पुणे: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला पाऊस थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही. उद्या २३ ऑक्टोबर रोजी पुणे, अहमदनगर, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद आणि बीडमध्ये काही ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडणार असून राज्यात पुढचे तीन दिवस पावसाचेच राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
अरबी समुद्राच्या आग्नेय दिशेला कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. तसेच बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात २७ ऑक्टोबरपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळण्याची शक्यता असल्याचं हवामानशास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी सांगितलं. उद्या २३ ऑक्टोबर रोजी पुणे, नगर, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद आणि बीडमध्ये ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता कश्यपी यांनी वर्तवली आहे. पुण्यात उद्या एक ते दीड तास मेघगर्जनेसह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर २४ ऑक्टोबर रोजी पुण्यात हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. दिवाळीत म्हणजे २५ ते २७ ऑक्टोबर दरम्यान पुण्यात काही ठिकाणी तुरळक पाऊस पडेल. हवामानात बदल झाला तरच तुरळक सरी बरसतील. मात्र २८ ऑक्टोबर रोजी पुण्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता असल्याचं हवामान खात्यानं स्पष्ट केलं.
कोकण आणि गोव्यात २२ आणि २३ ऑक्टोबर रोजी जोरदार पाऊस पडणार असून सिंधुदुर्गातील काही भागात २२ ते २६ ऑक्टोबर दरम्यान मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात २२ ते २४ ऑक्टोबर दरम्यान मेघगर्जनेसह पाऊस होणार आहे. अहमदनगर, कोल्हापूर, सातारा आणि पुण्यात काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी बरसण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातही बीडमध्ये उद्या काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा आंदाज आहे. २२, २३, २४ ऑक्टोबर रोजी उस्मानाबादेत काही ठिकाणी हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. मात्र २५ आणि २६ ऑक्टोबरनंतर मराठवाड्यातील पाऊस कमी होणार असल्याचं हवामान खात्याने स्पष्ट केलं आहे. विदर्भात बुलडाणा, गोंदिया आणि गडचिरोलीत आज आणि उद्या पावसाच्या सरी बरसणार असल्याचं हवामान खात्यानं सांगितलं.
दरम्यान, आज पुणे आणि साताऱ्यात पावसाने हजेरी लावली. पुण्यात काही भागात आज सकाळपासूनच रिपरिप सुरू होती. त्यामुळे पुणेकरांची तारांबळ उडाली. तर साताऱ्यात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. आजही पावसाने मुक्काम ठोकल्याने साताऱ्यातील आंधळी धरण भरून गेलं आहे. त्यामुळे माणगंगा नदीला पूर आला असून नदी किनाऱ्या लगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कालपासून सुरू असलेल्या पावसामुळे साताऱ्यातील सातारा-सोलापूर रस्ताही बंद करण्यात आला असून रहदारीसाठीचा गोंदवले पूलही बंद ठेवण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या पावसामुळे साताऱ्यात अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. त्यामुळे साताऱ्यातील ग्रामस्थांची प्रचंड तारांबळ उडाली आहे.
कोल्हापूर, साताऱ्यात मुसळधार; उद्याच्या मतदानावर पावसाचं सावट
अरबी समुद्राच्या आग्नेय दिशेला कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. तसेच बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात २७ ऑक्टोबरपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळण्याची शक्यता असल्याचं हवामानशास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी सांगितलं. उद्या २३ ऑक्टोबर रोजी पुणे, नगर, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद आणि बीडमध्ये ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता कश्यपी यांनी वर्तवली आहे. पुण्यात उद्या एक ते दीड तास मेघगर्जनेसह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर २४ ऑक्टोबर रोजी पुण्यात हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. दिवाळीत म्हणजे २५ ते २७ ऑक्टोबर दरम्यान पुण्यात काही ठिकाणी तुरळक पाऊस पडेल. हवामानात बदल झाला तरच तुरळक सरी बरसतील. मात्र २८ ऑक्टोबर रोजी पुण्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता असल्याचं हवामान खात्यानं स्पष्ट केलं.
कोकण आणि गोव्यात २२ आणि २३ ऑक्टोबर रोजी जोरदार पाऊस पडणार असून सिंधुदुर्गातील काही भागात २२ ते २६ ऑक्टोबर दरम्यान मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात २२ ते २४ ऑक्टोबर दरम्यान मेघगर्जनेसह पाऊस होणार आहे. अहमदनगर, कोल्हापूर, सातारा आणि पुण्यात काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी बरसण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातही बीडमध्ये उद्या काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा आंदाज आहे. २२, २३, २४ ऑक्टोबर रोजी उस्मानाबादेत काही ठिकाणी हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. मात्र २५ आणि २६ ऑक्टोबरनंतर मराठवाड्यातील पाऊस कमी होणार असल्याचं हवामान खात्याने स्पष्ट केलं आहे. विदर्भात बुलडाणा, गोंदिया आणि गडचिरोलीत आज आणि उद्या पावसाच्या सरी बरसणार असल्याचं हवामान खात्यानं सांगितलं.
दरम्यान, आज पुणे आणि साताऱ्यात पावसाने हजेरी लावली. पुण्यात काही भागात आज सकाळपासूनच रिपरिप सुरू होती. त्यामुळे पुणेकरांची तारांबळ उडाली. तर साताऱ्यात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. आजही पावसाने मुक्काम ठोकल्याने साताऱ्यातील आंधळी धरण भरून गेलं आहे. त्यामुळे माणगंगा नदीला पूर आला असून नदी किनाऱ्या लगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कालपासून सुरू असलेल्या पावसामुळे साताऱ्यातील सातारा-सोलापूर रस्ताही बंद करण्यात आला असून रहदारीसाठीचा गोंदवले पूलही बंद ठेवण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या पावसामुळे साताऱ्यात अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. त्यामुळे साताऱ्यातील ग्रामस्थांची प्रचंड तारांबळ उडाली आहे.
कोल्हापूर, साताऱ्यात मुसळधार; उद्याच्या मतदानावर पावसाचं सावट