म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘तेजस’ या रेल्वेगाडीतून हेडफोन चोरून भारतीयांनी आपल्या सर्जनशीलतेचा आविष्कार घडवला आहे. अशा सर्जनशील लोकांमध्ये राहत असल्यामुळेच लिहायला जमते. लोक तोंडातील पानाची पिंक रस्त्यावर टाकून, रस्त्यातच लघवी करून पुढे जात आहेत आणि देश महासत्तेच्या दृष्टीने वाटचाल करत आहे,’ अशा शब्दांत लेखक-दिग्दर्शक किरण यज्ञोपवित यांनी रविवारी लोकांच्या दांभिकतेवर हल्ला चढवला. ‘सध्याचा काळ जपून बोलावे आणि ऐकून घ्यावे, असा आहे. फेसबुकवर अनेक लेखक निर्माण झाले आहेत,’ अशी टिप्पणीही त्यांनी केली.
थर्ड बेल एंटरटेन्मेंटतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी यज्ञोपवित यांच्यासह श्रीरंग गोडबोले, दासू वैद्य, गुरू ठाकूर, वैभव जोशी, रोहिणी निनावे, मनस्विनी लता रवींद्र, विभावरी देशपांडे, दिलीप ठाकूर यांना ज्येष्ठ नाटककार चं. प्र. देशपांडे यांच्या हस्ते ‘कलातीर्थ पुरस्कार’ देण्यात आला. मिलिंद कुलकर्णी आणि धनश्री लेले यांना ‘भाऊ मराठे स्मृती पुरस्कार’ प्रदान करण्या आला. हर्षवर्धन पाठक, बंटी देशपांडे, प्रशांत पाटील, नीलेश लिमये, चैतन्य गोखले, सौरभ कापडे, अमृता माने, नक्षत्रा देवडिगा, आरजे सोनिया पाठक-चव्हाण, मिलिंद मटकर या पडद्यामागील कलाकारांचाही सत्कार करण्यात आला. आसावरी मराठे-पेंडसे, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, संस्थेचे प्रमुख स्वप्नील रास्ते, पुष्कर देशपांडे आदी या वेळी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ‘के दिल अभी भरा नही’ या नाटकातील कलाकारांनी रसिकांशी संवाद साधला. समीधा अवसरे आणि अमेय पांगारकर यांनी सूत्रसंचालन केले.
‘कर्णबधीर मुलांसाठी २६ लाख’
‘सर्व पुणेकर माझा कार्यक्रम ऐकू शकतात; पण माझे आई-वडील कर्णबधीर असल्याने ते ऐकू शकत नाहीत. कर्णबधिर मुलांसाठी काम करण्याची माझी पूर्वीपासून इच्छा होती. माझ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी २६ लाख रुपये जमा केले आहेत. पुणेकरांनी दिलेला निधी कर्णबधीर मुलांसाठी वापरण्यात येणार आहे,' अशी भावना आरजे सोनाली हिने व्यक्त केली.
................
करमणूक क्षेत्राला दुय्यम मानले जाते; पण यातील कलाकृती नोबेल मिळणाऱ्या साहित्यकृतींपेक्षाही श्रेष्ठ असू शकते. माणसाला अस्वस्थ अवस्थेतून बाहेर काढण्याचे काम मनोरंजन करते. मनोरंजन आत्महत्या थांबवते. त्यामुळे मनोरंजनाला कमी समजण्याचे कारण नाही. मराठी प्रेक्षकांनी आता बोधपट, बांधिलकी सांगणारे आणि आजारांवरील चित्रपट या विषयांतून पुढे जावे. जागतिक प्रेक्षक समोर ठेवून चित्रपट तयार करायला हवेत.
- चं. प्र. देशपांडे, ज्येष्ठ नाटककार
‘तेजस’ या रेल्वेगाडीतून हेडफोन चोरून भारतीयांनी आपल्या सर्जनशीलतेचा आविष्कार घडवला आहे. अशा सर्जनशील लोकांमध्ये राहत असल्यामुळेच लिहायला जमते. लोक तोंडातील पानाची पिंक रस्त्यावर टाकून, रस्त्यातच लघवी करून पुढे जात आहेत आणि देश महासत्तेच्या दृष्टीने वाटचाल करत आहे,’ अशा शब्दांत लेखक-दिग्दर्शक किरण यज्ञोपवित यांनी रविवारी लोकांच्या दांभिकतेवर हल्ला चढवला. ‘सध्याचा काळ जपून बोलावे आणि ऐकून घ्यावे, असा आहे. फेसबुकवर अनेक लेखक निर्माण झाले आहेत,’ अशी टिप्पणीही त्यांनी केली.
थर्ड बेल एंटरटेन्मेंटतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी यज्ञोपवित यांच्यासह श्रीरंग गोडबोले, दासू वैद्य, गुरू ठाकूर, वैभव जोशी, रोहिणी निनावे, मनस्विनी लता रवींद्र, विभावरी देशपांडे, दिलीप ठाकूर यांना ज्येष्ठ नाटककार चं. प्र. देशपांडे यांच्या हस्ते ‘कलातीर्थ पुरस्कार’ देण्यात आला. मिलिंद कुलकर्णी आणि धनश्री लेले यांना ‘भाऊ मराठे स्मृती पुरस्कार’ प्रदान करण्या आला. हर्षवर्धन पाठक, बंटी देशपांडे, प्रशांत पाटील, नीलेश लिमये, चैतन्य गोखले, सौरभ कापडे, अमृता माने, नक्षत्रा देवडिगा, आरजे सोनिया पाठक-चव्हाण, मिलिंद मटकर या पडद्यामागील कलाकारांचाही सत्कार करण्यात आला. आसावरी मराठे-पेंडसे, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, संस्थेचे प्रमुख स्वप्नील रास्ते, पुष्कर देशपांडे आदी या वेळी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ‘के दिल अभी भरा नही’ या नाटकातील कलाकारांनी रसिकांशी संवाद साधला. समीधा अवसरे आणि अमेय पांगारकर यांनी सूत्रसंचालन केले.
‘कर्णबधीर मुलांसाठी २६ लाख’
‘सर्व पुणेकर माझा कार्यक्रम ऐकू शकतात; पण माझे आई-वडील कर्णबधीर असल्याने ते ऐकू शकत नाहीत. कर्णबधिर मुलांसाठी काम करण्याची माझी पूर्वीपासून इच्छा होती. माझ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी २६ लाख रुपये जमा केले आहेत. पुणेकरांनी दिलेला निधी कर्णबधीर मुलांसाठी वापरण्यात येणार आहे,' अशी भावना आरजे सोनाली हिने व्यक्त केली.
................
करमणूक क्षेत्राला दुय्यम मानले जाते; पण यातील कलाकृती नोबेल मिळणाऱ्या साहित्यकृतींपेक्षाही श्रेष्ठ असू शकते. माणसाला अस्वस्थ अवस्थेतून बाहेर काढण्याचे काम मनोरंजन करते. मनोरंजन आत्महत्या थांबवते. त्यामुळे मनोरंजनाला कमी समजण्याचे कारण नाही. मराठी प्रेक्षकांनी आता बोधपट, बांधिलकी सांगणारे आणि आजारांवरील चित्रपट या विषयांतून पुढे जावे. जागतिक प्रेक्षक समोर ठेवून चित्रपट तयार करायला हवेत.
- चं. प्र. देशपांडे, ज्येष्ठ नाटककार