अ‍ॅपशहर

वारं फिरलंय, इतिहास घडणार... बाबांच्या सभेनंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यात भर पावसात घेतलेल्या प्रचारसभेची चर्चा महाराष्ट्रभर सुरू आहे. पवारांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही यावर सूचक प्रतिक्रिया दिली आहे. 'वारं फिरलंय, इतिहास घडणार...' असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Oct 2019, 1:00 pm
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यात भर पावसात घेतलेल्या प्रचारसभेची चर्चा महाराष्ट्रभर सुरू आहे. पवारांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही यावर सूचक प्रतिक्रिया दिली आहे. 'वारं फिरलंय, इतिहास घडणार...' असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम what supriya sule says about sharad pawars satara rally
वारं फिरलंय, इतिहास घडणार... बाबांच्या सभेनंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया


'ईडी'ला 'येडी' बनवून टाकेन: शरद पवार

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू झाल्यापासून पायाला भिंगरी लावून फिरणाऱ्या पवार यांनी काल साताऱ्यात जाहीर सभा घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार शिवेंद्रराजे व खासदार उदयनराजे हे पक्ष सोडून गेल्यामुळं पवारांच्या या सभेकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आदल्या दिवशी सभा घेऊन गेल्यानं राष्ट्रवादीसाठी ही सभा महत्त्वाची होती. असं असताना अचानक पाऊस सुरू झाला. त्यामुळं सभा होणार की नाही अशी चर्चा सुरू झाली. मात्र, शरद पवारांनी भर पावसातच उपस्थितांसाठी भाषण सुरू केलं आणि संपूर्ण माहोल बदलून गेला. महाराष्ट्रात सध्या पवारांच्या या भाषणाची चर्चा सुरू आहे.

सुप्रिया सुळे यांनाही वडिलांची ही सभा पाहून राहावलं नाही. त्यांनी पावसात भिजत भाषण करणाऱ्या पवारांच्या फोटोसह लगेचच ट्विट केलं. 'साताऱ्याच्या मातीनं आज पुन्हा इतिहास घडवला. तुफान पावसातही माणसांनी तुडुंब भरलेलं मैदान आदरणीय साहेबांना ऐकत होतं. 'वारं फिरलंय, इतिहास घडणार' हा संदेश देणारी ही सभा होती. या सभेनं सर्वांनाच नवी ऊर्जा मिळाली,' असं सुळे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

१३ वर्षे मंत्री असूनही काही करता आले नाही, बांगड्या भरा- पवार

निवडणुकीच्या सर्व बातम्या, व्हिडिओ एकाच क्लिकवर

महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण २८८ जागांसाठी २१ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून त्यासाठी ८ कोटी ९५ लाख ६२ हजार ७०६ मतदारांची नोंदणी झाली आहे. महाराष्ट्रात एकूण ९५,४७३ मतदान केंद्रं असून १.८ लाख ईव्हीएमचा मतदानासाठी वापर होणार आहे.

अशी होतेय निवडणूक

२१ ऑक्टोबर : मतदान
२४ ऑक्टोबर : मतमोजणी

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज