म. टा. प्रतिनिधी, पुणे
चौकीदाराच्या चुकीच्या नियोजनामुळेच पुण्यावर पाणी कपातीचे संकट ओढावले असून लोकसभेच्या मतदानानंतर शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात केली जाणार असल्याचा दावा काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी शुक्रवारी केला. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार पालकमंत्री गिरीश बापट यांनी मतदानानंतर शहरात अधिकची पाणी कपात केली जाणार की नाही, याबाबत स्पष्ट भूमिका तत्काळ मांडावी, असे आवाहनही त्यांनी बापट यांना दिले. दरम्यान, 'पुण्याच्या 'चौकीदारा'वर असलेले आरोप पाहता हा चौकीदार चोरच आहे,' अशी टीका बागवे यांनी बापट यांचे नाव न घेता या वेळी केली.
बागवे यांनी काँग्रेस भवनात झालेल्या पत्रकारपरिषदेत बापट यांच्यावर टीका केली. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे, रिपब्लिकन युवा मोर्चाचे नेते राहुल डंबाळे, आरपीआय कवाडे गटाचे प्रकाश भालेराव, आरपीआय गवई गटाचे बबनराव अडसूळ, दलित पँथरचे प्रकाश साळवे, आंबेडकरवादी गटाचे विठ्ठल गायकवाड, 'रिपाईं'चे महंमदभाई शेख, रिपब्लिकन युवा मोर्चाचे अखिल दोडके, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रसिद्धी प्रमुख किरण कद्रे आदी उपस्थित होते. पुण्यात सध्या दिवसातून एकवेळ पाणी पुरवठा करण्यात येत असून तो अत्यंत तोकडा आहे. शहराच्या अनेक भागांत पाणी मिळत नसून ही वेळ केवळ चुकीच्या नियोजनामुळे आल्याचे बागवे म्हणाले. पुण्यात २३ एप्रिलला; तर शिरूर मतदारसंघात २९ एप्रिलला मतदान होणार आहे. त्यानंतर शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्यात येणार आहे. पालकमंत्र्यांनी मतदानानंतरची संभावित पाणीकपातीबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी टीका बागवे यांनी केली.
प्रकाश आंबेडकरांवर टीका
'संविधानविरोधी मोदी सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी आघाडीतर्फे जनजागरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. शहराच्या विविध भागांत झोपडपट्टी आणि गल्ल्यांमध्ये आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांचा प्रचार करण्यात येत आहे. ही निवडणूक धर्मांध आणि पुरोगामी विचारांची लढाई असून मोदी सरकारच्या राजवटीत विशिष्ट धर्माच्या लोकांना तसेच मागासवर्गीयांना सापत्नभावाची वागणूक दिली आहे,' असा आरोप बागवे यांनी केला. संविधान वाचविण्यासाठी शहराच्या विविध भागांत १०० कोपरा सभा घेणार असल्याचे डंबाळे यांनी या वेळी सांगितले. वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग यापूर्वीही झाला होता. १९९६ च्या निवडणुकीत राज्यात अल्पसंख्याक हे काँग्रेसबरोबर नसल्याने त्यांचा पराभव होत युतीच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या होत्या. मात्र, त्यानंतरच्या निवडणुकीत काँग्रेस अल्पसंख्याकांच्या मदतीने राज्यात पहिल्या स्थानावर पोहोचली होती. या निवडणुकीत अल्पसंख्याक हे आघाडीसोबत असून संविधान वाचवा -देश वाचवा हे अभियान सुरू केल्याचे डंबाळे म्हणाले. या वेळी बागवे आणि डंबाळे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावरही टीका केली.
चौकीदाराच्या चुकीच्या नियोजनामुळेच पुण्यावर पाणी कपातीचे संकट ओढावले असून लोकसभेच्या मतदानानंतर शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात केली जाणार असल्याचा दावा काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी शुक्रवारी केला. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार पालकमंत्री गिरीश बापट यांनी मतदानानंतर शहरात अधिकची पाणी कपात केली जाणार की नाही, याबाबत स्पष्ट भूमिका तत्काळ मांडावी, असे आवाहनही त्यांनी बापट यांना दिले. दरम्यान, 'पुण्याच्या 'चौकीदारा'वर असलेले आरोप पाहता हा चौकीदार चोरच आहे,' अशी टीका बागवे यांनी बापट यांचे नाव न घेता या वेळी केली.
बागवे यांनी काँग्रेस भवनात झालेल्या पत्रकारपरिषदेत बापट यांच्यावर टीका केली. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे, रिपब्लिकन युवा मोर्चाचे नेते राहुल डंबाळे, आरपीआय कवाडे गटाचे प्रकाश भालेराव, आरपीआय गवई गटाचे बबनराव अडसूळ, दलित पँथरचे प्रकाश साळवे, आंबेडकरवादी गटाचे विठ्ठल गायकवाड, 'रिपाईं'चे महंमदभाई शेख, रिपब्लिकन युवा मोर्चाचे अखिल दोडके, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रसिद्धी प्रमुख किरण कद्रे आदी उपस्थित होते. पुण्यात सध्या दिवसातून एकवेळ पाणी पुरवठा करण्यात येत असून तो अत्यंत तोकडा आहे. शहराच्या अनेक भागांत पाणी मिळत नसून ही वेळ केवळ चुकीच्या नियोजनामुळे आल्याचे बागवे म्हणाले. पुण्यात २३ एप्रिलला; तर शिरूर मतदारसंघात २९ एप्रिलला मतदान होणार आहे. त्यानंतर शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्यात येणार आहे. पालकमंत्र्यांनी मतदानानंतरची संभावित पाणीकपातीबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी टीका बागवे यांनी केली.
प्रकाश आंबेडकरांवर टीका
'संविधानविरोधी मोदी सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी आघाडीतर्फे जनजागरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. शहराच्या विविध भागांत झोपडपट्टी आणि गल्ल्यांमध्ये आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांचा प्रचार करण्यात येत आहे. ही निवडणूक धर्मांध आणि पुरोगामी विचारांची लढाई असून मोदी सरकारच्या राजवटीत विशिष्ट धर्माच्या लोकांना तसेच मागासवर्गीयांना सापत्नभावाची वागणूक दिली आहे,' असा आरोप बागवे यांनी केला. संविधान वाचविण्यासाठी शहराच्या विविध भागांत १०० कोपरा सभा घेणार असल्याचे डंबाळे यांनी या वेळी सांगितले. वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग यापूर्वीही झाला होता. १९९६ च्या निवडणुकीत राज्यात अल्पसंख्याक हे काँग्रेसबरोबर नसल्याने त्यांचा पराभव होत युतीच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या होत्या. मात्र, त्यानंतरच्या निवडणुकीत काँग्रेस अल्पसंख्याकांच्या मदतीने राज्यात पहिल्या स्थानावर पोहोचली होती. या निवडणुकीत अल्पसंख्याक हे आघाडीसोबत असून संविधान वाचवा -देश वाचवा हे अभियान सुरू केल्याचे डंबाळे म्हणाले. या वेळी बागवे आणि डंबाळे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावरही टीका केली.