अ‍ॅपशहर

विजयासाठी गरज २० हजार मतांची

आगामी महापालिका निवडणुकीसाठी चार सदस्यांच्या प्रभागामुळे इच्छुक उमेदवारांना ८० हजार नागरिकांपर्यंत पोहोचण्याची तयारी ठेवावी लागणार आहे. प्रभागाच्या रचनेनुसार हे प्रमाण कमी-अधिक होण्याची शक्यता आहे. मोठ्या प्रभागात उमेदवारांना ८८ हजार लोकसंख्येचा विचार करावा लागणार आहे. यामध्ये प्रत्यक्ष मतदारांची संख्या आणखी कमी होणार असली, तरी विजयासाठी किमान १५ ते २० हजार मतांची बेगमी करून ठेवावी लागणार आहे.

Maharashtra Times 31 May 2016, 3:59 am
चार सदस्यीय प्रभागामुळे गणित बदलले
महाराष्ट्र टाइम्स.कॉम vote win pmc pune election
विजयासाठी गरज २० हजार मतांची

म. टा. प्रतिनिधी, पुणे
आगामी महापालिका निवडणुकीसाठी चार सदस्यांच्या प्रभागामुळे इच्छुक उमेदवारांना ८० हजार नागरिकांपर्यंत पोहोचण्याची तयारी ठेवावी लागणार आहे. प्रभागाच्या रचनेनुसार हे प्रमाण कमी-अधिक होण्याची शक्यता आहे. मोठ्या प्रभागात उमेदवारांना ८८ हजार लोकसंख्येचा विचार करावा लागणार आहे. यामध्ये प्रत्यक्ष मतदारांची संख्या आणखी कमी होणार असली, तरी विजयासाठी किमान १५ ते २० हजार मतांची बेगमी करून ठेवावी लागणार आहे.
आगामी महापालिका निवडणुकीसाठी चार सदस्यांच्या एका प्रभागावर राज्य सरकारने अधिकृत मोहोर उमटविली आहे. शहराची २०११ची लोकसंख्या गृहित धरून प्रभागांची रचना अंतिम केली जाणार आहे. त्यानुसार, चार सदस्यांचे ३८ प्रभाग होणार हे निश्चित आहे. प्रभागाची सरासरी लोकसंख्या सुमारे ८० हजारांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार सरासरी लोकसंख्येच्या १० टक्के कमी-जास्त फरकाने प्रभागाची रचना करता येऊ शकते. म्हणजेच, प्रभागाची लोकसंख्या किमान ७२ हजार तर, कमाल ८८ हजारांपर्यंत जाऊ शकते.
लोकसंख्येच्या निकषांवर प्रभागाची रचना अंतिम झाली, की जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेली १ जानेवारीची मतदारयादी प्रमाण मानून प्रभागनिहाय मतदारांची संख्या अंतिम करण्याचे काम केले जाते. सरासरी ८० हजारांच्या प्रभागामध्ये मतदारांचे प्रमाण ५५ ते ६० हजार असेल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे, महापालिकेसाठी इच्छुक असणाऱ्या सर्व उमेदवारांना मतदारसंख्या गृहित धरून आतापासूनच तयारी करावी लागणार आहे. महापालिका निवडणुकांसाठी ५० ते ५५ टक्केच मतदान होत असल्याचा पूर्वानुभाव लक्षात घेतला, तरी विजयासाठी कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराला आपल्या पारड्यात १५ ते २० हजार मतांची बेगमी करावी लागणार असल्याचे स्पष्ट होते.
.................
‘अनुसूचित’नगरसेवक वाढणार?
महापालिकेच्या २०१२मध्ये झालेल्या निवडणुकीत २०११ची लोकसंख्या प्रमाण मानण्यात आली असली, तरी आरक्षणासाठी २००१चे निकष वापरण्यात आले होते. आगामी निवडणुकीत मात्र, २०११च्या जनगणनेचा सर्व तपशील उपलब्ध असल्याने त्यात बदल होण्याची शक्यता आहे. अनुसूचित जमातींची (एसटी) शहरातील लोकसंख्या १० वर्षांत वाढली असल्याने त्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नगरसेवकांची संख्या वाढण्याची चिन्हे आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज