म. टा. प्रतिनिधी, पुणे
'देशात निळ्या, हिरव्या आणि भगव्या रंगाच्या छत्राखाली लोकांची विभागणी सुरू आहे का, अशीच भीती सध्या वाटत आहे. या परिस्थितीतच देशात असहिष्णुता वाढत असून सत्ता काबीज करण्यासाठी धर्माचे राजकारण होत आहे. या परिस्थितीत भारत महासत्ता होणार नाही,' असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांनी बुधवारी व्यक्त केले.
भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाच्या २२ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित समारंभात ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख, ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार, वैद्यकीय तज्ञ डॉ. विनोद शहा, विश्वविद्यालयाचे माजी कुलगुरू डॉ. एस. एफ. पाटील यांना विद्यापीठाचे कुलपती डॉ. पतंगराव कदम यांच्या हस्ते जीवनसाधना गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी डॉ. काळे बोलत होते. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शिवाजीराव कदम, कार्यवाह डॉ. विश्वजित कदम, कुलसचिव जी. जयकुमार आदी उपस्थित होते.
काळे म्हणाले, ' देशाचे महासत्ता बनण्याचे स्वप्न केवळ भौतिक विकासावर अवलंबून नाही. भौतिक विकासाबरोबरच जेव्हा सांस्कृतिक विकास होईल तेव्हा देश खऱ्या अर्थाने महासत्ता होईल. जातीपाती व धर्माच्या राजकारणातून देश महासत्ता होणार नाही आणि झाला तरी ती महासत्ता मजबूतपणे प्रस्थापित झाली असे म्हणता येणार नाही.देशात असहिष्णुतेचे वातावरण वाढत असून सत्ता काबीज करण्यासाठी धर्माचे राजकारण करण्यात येत आहे, ही सर्वांसाठी धोक्याची घंटा आहे. त्यामुळे ही परिस्थिती बदलण्यासाठी आपण सर्वांनी मोथो लढाई उभारण्याची आवश्यकता आहे.
डॉ. शहा म्हणाले, ' समाजात समाजसेवी माणसांची कमतरता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ही कमी भरून काढण्यासाठी समाजसेवेची आवड जोपासणे अधिक महत्त्वाचे आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक सन्मान झाले. मात्र, आज भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाने दिलेला पुरस्कार हा घराचा पुरस्कार असल्याने अधिक जवळचा वाटतो.' डॉ. पाटील म्हणाले, ' मी जेव्हा शिकलो तेव्हा प्रयोगशाळा २४ तास सुरू असायच्या आणि अशा परिस्थितीत शिक्षक देखील विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवून असायचे. मात्र, अशी परिस्थिती सध्या कुठे दिसत नाही. शिक्षण क्षेत्रात कार्यरत असल्याने खूप चांगली कामे करता आली, याचे समाधान आहे. मला मिळालेल्या पुरस्कारात माझे कुटुंबीय, शिक्षक आणि भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाचे विशेष योगदान आहे.
कुलगुरू डॉ. कदम, विश्वजित कदम यांनी विश्वविद्यालयाच्या विविध उपक्रम आणि उल्लेखनीय कामगिरींची माहिती सांगत मार्गदर्शन केले. कुलपती कदम यांनी पुरस्कारार्थ्यांचे अभिनंदन केले. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रँकिंग फ्रेमवर्कच्या (एनआयआरएफ) गुणवत्ता यादीत क्रमांक प्राप्त करणाऱ्या कॉलेजांचा सत्कार करण्यात आला. तसेच, आदर्श प्राध्यापक पुरस्कार, गुणवंत संशोधक पुरस्कार आणि गुणवंत शिक्षकेतर सेवक पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. जयकुमार यांनी आभार मानले.
विद्यार्थ्यांना एखाद्या गोष्टीवर ज्ञान द्यायचे असल्याचं त्याच गोष्टीवर शिक्षकांना दहापट ज्ञान असणे आवश्यक आहे. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता शिक्षकांकडे पुरेशा प्रमाणात ज्ञान नसल्याचेच दिसून येते. अशा परिस्थितीत शिक्षकांना अधिक गुणवान होण्याची आणि ज्ञानार्जन करण्याची आवश्यकता असल्याचे प्रा. मिरासदार यांनी सांगितले. पुरस्कार अनेक मिळाले. मात्र, विद्यापीठाने एका शिक्षकाचा जीवनसाधना पुरस्कार देऊन केलेला गौरव हा मला विशेष वाटतो. त्यामुळे विश्वविद्यालयाचे आभारी असल्याचे प्रा. मिरासदार यांनी सांगितले.
कृषी क्षेत्रातून मिळणाऱ्या उत्पन्नावर देशातील ५० ते ५५ टक्के लोक अवलंबून आहेत. मात्र, हे उत्पन्न देशाच्या एकूण उत्पन्नापैकी केवळ १० टक्केच आहे. याहून शेतीची अवस्था बिकट असल्याचे आढळते. अशातच शेतकरी आत्महत्या करीत आहेत. राज्यात जोपर्यत कृषी क्षेत्राचा विकास होणार नाही आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार नाहीत तोपर्यत महाराष्ट्राचा विकास झाल्याचे म्हणता येणार नाही, असे देशमुख यांनी सांगितले. कृषी क्षेत्राला पाणी आवश्यक असल्याने त्यासाठी राज्यात सिंचनक्षमता वाढविण्याची आणि इतर राज्यातून पाणी आणण्याचे प्रयत्न झाले पाहीजे, असे देशमुख यांनी सांगितले.
'देशात निळ्या, हिरव्या आणि भगव्या रंगाच्या छत्राखाली लोकांची विभागणी सुरू आहे का, अशीच भीती सध्या वाटत आहे. या परिस्थितीतच देशात असहिष्णुता वाढत असून सत्ता काबीज करण्यासाठी धर्माचे राजकारण होत आहे. या परिस्थितीत भारत महासत्ता होणार नाही,' असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांनी बुधवारी व्यक्त केले.
भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाच्या २२ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित समारंभात ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख, ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार, वैद्यकीय तज्ञ डॉ. विनोद शहा, विश्वविद्यालयाचे माजी कुलगुरू डॉ. एस. एफ. पाटील यांना विद्यापीठाचे कुलपती डॉ. पतंगराव कदम यांच्या हस्ते जीवनसाधना गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी डॉ. काळे बोलत होते. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शिवाजीराव कदम, कार्यवाह डॉ. विश्वजित कदम, कुलसचिव जी. जयकुमार आदी उपस्थित होते.
काळे म्हणाले, ' देशाचे महासत्ता बनण्याचे स्वप्न केवळ भौतिक विकासावर अवलंबून नाही. भौतिक विकासाबरोबरच जेव्हा सांस्कृतिक विकास होईल तेव्हा देश खऱ्या अर्थाने महासत्ता होईल. जातीपाती व धर्माच्या राजकारणातून देश महासत्ता होणार नाही आणि झाला तरी ती महासत्ता मजबूतपणे प्रस्थापित झाली असे म्हणता येणार नाही.देशात असहिष्णुतेचे वातावरण वाढत असून सत्ता काबीज करण्यासाठी धर्माचे राजकारण करण्यात येत आहे, ही सर्वांसाठी धोक्याची घंटा आहे. त्यामुळे ही परिस्थिती बदलण्यासाठी आपण सर्वांनी मोथो लढाई उभारण्याची आवश्यकता आहे.
डॉ. शहा म्हणाले, ' समाजात समाजसेवी माणसांची कमतरता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ही कमी भरून काढण्यासाठी समाजसेवेची आवड जोपासणे अधिक महत्त्वाचे आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक सन्मान झाले. मात्र, आज भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाने दिलेला पुरस्कार हा घराचा पुरस्कार असल्याने अधिक जवळचा वाटतो.' डॉ. पाटील म्हणाले, ' मी जेव्हा शिकलो तेव्हा प्रयोगशाळा २४ तास सुरू असायच्या आणि अशा परिस्थितीत शिक्षक देखील विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवून असायचे. मात्र, अशी परिस्थिती सध्या कुठे दिसत नाही. शिक्षण क्षेत्रात कार्यरत असल्याने खूप चांगली कामे करता आली, याचे समाधान आहे. मला मिळालेल्या पुरस्कारात माझे कुटुंबीय, शिक्षक आणि भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाचे विशेष योगदान आहे.
कुलगुरू डॉ. कदम, विश्वजित कदम यांनी विश्वविद्यालयाच्या विविध उपक्रम आणि उल्लेखनीय कामगिरींची माहिती सांगत मार्गदर्शन केले. कुलपती कदम यांनी पुरस्कारार्थ्यांचे अभिनंदन केले. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रँकिंग फ्रेमवर्कच्या (एनआयआरएफ) गुणवत्ता यादीत क्रमांक प्राप्त करणाऱ्या कॉलेजांचा सत्कार करण्यात आला. तसेच, आदर्श प्राध्यापक पुरस्कार, गुणवंत संशोधक पुरस्कार आणि गुणवंत शिक्षकेतर सेवक पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. जयकुमार यांनी आभार मानले.
विद्यार्थ्यांना एखाद्या गोष्टीवर ज्ञान द्यायचे असल्याचं त्याच गोष्टीवर शिक्षकांना दहापट ज्ञान असणे आवश्यक आहे. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता शिक्षकांकडे पुरेशा प्रमाणात ज्ञान नसल्याचेच दिसून येते. अशा परिस्थितीत शिक्षकांना अधिक गुणवान होण्याची आणि ज्ञानार्जन करण्याची आवश्यकता असल्याचे प्रा. मिरासदार यांनी सांगितले. पुरस्कार अनेक मिळाले. मात्र, विद्यापीठाने एका शिक्षकाचा जीवनसाधना पुरस्कार देऊन केलेला गौरव हा मला विशेष वाटतो. त्यामुळे विश्वविद्यालयाचे आभारी असल्याचे प्रा. मिरासदार यांनी सांगितले.
कृषी क्षेत्रातून मिळणाऱ्या उत्पन्नावर देशातील ५० ते ५५ टक्के लोक अवलंबून आहेत. मात्र, हे उत्पन्न देशाच्या एकूण उत्पन्नापैकी केवळ १० टक्केच आहे. याहून शेतीची अवस्था बिकट असल्याचे आढळते. अशातच शेतकरी आत्महत्या करीत आहेत. राज्यात जोपर्यत कृषी क्षेत्राचा विकास होणार नाही आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार नाहीत तोपर्यत महाराष्ट्राचा विकास झाल्याचे म्हणता येणार नाही, असे देशमुख यांनी सांगितले. कृषी क्षेत्राला पाणी आवश्यक असल्याने त्यासाठी राज्यात सिंचनक्षमता वाढविण्याची आणि इतर राज्यातून पाणी आणण्याचे प्रयत्न झाले पाहीजे, असे देशमुख यांनी सांगितले.