म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
पिंपरी-चिंचवडकरांच्या पाणीपट्टीत वाढ करण्याचा ठराव करून स्थायी समितीने तो मंजुरीसाठी सर्वसाधरण सभेपुढे ठेवला होता. बुधवारी (२८ फेब्रुवारी) या प्रस्तावित दरवाढीवरून सर्वसाधारणसभेत अभूतपूर्व गोंधळ झाला. या गोंधळातच पाणीपट्टी दरवाढ मंजुर झाल्याची घोषणा महापौर नितीन काळजे यांनी केली. त्यामुळे विरोधीपक्षांनी जोरदार घोषणाबाजी करीत सभात्याग केला. या वेळी विरोधीपक्षाच्या नगरसेवकांनी महापौर-आयुक्तांच्या पीठासिन जागेवर (डायसवर) तेथील ग्लासमधील पाणी ओतले. तसेच मानदंड पळविण्याचा प्रयत्न केला.
पिंपरी-चिंचवड महापलिकेची फेब्रुवारी महिन्याची तहकूब सर्वसाधारण सभा बुधवारी पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर नितीन काळजे होते. पाणीपट्टी दरवाढीचा विषय चर्चेला येताच भाजपचे नगरसेवक विलास मडिगेरी यांनी पाणीपट्टीत फेरबदल करण्याची उपसूचना मांडली. त्यानंतर पाणीपट्टी दरवाढीवर चर्चेला सुरुवात झाली. या चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे आणि भाजपच्या नगरसेवकांनी सहभाग घेतला. या वेळी राष्ट्रवादी, शिवसेना, मनसेच्या नगरसेवकांनी पाणीपट्टीला विरोध दर्शविला. भाजपच्या काही नगरसेवकांनी पाणीपुरवठा सुरळीत करून मगच दरवाढ करावी अशी भूमिका घेतली.
महापौरांच्या प्रभागातील राष्ट्रवादीच्या नगरसेविका विनया तापकीर यांनी चर्चेत सहभाग घेतना भाजपवर टीका केली. त्यावर उत्तरादाखल भाजपच्या याच प्रभागातील नगरसेविका सविता बुर्डे यांनी राष्ट्रवादीवर टीका केली असता वादंग झाला. सर्व विरोधक महापौरांच्या समोरील जागेत एकवटले. त्यांनी मानदंड ओढण्याचा प्रयत्न केला. त्यावर मानदंडाला हात लावला तर बघा, असा दमच महापौरांनी भरला. परिणामी वादात आणखीनच भर पडली. या गोंधळातच महापौरांनी हा विषय मंजूर झाल्याचे जाहीर केले. त्यानंतरही गोंधळ थांबत नसल्यामुळे दहा मिनिटांसाठी सभा तहकूब करण्यात आली.
या वेळी काही नगरसेवकांनी दरवाढीच्या प्रस्तावाचे कागद सभागृहात भिरकावले. 'पाणीचोर भाजप' अशा घोषणाबाजी करून विरोधीपक्षांनी विरोध सुरूच ठेवला होता. दहा मिनिटांनी महापौर परतले; पण विरोधकांचा गोंधळ सुरूच होता. त्यावर 'तुम्ही तुमचा विरोध नोंदवा. त्यावर चर्चा करा,' असे विरोधी पक्षांच्या नगरसेवकांना महापौरांनी सांगितले. परंतु, 'विषय मंजूर झाल्यावर त्याला विरोध कसा नोंदवायचा, त्यावर चर्चा कशी करायची, त्या चर्चेला काही अर्थ आहे का,' असा सवाल राष्ट्रवादी, शिवसेना आणि मनसेच्या नगरसेवकांनी उपस्थित केला आणि जोरदार घोषणाबाजी करीत सभात्याग केला.
सर्व गोंधळामध्ये विषय मंजूर करताना उपसूचनेला अनुमोदन न घेताच परस्पर हा विषय रेटून नेण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. त्यावरून राष्ट्रवादी, शिवसेना आणि मनसेचे नगरसेवक आक्रमक झाले. यावर स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांनी महापौर आसनासमोर आंदोलन करणाऱ्या नगरसेवकांना तीन महिने निलंबित करा, अशी सूचना महापौरांना केल्याने गोंधळात भर पडली.
महिला सदस्यांच्या वादामुळे महापौरांची चिडचिड
महापालिकेच्या चऱ्होली प्रभागातून निवडून आलेले नितीन काळजे महापौर आहेत. तर याच प्रभागातून निवडून आलेल्या विनया तापकीर यांनी पाणी पुरवठ्यावरून सत्ताधारी भाजपवर टीका केली. त्यानंतर याच प्रभागातील भाजपच्या नगरसेविका सुवर्णा बुर्डे यांनी 'इतकी वर्षे सत्तेत असलेल्यांनी आता टीका करणे कितपत उचित आहे,' असा सवाल केला. यावरून बोर्डे आणि तापकीर यांच्यात चांगलीच हमरीतुमरी रंगली. यावर महापौर यांनी तोडगा काढण्याऐवजी 'या दोघींचे माईक बंद करा आणि या दोघींना बाहेर काढा' असे शब्द वापरले. यावरून चांगलाच गदारोळ झाला. चऱ्होलीतील स्थानिक राजकारणावरून कायमच एकमेकांना 'पाण्यात' पाहणाऱ्यांनी सभागृहात पाणी पुरवठ्यावरून गोंधळ घातल्याने चर्चा आणि उपसचूनांविनाच हा विषय मंजूर झाला, अशी चर्चा महापालिका वर्तुळात रंगली होती.
पिंपरी-चिंचवडकरांच्या पाणीपट्टीत वाढ करण्याचा ठराव करून स्थायी समितीने तो मंजुरीसाठी सर्वसाधरण सभेपुढे ठेवला होता. बुधवारी (२८ फेब्रुवारी) या प्रस्तावित दरवाढीवरून सर्वसाधारणसभेत अभूतपूर्व गोंधळ झाला. या गोंधळातच पाणीपट्टी दरवाढ मंजुर झाल्याची घोषणा महापौर नितीन काळजे यांनी केली. त्यामुळे विरोधीपक्षांनी जोरदार घोषणाबाजी करीत सभात्याग केला. या वेळी विरोधीपक्षाच्या नगरसेवकांनी महापौर-आयुक्तांच्या पीठासिन जागेवर (डायसवर) तेथील ग्लासमधील पाणी ओतले. तसेच मानदंड पळविण्याचा प्रयत्न केला.
पिंपरी-चिंचवड महापलिकेची फेब्रुवारी महिन्याची तहकूब सर्वसाधारण सभा बुधवारी पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर नितीन काळजे होते. पाणीपट्टी दरवाढीचा विषय चर्चेला येताच भाजपचे नगरसेवक विलास मडिगेरी यांनी पाणीपट्टीत फेरबदल करण्याची उपसूचना मांडली. त्यानंतर पाणीपट्टी दरवाढीवर चर्चेला सुरुवात झाली. या चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे आणि भाजपच्या नगरसेवकांनी सहभाग घेतला. या वेळी राष्ट्रवादी, शिवसेना, मनसेच्या नगरसेवकांनी पाणीपट्टीला विरोध दर्शविला. भाजपच्या काही नगरसेवकांनी पाणीपुरवठा सुरळीत करून मगच दरवाढ करावी अशी भूमिका घेतली.
महापौरांच्या प्रभागातील राष्ट्रवादीच्या नगरसेविका विनया तापकीर यांनी चर्चेत सहभाग घेतना भाजपवर टीका केली. त्यावर उत्तरादाखल भाजपच्या याच प्रभागातील नगरसेविका सविता बुर्डे यांनी राष्ट्रवादीवर टीका केली असता वादंग झाला. सर्व विरोधक महापौरांच्या समोरील जागेत एकवटले. त्यांनी मानदंड ओढण्याचा प्रयत्न केला. त्यावर मानदंडाला हात लावला तर बघा, असा दमच महापौरांनी भरला. परिणामी वादात आणखीनच भर पडली. या गोंधळातच महापौरांनी हा विषय मंजूर झाल्याचे जाहीर केले. त्यानंतरही गोंधळ थांबत नसल्यामुळे दहा मिनिटांसाठी सभा तहकूब करण्यात आली.
या वेळी काही नगरसेवकांनी दरवाढीच्या प्रस्तावाचे कागद सभागृहात भिरकावले. 'पाणीचोर भाजप' अशा घोषणाबाजी करून विरोधीपक्षांनी विरोध सुरूच ठेवला होता. दहा मिनिटांनी महापौर परतले; पण विरोधकांचा गोंधळ सुरूच होता. त्यावर 'तुम्ही तुमचा विरोध नोंदवा. त्यावर चर्चा करा,' असे विरोधी पक्षांच्या नगरसेवकांना महापौरांनी सांगितले. परंतु, 'विषय मंजूर झाल्यावर त्याला विरोध कसा नोंदवायचा, त्यावर चर्चा कशी करायची, त्या चर्चेला काही अर्थ आहे का,' असा सवाल राष्ट्रवादी, शिवसेना आणि मनसेच्या नगरसेवकांनी उपस्थित केला आणि जोरदार घोषणाबाजी करीत सभात्याग केला.
सर्व गोंधळामध्ये विषय मंजूर करताना उपसूचनेला अनुमोदन न घेताच परस्पर हा विषय रेटून नेण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. त्यावरून राष्ट्रवादी, शिवसेना आणि मनसेचे नगरसेवक आक्रमक झाले. यावर स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांनी महापौर आसनासमोर आंदोलन करणाऱ्या नगरसेवकांना तीन महिने निलंबित करा, अशी सूचना महापौरांना केल्याने गोंधळात भर पडली.
महिला सदस्यांच्या वादामुळे महापौरांची चिडचिड
महापालिकेच्या चऱ्होली प्रभागातून निवडून आलेले नितीन काळजे महापौर आहेत. तर याच प्रभागातून निवडून आलेल्या विनया तापकीर यांनी पाणी पुरवठ्यावरून सत्ताधारी भाजपवर टीका केली. त्यानंतर याच प्रभागातील भाजपच्या नगरसेविका सुवर्णा बुर्डे यांनी 'इतकी वर्षे सत्तेत असलेल्यांनी आता टीका करणे कितपत उचित आहे,' असा सवाल केला. यावरून बोर्डे आणि तापकीर यांच्यात चांगलीच हमरीतुमरी रंगली. यावर महापौर यांनी तोडगा काढण्याऐवजी 'या दोघींचे माईक बंद करा आणि या दोघींना बाहेर काढा' असे शब्द वापरले. यावरून चांगलाच गदारोळ झाला. चऱ्होलीतील स्थानिक राजकारणावरून कायमच एकमेकांना 'पाण्यात' पाहणाऱ्यांनी सभागृहात पाणी पुरवठ्यावरून गोंधळ घातल्याने चर्चा आणि उपसचूनांविनाच हा विषय मंजूर झाला, अशी चर्चा महापालिका वर्तुळात रंगली होती.