म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
पवना धरणावरील जलविद्युत प्रकल्पात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे पिंपरी-चिंचवडला अपुरा पाणीपुरवठा होत असून, पुरेसा पाणीउपसा होत नसल्यामुळे अजूनही पुढील दोन दिवस पाणीपुरवठा विस्कळित होणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.
शहराला पवना धरणातून पाणीपुरवठा होतो. तेथून सोडलेल्या पाण्याची पातळी रावेत पंपिंग स्टेशन येथील जलउपसा केंद्राजवळ खालावली आहे. त्याचा परिणाम पाणी उपशावर झाला आहे. त्यामुळे आणखी पुढील ४८ तास पिंपरी-चिंचवडमध्ये पाणीपुरवठा अपुरा आणि कमी दाबाने होणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे. गेल्या तीन दिवसांपासून अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिक हैराण आहेत. त्यांना आता सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी आणखी दोन दिवस वाट पाहावी लागणार आहे. दरम्यान, पवना जलविद्युत प्रकल्पातील बिघाड दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर चालू आहे. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे आवाहन पालिकेने केले आहे.
....
पवना धरणावरील जलविद्युत प्रकल्पात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे पिंपरी-चिंचवडला अपुरा पाणीपुरवठा होत असून, पुरेसा पाणीउपसा होत नसल्यामुळे अजूनही पुढील दोन दिवस पाणीपुरवठा विस्कळित होणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.
शहराला पवना धरणातून पाणीपुरवठा होतो. तेथून सोडलेल्या पाण्याची पातळी रावेत पंपिंग स्टेशन येथील जलउपसा केंद्राजवळ खालावली आहे. त्याचा परिणाम पाणी उपशावर झाला आहे. त्यामुळे आणखी पुढील ४८ तास पिंपरी-चिंचवडमध्ये पाणीपुरवठा अपुरा आणि कमी दाबाने होणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे. गेल्या तीन दिवसांपासून अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिक हैराण आहेत. त्यांना आता सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी आणखी दोन दिवस वाट पाहावी लागणार आहे. दरम्यान, पवना जलविद्युत प्रकल्पातील बिघाड दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर चालू आहे. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे आवाहन पालिकेने केले आहे.
....