागृहात का नाही दिली? असा प्रश्न खासदार चव्हाण यांनी उपस्थित केला. कात्रज चौकातील वाहतुकीच्या कोंडीकडे प्रशासना जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने या विरोधात स्थानिक नगरसेविका अमृता बाबर, पक्षाचे कार्यकर्ते नमेश बाबर या चौकात २४ एप्रिलला आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज