म. टा. प्रतिनिधी, पुणे: 'राज्यातील पूर परिस्थिती टाळण्यासाठी यंदा धरणांमध्ये ऑगस्ट महिन्यापर्यंत सुमारे ७० टक्के पाणी साठविण्यात येणार आहे. त्यामुळे पाण्याचा विसर्ग करण्यावर नियंत्रण येऊ शकणार आहे.' असे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. निसर्ग चक्रीवादळामुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा आढावा वडेट्टीवार यांनी घेतला. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
'धरणांमध्ये ऑगस्ट महिन्यापर्यंत ७० टक्के पाणीसाठा ठेवण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात येणार आहे. शंभर टक्के धरणे भरल्यानंतर धरणांतून पाणी सोडण्यात येत असते. त्यामुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण होते. त्यामुळे हा निर्णय घेण्यात येणार आहे.' असं वडेट्टीवार म्हणाले
राज्यात आज करोना रुग्णसंख्येचा उच्चांक; ३,००७ नवे बाधित, ९१ मृत्यू
'राज्यातील धरणांमध्ये सध्या सुमारे १५ ते २५ टक्के पाणीसाठा आहे. यावर्षीही पावसाचे प्रमाण हे जास्त असल्याचा अंदाज आहे. या बाबी विचारात घेऊन ऑगस्ट महिन्यापर्यंत ३० टक्के पाणीसाठा कमी ठेवण्यात येणार आहे.' असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
सोनू सूद मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर; राऊतांनी केलं ट्वीट
'सांगली आणि कोल्हापूरमध्ये गेल्या वर्षी झालेली पूरस्थिती लक्षात घेऊन यंदा अशी स्थिती होऊ नये, यासाठी नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी ११६ बोटी खरेदी केल्या जाणार आहेत'. असेही ते म्हणाले.
'धरणांमध्ये ऑगस्ट महिन्यापर्यंत ७० टक्के पाणीसाठा ठेवण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात येणार आहे. शंभर टक्के धरणे भरल्यानंतर धरणांतून पाणी सोडण्यात येत असते. त्यामुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण होते. त्यामुळे हा निर्णय घेण्यात येणार आहे.' असं वडेट्टीवार म्हणाले
राज्यात आज करोना रुग्णसंख्येचा उच्चांक; ३,००७ नवे बाधित, ९१ मृत्यू
'राज्यातील धरणांमध्ये सध्या सुमारे १५ ते २५ टक्के पाणीसाठा आहे. यावर्षीही पावसाचे प्रमाण हे जास्त असल्याचा अंदाज आहे. या बाबी विचारात घेऊन ऑगस्ट महिन्यापर्यंत ३० टक्के पाणीसाठा कमी ठेवण्यात येणार आहे.' असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
सोनू सूद मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर; राऊतांनी केलं ट्वीट
'सांगली आणि कोल्हापूरमध्ये गेल्या वर्षी झालेली पूरस्थिती लक्षात घेऊन यंदा अशी स्थिती होऊ नये, यासाठी नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी ११६ बोटी खरेदी केल्या जाणार आहेत'. असेही ते म्हणाले.